शहरं
Join us  
Trending Stories
1
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
2
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
3
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
4
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
5
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
6
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
7
"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
8
व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?
9
अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...
10
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
11
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
12
लग्नाच्या पहिल्याच रात्री पती टेरेसवर झोपला, नववधूचा शाळेपासूनचा प्रियकर आला, अन्...
13
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार
14
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
15
अभिनेता स्टेजवर अचानक बेशुद्ध होऊन कोसळला! तातडीने रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?
16
निष्काळजीपणाचा कळस! आई आजारी, लेकाच्या हातात रक्ताची बॉटल; नवऱ्याने ओढला स्ट्रेचर अन्...
17
सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझं स्कीट.."
18
पायऱ्या चढा किंवा उतरा आणि हार्ट ॲटॅकची भीती विसरा; गंभीर आजारही होतील छूमंतर
19
Numerology: ७, १६ आणि २५ जन्मतारीख असलेल्यांना जन्मतः मिळते चाणाक्ष बुद्धी आणि तीक्ष्ण नजर!
20
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश

महापालिका प्रशासन कमकुवत असल्याने अधिकाऱ्यांवर हल्ले - जितेंद्र आव्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:42 IST

ठाणे : ठाणे महापालिका प्रशासन कमकुवत असल्यानेच फेरीवाले अधिकाऱ्यांवर हल्ले करण्याची हिंमत करू शकतात, असा आरोप राज्याचे गृहनिर्माणमंत्री ...

ठाणे : ठाणे महापालिका प्रशासन कमकुवत असल्यानेच फेरीवाले अधिकाऱ्यांवर हल्ले करण्याची हिंमत करू शकतात, असा आरोप राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी केला. अशा फेरीवाल्यांकडे जाऊन खरेदी करणाऱ्या नागरिकांनीदेखील याचा विचार करायला हवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने केलेला हल्ला दुर्दैवी असून, केवळ आईवडिलांच्या आशीर्वादामुळे त्या बचावल्या. ही घटना ठाण्याला भूषणावह नसल्याचेही त्यांनी सांगितले.

कासारवडवली येथे सोमवारी सायंकाळी पिंपळे यांच्या जीवघेणा हल्ला झाला. यात त्यांच्या हाताची दोन बोटे तुटली असून, त्यांचा सुरक्षारक्षक पालवे याचेही एक बोट कापले गेले आहे. त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ठाण्यातील आमदार व राजकीय नेते मंडळींसह विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पाठोपाठ बुधवारी रात्री डॉ. आव्हाड यांनीही रुग्णालयात भेट घेतली. यावेळी आव्हाड म्हणाले की, एवढी मुजोरी कुणाचीही चालू देता कामा नये. प्रशासनापेक्षा कोणी मोठा आहे, अशी भावना जेव्हा निर्माण होते, तेव्हा ते प्रशासन कमकुवत असते, याकडे आव्हाड यांनी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. प्रशासनाचा दरारा पाहिजे, ज्यावेळी तो संपतो त्यावेळी अशा घटना घडतात, अशी टीका त्यांनी प्रशासनावर केली. एकीकडे फेरीवाल्यांविरोधात ओरडणारे ठाणेकर स्वत:च या फेरीवाल्यांकडे रांगा लावून उभे असतात. केवळ महापालिकेला जबाबदार न धरता, समाजाचीही तितकीच जबाबदारी असल्याचे आव्हाड यावेळी म्हणाले. या भेटीदरम्यान आव्हाड यांच्यासोबत माजी नगरसेवक अमित सरय्या आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.