शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरची देवसंदेश मच्छिमार बोट खोल समुद्रात बिघडल्याने बोटीसह 15 जण अडकले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 22:18 IST

समुद्र खवळलेला असतानाच भर समुद्रात बोट बिघडल्याने त्यावरील 15 मच्छीमार आणि खलाशी अडकून पडले आहेत.

मीरारोड - गोराईची मच्छीमार बोट समुद्रात बुडून 2 जण बेपत्ता झाले असताना भाईंदरच्या पाली येथील देवसंदेश हि मच्छीमार बोट किनाऱ्या पासून 40 किमी लांब खोल समुद्रात बंद पडली आहे . बोटीचे इंजिन बिघडले असून बोटीवरील 15 जण समुद्रात अडकले आहेत. 

पाली येथील नाखवा नेस्टर मुनीस यांची देवसंदेश हि मच्छीमार बोट मासेमारीसाठी 1 ऑगस्ट रोजी गेली होती . समुद्रात आलेल्या वादळीवारे आणि पावसामुळे मासेमारी साठी गेलेल्या बोटी परत किनाऱ्याला परंतु लागल्या . देवसंदेश देखील परत किनाऱ्याच्या दिशेने निघाली होती . परंतु किनाऱ्या पासून समुद्रात 40 किमी लांब अंतरावर असताना आज मंगळवारी दुपारी बोटीचे इंजिन बंद पडले . नाखवा व खलाशी आदींनी प्रयत्न करून देखील बोट सुरु झाली नाही. 

समुद्र खवळलेला असतानाच भर समुद्रात बोट बिघडल्याने त्यावरील 15 मच्छीमार आणि खलाशी अडकून पडले आहेत . सदर बाब मच्छीमार नेते माल्कम कासुघर , जॉर्जी गोविंद यांना कळताच अडकलेल्या मच्छीमारांना बोटी सह सुखरूप किनारी आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत . त्यांनी नौदल , तटरक्षक दल व मत्स्यविभागास मदतीसाठी विनंती केली आहे. मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य पाटील यांनी देखील तटरक्षक दलास पत्र देऊन अडकलेल्या  मच्छीमाराना सुखरूप परत आणण्याची विनंती केली आहे . तटरक्षक दल व नौदलाने देखील बोटीत अडकलेल्या 15 जणांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत .