शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

वाढीव पाण्यासाठी बारवी धरणावर मदार

By admin | Updated: November 17, 2015 00:52 IST

यंदा धरणक्षेत्रात पाऊस कमी झाल्याने सर्वाधिक पाणीकपातीचे संकट ठाणे जिल्ह्यावर ओढावले आहे. पाणी संकटाचा मुकाबला करण्याकरिता लागलीच धरणाची बांधणी अशक्य

- पंकज पाटील,  अंबरनाथयंदा धरणक्षेत्रात पाऊस कमी झाल्याने सर्वाधिक पाणीकपातीचे संकट ठाणे जिल्ह्यावर ओढावले आहे. पाणी संकटाचा मुकाबला करण्याकरिता लागलीच धरणाची बांधणी अशक्य असल्याने बारवी धरणाची उंची वाढल्याने निर्माण झालेल्या अतिरिक्त पाणी साठ्यावर आरक्षण सांगण्याची धडपड जिल्ह्यातील सर्व शहरांनी सुरु केली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) राज्यातील पहिले धरण म्हणजे अंबरनाथचे बारवी धरण. औद्योगिक क्षेत्रांना पाणी पुरवठा करण्यासाठी हे धरण १९७२ मध्ये बांधून पूर्ण करण्यात आले. त्यानंतर १९८६ आणि पुन्हा १९९८ मध्ये या धरणाची उंची वाढविण्यात आली. ६५.१५ मीटर उंचीच्या या धरणात १७२ दशलक्ष घन मीटर एवढा पाणीसाठा करण्याची क्षमता होती. आता अलीकडेच धरणाची उंची ९ मीटर वाढविल्याने हीच क्षमता दुप्पट झाली. आता धरणात ३४०.४८ दशलक्ष घन मीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. धरणाची उंची वाढीसोबत आता धरणातील ११ स्वयंचलीत दरवाजांचे कामही सुरु करण्यात आले आहे. मात्र धरणाची उंची वाढल्याने बाधित होणाऱ्या गावांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पुनर्वसनासोबत धरणग्रस्तांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याची मागणी जोर धरत आहे. ही मागणी एमआयडीसी एकटी पूर्ण करू शकत नसल्याने आता या धरणातून ज्या महापालिका आणि नगरपरिषदांना पाण्याची गरज भासणार आहे अशा महापालिका आणि नगरपरिषदांनी येथील धरणग्रस्तांना नोकरी उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्ताव पुढे येत आहे. ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक महापािलका क्षेत्रांचा आणि नगरपरिषदेचा विस्तार वाढत असल्याने शहराची पाण्याची तहान भागविण्यासाठी या पालिका बारवी धरणाच्या वाढीव पाणीसाठ्याच्या आरक्षणाकरिता सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. जिल्ह्याला वाढीव पाणीसाठा उपलब्ध करुन देण्यासाठी अद्याप एकाही धरणाचे काम सुरु झालेले नाही. वाढीव पाण्यासाठी जिल्ह्याला उल्हासनदी आणि बारवी धरणावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. उल्हासनदीवरील पाण्याचे आरक्षण आधीच पूर्ण झालेले असल्याने आता बारवीच्या वाढलेल्या उंचीतून जो अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होणार आहे त्यावरच जिल्ह्याची तहान भागविली जाणार आहे.