शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

...तर पाण्यासाठी जमावबंदी?

By admin | Updated: March 29, 2016 03:27 IST

उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, कळवा-मुंब्रा आणि मीरा-भार्इंदर या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत पाणी सोडणाऱ्या आंध्रा धरणात जेमतेम २२ टक्के पाणीसाठा

- सुरेश लोखंडे,  ठाणे

उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, कळवा-मुंब्रा आणि मीरा-भार्इंदर या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत पाणी सोडणाऱ्या आंध्रा धरणात जेमतेम २२ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने पुढील तीन महिने पाणी कसे पुरवायचे, असा प्रश्न जिल्हा प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक शहरांत ६५ टक्क्यांपर्यंत पाणीकपात लागू आहे. त्यामध्ये आणखी वाढ केली तर जनक्षोभ उसळेल, अशी भीती प्रशासनाला वाटत आहे. त्यामुळे लातूरप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातही पाण्याकरिता जमावबंदी लागू केल्यास नवल वाटणार नाही, अशी शक्यता उच्चपदस्थ सूत्रांनी व्यक्त केली.ठाणे शहरासह मुंबई शहर व उपनगरांस पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, या धरणातील पाण्यावर ठाण्यापेक्षा मुंबईच अधिक हक्क सांगत आली आहे. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महापालिकांसह कुळगाव-बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात केवळ ३६ टक्के पाणी शिल्लक असून उल्हास नदीत पाणी सोडणाऱ्या आंध्रा धरणात फक्त २२.६८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. बारवी धरणाची स्थिती चिंताजनक आहेच, पण त्याहूनही गंभीर परिस्थिती उल्हास नदीची आहे. येथील पाणीसाठा आणखी कमी झाल्यावर बारवी धरणातील साठ्यावर अवलंबून राहावे लागेल. उद्योगांचा पाणीपुरवठा खंडित केला जाईल. मात्र, सध्या लागू केलेली ६५ टक्के पाणीकपात आणखी वाढवली तर जनक्षोभ उसळेल, अशी स्थिती आहे. मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पंधरवड्यात तशी परिस्थिती निर्माण झाली तर अतिरिक्त पाणीकपात लागू करतानाच पाण्याकरिता जमावबंदीचे लातूरमध्ये लागू केले, तसे आदेश ठाणे जिल्ह्यात लागू करावे लागतील.धरणांमधील एकूण पाणीसाठा७१.९६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा मागील वर्षी आजच्या तारखेला बारवी धरणात होता.६५.६६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा यंदा आहे१३७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उल्हास नदीला पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्रा धरणात मागील वर्षी आजच्या तारखेला होता.७६.९० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आज आहे.