शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

बदलापूरच्या आदिवासीने शोधले शेतीसाठी बिनविजेचे यंत्र

By admin | Updated: January 1, 2017 03:45 IST

अनेकदा जवळ पाण्याचे स्रोत असूनही वीज नसल्याने शेतीसाठी पाणी आणता येत नाही. काहींना तिच्या मोटरसाठी लागणारा इंधन खर्च परवडत नाही. यावर बदलापूरजवळील चोण

- पंकज पाटील, बदलापूर अनेकदा जवळ पाण्याचे स्रोत असूनही वीज नसल्याने शेतीसाठी पाणी आणता येत नाही. काहींना तिच्या मोटरसाठी लागणारा इंधन खर्च परवडत नाही. यावर बदलापूरजवळील चोण गावात राहणाऱ्या रामचंद्र खोडका या आदिवासी समाजातील व्यक्तीने या समस्येवर उपाय शोधला आहे. जुजबी यांत्रिक कौशल्याच्या बळावर पाण्याच्याच प्रवाहाचा वापर करून विनाइंधन पाणी उपसा करणारे यंत्र त्यांनी तयार केले आहे. त्यातून ते शेतीला पाणी पुरवतात, पण लवकरच त्यावर वीजनिर्मिती करण्याचा त्यांचा विचार आहे. सध्या चोण गावाजवळून वाहणाऱ्या बारवी नदीच्या प्रवाहात त्यांनी हे यंत्र बसविले असून त्याद्वारे कोणतेही इंधन न वापरता पाणी उपसले जात आहे. या यंत्राच्या पेटंटसाठीही त्यांनी अर्ज केला आहे. आयटीआयमधून वेल्डरचा पदविका अभ्यासक्र म पूर्ण केलेल्या खोडका यांनी काही काळ स्वत:चे वर्कशॉप टाकून व्यवसाय केला. नंतर राज्य परिवहनच्या कर्जत आगरात तांत्रिक कारागिर म्हणून त्यांची नेमणूक झाली. नोकरीबरोबरच चोण गावात ते शेतीही करतात. गावालगत नदी असूनही विजेअभावी त्यांना शेतीसाठी पाणी उपसून आणता येत नव्हते. डिझेलवर मोटर चालविणे परवडणारे नव्हते. त्यामुळे कोणत्याही इंधनाचा वापर न करता नदीतले पाणी उपसून आणता येईल का, याचा विचार ते करू लागले. धरणामुळे बारवी नदी बारमाही वाहती आहे. प्रवाहाच्या शक्तीमुळे नदीपात्रात त्यांनी बसविलेला चार पात्याचा लोखंडी पंखा फिरतो आणि पाणी उपसले जाते. या प्रक्रि येत कुठेही वीज, डिझेल अथवा अन्य कोणतेही इंधन वापरले जात नाही. उलट उपसल्या जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाद्वारे वीजनिर्मिती करणेही शक्य होते. दीड वर्षाच्या अथक प्रयत्नांनतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. विनाइंधन पाणी उपसा करणारे हे यंत्र बनविण्यासाठी त्यांना ६० हजारांचा खर्च आला. मात्र हा खर्च त्यांच्यासाठी कायमस्वरुपी झाला आहे. पाण्याविना शेत राहत नसल्याने बारमाही शेतीचा मार्ग त्यांनी मोकळा केला आहे. स्वत:चे कौशल्य वापरुन त्यांनी ही किमया साध्य केली आहे. आता या यंत्रात अजून काही सुधारणा करणे शक्य आहे का, याची चाचपणी सुरू आहे. ‘‘साधारण पावसाळ्यानंतर शेतीत कोणतेही पीक घ्यायचे म्हटले, तर नदीतून पाणी उपसा करण्यासाठी वीज अथवा डिझेलचा खर्च करावा लागतो. या यंत्राने तो खर्च पूर्णपणे वाचेल. शिवाय काही प्रमाणात वीजनिर्मिती होईल. या यंत्राची फारशी देखभाल करावी लागणार नसल्याने शेतकऱ्यांसाठी ते उपयुक्त आहे. - रामचंद्र खोडका, चोण