शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, दुसऱ्यांदा म्हणाले...!
2
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
3
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
6
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
7
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
8
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
9
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
10
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
11
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
12
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
13
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
14
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
15
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
16
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
17
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
18
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
19
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
20
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?

भातसा धरणाच्या विकासकामांसाठी २०० कोटींच्या निधीस मंजुरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 01:57 IST

पाण्याची गळती रोखण्यात जलसंपदा विभागाला येणार यश  

- रवींद्र सोनावळेशेणवा : मुंबई व ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या मजबुतीकरणासाठी व धरणक्षेत्रातील अन्य आवश्यक असलेल्या विकासकामांसाठी राज्य सरकारने २०० कोटी ६६ लाखांचा निधी मंजूर केला आहे. भातसा धरणाच्या या बळकटीकरणाच्या कामामुळे धरणाची पाण्याची गळती पूर्णपणे रोखण्यात जलसंपदा विभागाला यश येणार असल्याचा दावा अभियंत्यांकडून केला जात आहे.सरकारने जागतिक बँकेच्या मदतीने भातसा धरणास हा निधी मंजूर केल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील महत्त्वाच्या धरणांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाविकास आघाडी सरकारने निविदा प्रक्रियेस मान्यता दिली आहे. यात भातसा धरणाच्या कामाचाही समावेश असून, धरण पुनर्स्थापना व सुधारणा प्रकल्प टप्पा २ व ३ या प्रकल्पातील कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.मंजुरी दिलेल्या या निधीपैकी पहिल्या टप्यात ११४ कोटींची कामे हाती घेतली जाणार असून, विशेष म्हणजे ही कामे अत्याधुनिक व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून केली जाणार आहेत. यामध्ये भातसा धरणाच्या ऊर्ध्व व अधो बाजूकडील (रँकिंग) सांधे भरणे या महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे. धरण मुख्य गेट, अंतर्गत लिफ्ट याची डागडुजी करणे व धरणावरील विद्युत प्रणालीची देखभाल व दुरुस्ती करणे, धरण माथ्यावर जाणारे पोहच रस्ते तयार करणे ही कामे या निधीतून केली जाणार आहेत, अशी माहिती भातसा धरणाचे सहायक अभियंता श्याम हंबीर व गणेश कचरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.