शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

वाढीव पाण्यासाठी बारवी धरणावर मदार

By admin | Updated: November 17, 2015 00:52 IST

यंदा धरणक्षेत्रात पाऊस कमी झाल्याने सर्वाधिक पाणीकपातीचे संकट ठाणे जिल्ह्यावर ओढावले आहे. पाणी संकटाचा मुकाबला करण्याकरिता लागलीच धरणाची बांधणी अशक्य

- पंकज पाटील,  अंबरनाथयंदा धरणक्षेत्रात पाऊस कमी झाल्याने सर्वाधिक पाणीकपातीचे संकट ठाणे जिल्ह्यावर ओढावले आहे. पाणी संकटाचा मुकाबला करण्याकरिता लागलीच धरणाची बांधणी अशक्य असल्याने बारवी धरणाची उंची वाढल्याने निर्माण झालेल्या अतिरिक्त पाणी साठ्यावर आरक्षण सांगण्याची धडपड जिल्ह्यातील सर्व शहरांनी सुरु केली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) राज्यातील पहिले धरण म्हणजे अंबरनाथचे बारवी धरण. औद्योगिक क्षेत्रांना पाणी पुरवठा करण्यासाठी हे धरण १९७२ मध्ये बांधून पूर्ण करण्यात आले. त्यानंतर १९८६ आणि पुन्हा १९९८ मध्ये या धरणाची उंची वाढविण्यात आली. ६५.१५ मीटर उंचीच्या या धरणात १७२ दशलक्ष घन मीटर एवढा पाणीसाठा करण्याची क्षमता होती. आता अलीकडेच धरणाची उंची ९ मीटर वाढविल्याने हीच क्षमता दुप्पट झाली. आता धरणात ३४०.४८ दशलक्ष घन मीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. धरणाची उंची वाढीसोबत आता धरणातील ११ स्वयंचलीत दरवाजांचे कामही सुरु करण्यात आले आहे. मात्र धरणाची उंची वाढल्याने बाधित होणाऱ्या गावांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पुनर्वसनासोबत धरणग्रस्तांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याची मागणी जोर धरत आहे. ही मागणी एमआयडीसी एकटी पूर्ण करू शकत नसल्याने आता या धरणातून ज्या महापालिका आणि नगरपरिषदांना पाण्याची गरज भासणार आहे अशा महापालिका आणि नगरपरिषदांनी येथील धरणग्रस्तांना नोकरी उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्ताव पुढे येत आहे. ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक महापािलका क्षेत्रांचा आणि नगरपरिषदेचा विस्तार वाढत असल्याने शहराची पाण्याची तहान भागविण्यासाठी या पालिका बारवी धरणाच्या वाढीव पाणीसाठ्याच्या आरक्षणाकरिता सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. जिल्ह्याला वाढीव पाणीसाठा उपलब्ध करुन देण्यासाठी अद्याप एकाही धरणाचे काम सुरु झालेले नाही. वाढीव पाण्यासाठी जिल्ह्याला उल्हासनदी आणि बारवी धरणावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. उल्हासनदीवरील पाण्याचे आरक्षण आधीच पूर्ण झालेले असल्याने आता बारवीच्या वाढलेल्या उंचीतून जो अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होणार आहे त्यावरच जिल्ह्याची तहान भागविली जाणार आहे.