शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

उल्हासनगरात बाप्पाचे आगमन खड्ड्यातून, सर्वत्र टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:45 IST

उल्हासनगर : महापालिकेने रस्त्याची दुरुस्ती व रस्त्याची खड्डे भरण्याचे काम सुरू केले असले तरी संततधार पावसामुळे ते अपूर्ण राहिल्याने ...

उल्हासनगर : महापालिकेने रस्त्याची दुरुस्ती व रस्त्याची खड्डे भरण्याचे काम सुरू केले असले तरी संततधार पावसामुळे ते अपूर्ण राहिल्याने बाप्पांचे आगमन खड्ड्यातूनच झाले. या प्रकाराने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, ऐन पावसात रस्ता दुरुस्ती व खड्डे बुजविण्याचे काम पालिकेने सुरू केल्याने बांधकाम विभागावर टीका होत आहे.

उल्हासनगर महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्ती व खड्डे बुजविले जात नसल्याने, महापालिकेच्या कारभाराकडे नागरिक बोट दाखवत आहेत. महापालिकेने रस्ता दुरुस्ती व खड्डे भरण्यासाठी साडेसहा कोटींच्या निधीला मंजुरी दिली. रस्त्यातील खड्डे हे खडी, रेडी, दगड, डेब्रिज आदीने हे खड्डे भरले जात आहेत. मात्र संततधार पावसामुळे, या प्रकाराने अपघातात वाढ झाल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी विविध विकासकामे व क्रीडासंकुलाचे भूमिपूजन या कार्यक्रमापूर्वी भरपावसात महापालिका बांधकाम विभागाने परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण केले होते. मात्र असे पावसात डांबरीकरण केलेले रस्ते टिकतील का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

महापालिका रस्ता बांधणी, रस्ता दुरुस्ती, नाला दुरुस्ती आदींवर दरवर्षी ३० कोटींपेक्षा जास्त खर्च करूनही रस्त्याची दुरवस्था झाली. दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या सिमेंट रस्त्यावर खड्डे पडल्याने, रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्हे उभे राहिले आहे. एकूणच रस्ते बांधणी, रस्त्याची दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्यावर कोट्यवधींचा खर्च करूनही बहुतांश रस्ते खड्डेमय झाले आहेत. पावसाने विश्रांती घेतल्यावर, रस्ते दुरुस्ती व खड्डे भरण्याचे काम सुरू करण्याचे संकेत शहर अभियंता महेश शीतलानी यांनी दिले. तसेच काही ठिकाणी कामही सुरू झाल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात गणपती बाप्पाचे आगमन खड्ड्यातून झाले असून, बाप्पांना निरोपही खड्डेमय रस्त्यातून दावे लागणार असल्याची प्रतिक्रिया गणेशभक्त देत आहेत.

--------------

सत्ताधारी व विरोधकांची भूमिका बोटचेपी

महापालिकेवर शिवसेना मित्रपक्षाची सत्ता असून, भाजप-रिपाइंविरोधी पक्षात आहेत. शिवसेना मित्रपक्षाकडे महापौर पदासह बहुतेक विशेष समिती सभापतिपदे आहेत. तर भाजप-रिपाइंकडे उपमहापौर व स्थायी समिती सभापतिपद आहे. मात्र विकासकामांबाबत सत्ताधारी व विरोधी पक्षाची भूमिका नेहमीच गोंधळलेली दिसते, असे नागरिक म्हणतात.