शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

भातसा धरणाच्या विकासकामांसाठी २०० कोटींच्या निधीस मंजुरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 01:57 IST

पाण्याची गळती रोखण्यात जलसंपदा विभागाला येणार यश  

- रवींद्र सोनावळेशेणवा : मुंबई व ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या मजबुतीकरणासाठी व धरणक्षेत्रातील अन्य आवश्यक असलेल्या विकासकामांसाठी राज्य सरकारने २०० कोटी ६६ लाखांचा निधी मंजूर केला आहे. भातसा धरणाच्या या बळकटीकरणाच्या कामामुळे धरणाची पाण्याची गळती पूर्णपणे रोखण्यात जलसंपदा विभागाला यश येणार असल्याचा दावा अभियंत्यांकडून केला जात आहे.सरकारने जागतिक बँकेच्या मदतीने भातसा धरणास हा निधी मंजूर केल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील महत्त्वाच्या धरणांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाविकास आघाडी सरकारने निविदा प्रक्रियेस मान्यता दिली आहे. यात भातसा धरणाच्या कामाचाही समावेश असून, धरण पुनर्स्थापना व सुधारणा प्रकल्प टप्पा २ व ३ या प्रकल्पातील कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.मंजुरी दिलेल्या या निधीपैकी पहिल्या टप्यात ११४ कोटींची कामे हाती घेतली जाणार असून, विशेष म्हणजे ही कामे अत्याधुनिक व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून केली जाणार आहेत. यामध्ये भातसा धरणाच्या ऊर्ध्व व अधो बाजूकडील (रँकिंग) सांधे भरणे या महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे. धरण मुख्य गेट, अंतर्गत लिफ्ट याची डागडुजी करणे व धरणावरील विद्युत प्रणालीची देखभाल व दुरुस्ती करणे, धरण माथ्यावर जाणारे पोहच रस्ते तयार करणे ही कामे या निधीतून केली जाणार आहेत, अशी माहिती भातसा धरणाचे सहायक अभियंता श्याम हंबीर व गणेश कचरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.