शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

‘फिल्मी चक्कर’मधून आठवणी जागृत

By admin | Updated: September 13, 2016 02:17 IST

गब्बरसिंगचा ‘कितने आदमी थे’ हा डायलॉग असो किंवा ‘थ्री इडिएट’मधील ‘व्हायरस’चा मांडलेला छळवाद, अभिनय कट्ट्यावर सुरू केलेल्या ‘फिल्मी चक्कर’ या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून

ठाणे : गब्बरसिंगचा ‘कितने आदमी थे’ हा डायलॉग असो किंवा ‘थ्री इडिएट’मधील ‘व्हायरस’चा मांडलेला छळवाद, अभिनय कट्ट्यावर सुरू केलेल्या ‘फिल्मी चक्कर’ या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांची दाद मिळवून गेला. ‘शोले ते थ्री इडिएट’ तसेच ‘अमिताभ ते टायगर श्रॉफ’ अशा सर्वच चित्रपट व अभिनेत्यांची आठवण कट्ट्याच्या कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून करून दिली.मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी आता इतकी जवळ आली आहे की, जास्तीतजास्त मराठी कलाकारांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपली दमदार सुरुवात करावी, या हेतूने कट्ट्याचे प्रमुख किरण नाकती यांनी ‘फिल्मी चक्कर’ ही एक नवीन संकल्पना सुरू केली आहे. त्याचा पहिला प्रयोग रविवारी पार पडला. हिंदी जुन्या व नवीन चित्रपटांतील अजरामर प्रसंगांचे सादरीकरण कट्ट्याच्या कलाकारांनी केले. त्यामध्ये दीपक मुळीक व अश्विनी जगताप यांनी ‘एअरलिफ्ट’, गणेश गायकवाड व नवनाथ कंचार यांनी ‘अग्निपथ’, स्वप्नील काळे, प्रणव दळवी व परेश दळवी यांनी ‘थ्री इडिएट’, वीणा छत्रे हिने ‘दामिनी’, नवनाथ कंचार याने शोले चित्रपटातील ‘गब्बरसिंग’, शिल्पा लाडवंते, वैभवी वंजारे व मधुरा सावंत यांनी ‘रिश्ते’, मयूरेश जोशी, नितेश कदम, शिवानी देशमुख, आरती ताथवडकर, विजय माने, प्रशांत सकपाळ, मधुरा सावंत यांनी ‘स्वर्ग’, वैभव चव्हाण व योगेश मंडलिक यांनी ‘बिल्लू बारबर’, वैभव जाधव व रोहित अहिरे यांनी शोले चित्रपटातील जयविरू, रूपेश बने याने ‘टायगर श्रॉफ’ अशा सर्वच चित्रपटांतील भूमिका उत्तम साकारून उपस्थितांची दाद मिळवली.