शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

कारवाईसाठी गेलेल्या एमएमआरडीए अधिकाऱ्यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:27 IST

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील कशेळी-काल्हेर या परिसरातील अनेक इमारतींना एमएमआरडीएने बेकायदा ठरवत कारवाई सुरू केली आहे. दोन महिन्यांपासून येथील ...

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील कशेळी-काल्हेर या परिसरातील अनेक इमारतींना एमएमआरडीएने बेकायदा ठरवत कारवाई सुरू केली आहे. दोन महिन्यांपासून येथील इमारती पाडण्याचे काम सुरू आहे. डोक्यावरील छत जाणार या चिंतेत रहिवासी आहेत. रहिवाशांचे म्हणणे ऐकण्यासाठी गुरुवारी आमदार शांताराम मोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख देवानंद थळे हे घटनास्थळी आले व एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत होते. त्याचवेळी संतप्त जमावाने एमएमआरडीएचे अधिकारी मिलिंद प्रधान यांना पोलिसांच्या उपस्थितीतच मारहाण केली.

काल्हेर-कशेळी या ग्रामपंचायत भागात मोठ्या संख्येने इमारती उभ्या राहिल्या आहेत. यापैकी बहुतांश इमारती या एमएमआरडीएने बेकायदा ठरविल्या असून, त्याबाबतचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे, तर काही इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार १ जूनपासून या ठिकाणी इमारती तोडण्याचे काम सुरू आहे. काही इमारतींना अवघ्या २४ तासांची नोटीस बजावून इमारत तोडण्यास आलेल्या एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. या ठिकाणी २००हून अधिक इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. कारवाईमुळे हजारो कुटुंब बेघर होणार आहेत. आम्ही मुद्रांक शुल्क भरून बँकेतून कर्ज घेऊन हे फ्लॅट खरेदी केले आहेत, त्यावेळी या इमारती बेकायदा नव्हत्या का ? जेव्हा बांधकाम सुरू होते त्यावेळेस एमएमआरडीएचे अधिकारी झोपा काढत होते का? असा सवाल येथील रहिवाशांनी उपस्थित करत आम्हाला कोरोनामुळे नाहीतर या इमारती तोडल्याने मरण येणार अशी व्यथा महिलांनी बोलून दाखविली.

कशेळी-काल्हेर या परिसरात ठाण्यापेक्षा निम्म्या किमतीत घरे मिळत आहे. बाळकूम येथील एका मोठ्या बिल्डरच्या ५० लाखांच्या घराला ग्राहक मिळत नसल्याने राजकीय व्यक्तींना हाताशी धरून ही कारवाई फक्त काल्हेर, कशेळी या भागांतच करीत असल्याचा आरोप शिवसेना उपजिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी केला आहे. एमएमआरडीए अधिकारी येथील विकासकांकडून पैसे उकळत असून, पैसे न देणाऱ्या बिल्डरांच्या इमारतींवर कारवाई करत असल्याचा आरोप केला आहे. येथील इमारती ज्या जागेवर उभ्या आहेत त्या जागा एनए झालेल्या खासगी जागा आहेत. त्यांची परवानगी ग्रामपंचायतीने दिली आहे. घरासाठी अनेकांनी बँकांकडून कर्ज घेतले आहे. त्यांना देशोधडीला लावण्याचे काम एमएमआरडीए अधिकारी करीत असल्याचे सांगत ही कारवाई थांबली नाही तर यापुढे आम्ही आत्मदहन करू, असा इशाराही थळे यांनी दिला आहे.

---------------------------------------------------------------

मुख्यमंत्र्यांना सांगणार रहिवाशांच्या व्यथा

एमएमआरडीए ही कारवाई आकसापोटी करत असल्याचा आरोप आमदार शांताराम मोरे यांनी केला. याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन येथील रहिवाशांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे सांगितले. पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यापूर्वी किमान सात दिवस आधी नोटीस बजावणे गरजेचे असल्याचे सांगत येथील परिस्थितीबाबत वरिष्ठांना अहवाल पाठविणार असल्याचे सांगितले.