शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

श्री विसर्जनासाठी कृत्रिम तलाव?

By admin | Updated: July 13, 2016 01:41 IST

चार फूटांपेक्षा अधिक उंचीच्या गणेश मूर्तींंचे विसर्जन समुद्रात करून त्यापेक्षा कमी उंचीच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव करण्याचा पालिकेचा विचार आहे.

शशी करपे,  वसईचार फूटांपेक्षा अधिक उंचीच्या गणेश मूर्तींंचे विसर्जन समुद्रात करून त्यापेक्षा कमी उंचीच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव करण्याचा पालिकेचा विचार आहे.नैसर्गिक जलस्त्रोतांच्या संवर्धनासाठी यंदा गणेशमूर्तींचे तलावात विसर्जन करण्यावर निर्बंध येण्याची शक्यता आहे. त्यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करुन गणेश भक्तांना दिलासा देण्याचा पालिकेकडून प्रयत्न सुरु आहे. राज्य शासनाने या संदर्भात अध्यादेश जारी केल्यानंतर मुख्यालयात महापौरांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. या बैठकीत कृत्रिम तलावासाठी किती खर्च येऊ शकतो. तसेच गणेश मूर्तींचे विजर्सन समुद्रात करायचे कि कृत्रिम तलावांची निर्मिती करायची यावर चर्चा सुरु असून या आठवड्यात त्यावर निर्णय अपेक्षित असल्याची माहिती पालिका आयुक्त सतिश लोखंडे यांनी दिली.पर्यावरणाच्या दृष्टीने शाडू माती, इकोफ्रेंडली गणेश मूर्त्यांचा कल वाढत चालला असला तरी प्लास्टर आॅफ पॅरीसच्या गणपती मूर्त्याना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शाडूमातीच्या तसेच इाकाफ्रेंडली मूर्त्या तलावांमध्ये नैसर्गिकरित्या विरघळत असल्या तरी प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्त्या मात्र पर्यावरणासाठी हानिकरक ठरत असतात. तलावात गणेश मूर्त्यांचे विसर्जन केल्यानंतर प्लास्टर आॅफ पॅरीस नैसर्गिकरित्या नष्ट होत नसल्याने तलावातील नैसर्गिक झऱ्यांना त्यामुळे हानी पोहोचते. त्याच बरोबर विसर्जनाच्यावेळी गणेश मुर्त्यांबरोबर निर्माल्य देखील तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्जित केले जात असल्याने तलावातील पाणी दूषित होऊन मस्त्यजीवांना धोका पोहचण्याचा संभव असतो. त्यामुळे यंदा तलावांमध्ये गणेश मूर्त्यांचे विसर्जन न करता गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करावी असा आदेश राज्य शासनाने जारी केला आहे. या आदेशाच्या अनुषंगाने घरगुती गणपतींसाठी कृत्रिम तलाव निर्मिती करण्याबरोबरच चार फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती समुद्रात विसर्जन करण्याच्या दृष्टीनेही पालिका विचाराधीन असल्याचे समजते. नैसर्गिक जलस्त्रोतांच्या संवर्धनासाठी व पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला जात असला तरी गणेश भक्त व मंडळे त्याला किती सकारात्मक प्रतिसाद देतात हे पहावे लागणार आहे. वसई तालुक्यात सार्वजनिक गणपतींची मोठ्या संख्येने स्थापना केली जाते. मुंबई प्रमाणेच आता वसई तालुक्यातही दहा-बारा फूट उंचीच्या गणपती मूर्त्यांची स्थापना केली जाते. आतापर्यंत वसई तालुक्यातील काही ठराविक मंडळे मोठ्या गणेश मूर्त्यांचे समुद्रात विसर्जन करीत असल्या तरी बहुतांश मोठ्या मूर्त्यांचे तलावातच विसर्जन केले जाते.