शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

...तर पाण्यासाठी जमावबंदी?

By admin | Updated: March 29, 2016 03:27 IST

उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, कळवा-मुंब्रा आणि मीरा-भार्इंदर या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत पाणी सोडणाऱ्या आंध्रा धरणात जेमतेम २२ टक्के पाणीसाठा

- सुरेश लोखंडे,  ठाणे

उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, कळवा-मुंब्रा आणि मीरा-भार्इंदर या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत पाणी सोडणाऱ्या आंध्रा धरणात जेमतेम २२ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने पुढील तीन महिने पाणी कसे पुरवायचे, असा प्रश्न जिल्हा प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक शहरांत ६५ टक्क्यांपर्यंत पाणीकपात लागू आहे. त्यामध्ये आणखी वाढ केली तर जनक्षोभ उसळेल, अशी भीती प्रशासनाला वाटत आहे. त्यामुळे लातूरप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातही पाण्याकरिता जमावबंदी लागू केल्यास नवल वाटणार नाही, अशी शक्यता उच्चपदस्थ सूत्रांनी व्यक्त केली.ठाणे शहरासह मुंबई शहर व उपनगरांस पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, या धरणातील पाण्यावर ठाण्यापेक्षा मुंबईच अधिक हक्क सांगत आली आहे. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महापालिकांसह कुळगाव-बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात केवळ ३६ टक्के पाणी शिल्लक असून उल्हास नदीत पाणी सोडणाऱ्या आंध्रा धरणात फक्त २२.६८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. बारवी धरणाची स्थिती चिंताजनक आहेच, पण त्याहूनही गंभीर परिस्थिती उल्हास नदीची आहे. येथील पाणीसाठा आणखी कमी झाल्यावर बारवी धरणातील साठ्यावर अवलंबून राहावे लागेल. उद्योगांचा पाणीपुरवठा खंडित केला जाईल. मात्र, सध्या लागू केलेली ६५ टक्के पाणीकपात आणखी वाढवली तर जनक्षोभ उसळेल, अशी स्थिती आहे. मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पंधरवड्यात तशी परिस्थिती निर्माण झाली तर अतिरिक्त पाणीकपात लागू करतानाच पाण्याकरिता जमावबंदीचे लातूरमध्ये लागू केले, तसे आदेश ठाणे जिल्ह्यात लागू करावे लागतील.धरणांमधील एकूण पाणीसाठा७१.९६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा मागील वर्षी आजच्या तारखेला बारवी धरणात होता.६५.६६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा यंदा आहे१३७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उल्हास नदीला पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्रा धरणात मागील वर्षी आजच्या तारखेला होता.७६.९० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आज आहे.