शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

...तर पाण्यासाठी जमावबंदी?

By admin | Updated: March 29, 2016 03:27 IST

उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, कळवा-मुंब्रा आणि मीरा-भार्इंदर या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत पाणी सोडणाऱ्या आंध्रा धरणात जेमतेम २२ टक्के पाणीसाठा

- सुरेश लोखंडे,  ठाणे

उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, कळवा-मुंब्रा आणि मीरा-भार्इंदर या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत पाणी सोडणाऱ्या आंध्रा धरणात जेमतेम २२ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने पुढील तीन महिने पाणी कसे पुरवायचे, असा प्रश्न जिल्हा प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक शहरांत ६५ टक्क्यांपर्यंत पाणीकपात लागू आहे. त्यामध्ये आणखी वाढ केली तर जनक्षोभ उसळेल, अशी भीती प्रशासनाला वाटत आहे. त्यामुळे लातूरप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातही पाण्याकरिता जमावबंदी लागू केल्यास नवल वाटणार नाही, अशी शक्यता उच्चपदस्थ सूत्रांनी व्यक्त केली.ठाणे शहरासह मुंबई शहर व उपनगरांस पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, या धरणातील पाण्यावर ठाण्यापेक्षा मुंबईच अधिक हक्क सांगत आली आहे. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महापालिकांसह कुळगाव-बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात केवळ ३६ टक्के पाणी शिल्लक असून उल्हास नदीत पाणी सोडणाऱ्या आंध्रा धरणात फक्त २२.६८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. बारवी धरणाची स्थिती चिंताजनक आहेच, पण त्याहूनही गंभीर परिस्थिती उल्हास नदीची आहे. येथील पाणीसाठा आणखी कमी झाल्यावर बारवी धरणातील साठ्यावर अवलंबून राहावे लागेल. उद्योगांचा पाणीपुरवठा खंडित केला जाईल. मात्र, सध्या लागू केलेली ६५ टक्के पाणीकपात आणखी वाढवली तर जनक्षोभ उसळेल, अशी स्थिती आहे. मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पंधरवड्यात तशी परिस्थिती निर्माण झाली तर अतिरिक्त पाणीकपात लागू करतानाच पाण्याकरिता जमावबंदीचे लातूरमध्ये लागू केले, तसे आदेश ठाणे जिल्ह्यात लागू करावे लागतील.धरणांमधील एकूण पाणीसाठा७१.९६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा मागील वर्षी आजच्या तारखेला बारवी धरणात होता.६५.६६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा यंदा आहे१३७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उल्हास नदीला पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्रा धरणात मागील वर्षी आजच्या तारखेला होता.७६.९० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आज आहे.