शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
4
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
5
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
6
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
7
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
8
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
9
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
10
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
11
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
13
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
14
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
15
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
16
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
17
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
18
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
19
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
20
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य

कारवाईसाठी गेलेल्या एमएमआरडीए अधिकाऱ्यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:27 IST

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील कशेळी-काल्हेर या परिसरातील अनेक इमारतींना एमएमआरडीएने बेकायदा ठरवत कारवाई सुरू केली आहे. दोन महिन्यांपासून येथील ...

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील कशेळी-काल्हेर या परिसरातील अनेक इमारतींना एमएमआरडीएने बेकायदा ठरवत कारवाई सुरू केली आहे. दोन महिन्यांपासून येथील इमारती पाडण्याचे काम सुरू आहे. डोक्यावरील छत जाणार या चिंतेत रहिवासी आहेत. रहिवाशांचे म्हणणे ऐकण्यासाठी गुरुवारी आमदार शांताराम मोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख देवानंद थळे हे घटनास्थळी आले व एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत होते. त्याचवेळी संतप्त जमावाने एमएमआरडीएचे अधिकारी मिलिंद प्रधान यांना पोलिसांच्या उपस्थितीतच मारहाण केली.

काल्हेर-कशेळी या ग्रामपंचायत भागात मोठ्या संख्येने इमारती उभ्या राहिल्या आहेत. यापैकी बहुतांश इमारती या एमएमआरडीएने बेकायदा ठरविल्या असून, त्याबाबतचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे, तर काही इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार १ जूनपासून या ठिकाणी इमारती तोडण्याचे काम सुरू आहे. काही इमारतींना अवघ्या २४ तासांची नोटीस बजावून इमारत तोडण्यास आलेल्या एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. या ठिकाणी २००हून अधिक इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. कारवाईमुळे हजारो कुटुंब बेघर होणार आहेत. आम्ही मुद्रांक शुल्क भरून बँकेतून कर्ज घेऊन हे फ्लॅट खरेदी केले आहेत, त्यावेळी या इमारती बेकायदा नव्हत्या का ? जेव्हा बांधकाम सुरू होते त्यावेळेस एमएमआरडीएचे अधिकारी झोपा काढत होते का? असा सवाल येथील रहिवाशांनी उपस्थित करत आम्हाला कोरोनामुळे नाहीतर या इमारती तोडल्याने मरण येणार अशी व्यथा महिलांनी बोलून दाखविली.

कशेळी-काल्हेर या परिसरात ठाण्यापेक्षा निम्म्या किमतीत घरे मिळत आहे. बाळकूम येथील एका मोठ्या बिल्डरच्या ५० लाखांच्या घराला ग्राहक मिळत नसल्याने राजकीय व्यक्तींना हाताशी धरून ही कारवाई फक्त काल्हेर, कशेळी या भागांतच करीत असल्याचा आरोप शिवसेना उपजिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी केला आहे. एमएमआरडीए अधिकारी येथील विकासकांकडून पैसे उकळत असून, पैसे न देणाऱ्या बिल्डरांच्या इमारतींवर कारवाई करत असल्याचा आरोप केला आहे. येथील इमारती ज्या जागेवर उभ्या आहेत त्या जागा एनए झालेल्या खासगी जागा आहेत. त्यांची परवानगी ग्रामपंचायतीने दिली आहे. घरासाठी अनेकांनी बँकांकडून कर्ज घेतले आहे. त्यांना देशोधडीला लावण्याचे काम एमएमआरडीए अधिकारी करीत असल्याचे सांगत ही कारवाई थांबली नाही तर यापुढे आम्ही आत्मदहन करू, असा इशाराही थळे यांनी दिला आहे.

---------------------------------------------------------------

मुख्यमंत्र्यांना सांगणार रहिवाशांच्या व्यथा

एमएमआरडीए ही कारवाई आकसापोटी करत असल्याचा आरोप आमदार शांताराम मोरे यांनी केला. याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन येथील रहिवाशांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे सांगितले. पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यापूर्वी किमान सात दिवस आधी नोटीस बजावणे गरजेचे असल्याचे सांगत येथील परिस्थितीबाबत वरिष्ठांना अहवाल पाठविणार असल्याचे सांगितले.