शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

जप्त केलेली वाहने घेऊन जाण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:39 IST

भिवंडी : भिवंडी शहर वाहतूक विभागाने २०१६ ते २०२० या कालावधीत केलेल्या विशेष कारवाई दरम्यान एकूण १४४ रिक्षा व ...

भिवंडी : भिवंडी शहर वाहतूक विभागाने २०१६ ते २०२० या कालावधीत केलेल्या विशेष कारवाई दरम्यान एकूण १४४ रिक्षा व ६० दुचाकी अशी २०४ वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. त्यापैकी २५ दुचाकी व ५३ रिक्षा या बेवारस असून, ३५ दुचाकी व ९१ रिक्षांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

ही सर्व वाहने भोईवाडा पोलीस ठाणे हद्दीतील कारीवली गाव येथील सरकारी जागेत ठेवण्यात आली होती; परंतु वाहने पावसात भिजून खराब झाली असून, त्यातून दुर्गंधी येत असल्याने त्याबाबत परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे या वाहनांचा लिलाव करून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त यांनी आदेश दिले आहेत. या वाहनांपैकी वाहतूक उपविभाग येथे उपलब्ध असलेल्या वाहनांपैकी १२९ रिक्षांचे मालक व ४१ दुचाकीच्या मालकांची माहिती आर.टी.ओ. ठाणे कार्यालयाकडून प्राप्त करण्यात आली असून, या वाहन मालकांच्या निवासस्थानाचे पत्ते शोधून त्या ठिकाणावर वाहनमालकांना नोटीस पाठविण्यात आल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.

दरम्यान, जप्त व बेवारस रिक्षा व दुचाकी आपल्या मालकीच्या असल्यास, त्यांची चोरी झाली असल्यास किंवा त्या हरविल्या असल्यास वाहनांच्या मालकी हक्काची आवश्यक ती कागदपत्र घेऊन वाहतूक उपविभाग, भिवंडी या कार्यालयात येऊन संपर्क साधावा, अन्यथा ही जप्त व बेवारस वाहनांच्या मालकी हक्काबाबत कोणीही पुढे आले नाही तर वरील सर्व वाहनांचा लिलाव करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने यांनी दिली असून, तशा आवाहनाचे प्रसिद्धिपत्रकही काढले आहे.