शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात बाप्पाचे आगमन खड्ड्यातून, सर्वत्र टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:45 IST

उल्हासनगर : महापालिकेने रस्त्याची दुरुस्ती व रस्त्याची खड्डे भरण्याचे काम सुरू केले असले तरी संततधार पावसामुळे ते अपूर्ण राहिल्याने ...

उल्हासनगर : महापालिकेने रस्त्याची दुरुस्ती व रस्त्याची खड्डे भरण्याचे काम सुरू केले असले तरी संततधार पावसामुळे ते अपूर्ण राहिल्याने बाप्पांचे आगमन खड्ड्यातूनच झाले. या प्रकाराने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, ऐन पावसात रस्ता दुरुस्ती व खड्डे बुजविण्याचे काम पालिकेने सुरू केल्याने बांधकाम विभागावर टीका होत आहे.

उल्हासनगर महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्ती व खड्डे बुजविले जात नसल्याने, महापालिकेच्या कारभाराकडे नागरिक बोट दाखवत आहेत. महापालिकेने रस्ता दुरुस्ती व खड्डे भरण्यासाठी साडेसहा कोटींच्या निधीला मंजुरी दिली. रस्त्यातील खड्डे हे खडी, रेडी, दगड, डेब्रिज आदीने हे खड्डे भरले जात आहेत. मात्र संततधार पावसामुळे, या प्रकाराने अपघातात वाढ झाल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी विविध विकासकामे व क्रीडासंकुलाचे भूमिपूजन या कार्यक्रमापूर्वी भरपावसात महापालिका बांधकाम विभागाने परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण केले होते. मात्र असे पावसात डांबरीकरण केलेले रस्ते टिकतील का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

महापालिका रस्ता बांधणी, रस्ता दुरुस्ती, नाला दुरुस्ती आदींवर दरवर्षी ३० कोटींपेक्षा जास्त खर्च करूनही रस्त्याची दुरवस्था झाली. दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या सिमेंट रस्त्यावर खड्डे पडल्याने, रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्हे उभे राहिले आहे. एकूणच रस्ते बांधणी, रस्त्याची दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्यावर कोट्यवधींचा खर्च करूनही बहुतांश रस्ते खड्डेमय झाले आहेत. पावसाने विश्रांती घेतल्यावर, रस्ते दुरुस्ती व खड्डे भरण्याचे काम सुरू करण्याचे संकेत शहर अभियंता महेश शीतलानी यांनी दिले. तसेच काही ठिकाणी कामही सुरू झाल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात गणपती बाप्पाचे आगमन खड्ड्यातून झाले असून, बाप्पांना निरोपही खड्डेमय रस्त्यातून दावे लागणार असल्याची प्रतिक्रिया गणेशभक्त देत आहेत.

--------------

सत्ताधारी व विरोधकांची भूमिका बोटचेपी

महापालिकेवर शिवसेना मित्रपक्षाची सत्ता असून, भाजप-रिपाइंविरोधी पक्षात आहेत. शिवसेना मित्रपक्षाकडे महापौर पदासह बहुतेक विशेष समिती सभापतिपदे आहेत. तर भाजप-रिपाइंकडे उपमहापौर व स्थायी समिती सभापतिपद आहे. मात्र विकासकामांबाबत सत्ताधारी व विरोधी पक्षाची भूमिका नेहमीच गोंधळलेली दिसते, असे नागरिक म्हणतात.