शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

जप्त केलेली वाहने घेऊन जाण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:39 IST

भिवंडी : भिवंडी शहर वाहतूक विभागाने २०१६ ते २०२० या कालावधीत केलेल्या विशेष कारवाई दरम्यान एकूण १४४ रिक्षा व ...

भिवंडी : भिवंडी शहर वाहतूक विभागाने २०१६ ते २०२० या कालावधीत केलेल्या विशेष कारवाई दरम्यान एकूण १४४ रिक्षा व ६० दुचाकी अशी २०४ वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. त्यापैकी २५ दुचाकी व ५३ रिक्षा या बेवारस असून, ३५ दुचाकी व ९१ रिक्षांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

ही सर्व वाहने भोईवाडा पोलीस ठाणे हद्दीतील कारीवली गाव येथील सरकारी जागेत ठेवण्यात आली होती; परंतु वाहने पावसात भिजून खराब झाली असून, त्यातून दुर्गंधी येत असल्याने त्याबाबत परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे या वाहनांचा लिलाव करून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त यांनी आदेश दिले आहेत. या वाहनांपैकी वाहतूक उपविभाग येथे उपलब्ध असलेल्या वाहनांपैकी १२९ रिक्षांचे मालक व ४१ दुचाकीच्या मालकांची माहिती आर.टी.ओ. ठाणे कार्यालयाकडून प्राप्त करण्यात आली असून, या वाहन मालकांच्या निवासस्थानाचे पत्ते शोधून त्या ठिकाणावर वाहनमालकांना नोटीस पाठविण्यात आल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.

दरम्यान, जप्त व बेवारस रिक्षा व दुचाकी आपल्या मालकीच्या असल्यास, त्यांची चोरी झाली असल्यास किंवा त्या हरविल्या असल्यास वाहनांच्या मालकी हक्काची आवश्यक ती कागदपत्र घेऊन वाहतूक उपविभाग, भिवंडी या कार्यालयात येऊन संपर्क साधावा, अन्यथा ही जप्त व बेवारस वाहनांच्या मालकी हक्काबाबत कोणीही पुढे आले नाही तर वरील सर्व वाहनांचा लिलाव करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने यांनी दिली असून, तशा आवाहनाचे प्रसिद्धिपत्रकही काढले आहे.