शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

एपीएमसीत लाखोंचा घोटाळा

By admin | Updated: September 13, 2016 02:30 IST

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळेवाटपावेळी काही व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करून ते फुलव्यापाऱ्यांना परस्पर वाटून त्यात ५९ लाखांचा भ्रष्टाचार केल्याच्या आरोपांचे प्रकरण नव्याने समोर आले

मुरलीधर भवार ,  कल्याणकल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळेवाटपावेळी काही व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करून ते फुलव्यापाऱ्यांना परस्पर वाटून त्यात ५९ लाखांचा भ्रष्टाचार केल्याच्या आरोपांचे प्रकरण नव्याने समोर आले आहे. या प्रकरणी सचिवांच्या चौकशीसाठी नेमलेल्या अधिकाऱ्याने त्यांची पाठराखण केल्याचा आरोप झाल्याने नवा अधिकारी नेमून चौकशी करावी, असे आदेश पणन संचालकांनी कोकण विभागीय सहनिबंधकांना दिले आहेत. त्यानंतरही नवा अधिकारी नेमण्यात आलेला नाही.बाजार समितीतील ११९ गाळ्यांपैकी ५४ सभासदांचे गाळे रद्द करण्यात आले आणि ते भाजीपाला विक्रेत्यांना न देता फुलविक्रेत्यांना दिले गेले. त्यात समितीच्या सचिवांनी ५९ लाखांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार भाजीपाला विक्रेत्यांनी पणन संचालकांकडे केली होती. त्यासाठी नेमलेला चौकशी अधिकारीच चौकशी न करता त्यांना सचिवांना पाठीशी घालत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. २०१० साली बाजार समितीने उभारलेल्या नव्या गाळ्यांपैकी ११९ गाळ्यांचे वाटप व्यापाऱ्यांना करण्यात आले. त्यापैकी ५४ व्यापाऱ्यांंचे गाळेवाटप रद्द करण्यात आल्याचे बाजार समितीने त्यांना कळवले. हे वाटप रद्द करताना या व्यापाऱ्यांनी त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण केले नसल्याचे कारण समितीचे सचिव श्यामकांत चौधरी दिले होते. हे गाळे फुलविक्रेत्यांना देण्यात आले आणि त्यात ५९ लाखांचा गैरव्यवहार झाला, असा आरोप लक्ष्मी मार्केट भाजीपाला संघटनेचे सचिव रामदास यादव यांनी केला होता. त्याबाबत त्यांनी पणन संचालकांकडे तक्रार केली, तेव्हा परवान्यांचे नूतनीकरण करून गाळ्यांचे वाटप करावे, असे पणन संचालकांनी सांगितले होते. तसे पत्रही यादव यांच्याकडे आहे. मात्र, त्यांच्या या पाठपुराव्याला सचिव चौधरी यांनी दाद दिली नाही. त्यानंतर, भ्रष्टाचाराबाबत तक्रारी आल्याने पणन संचालकांनी जिल्हा उपनिबंधक दिलीप उड्डाण यांना चौकशी करण्यास सांगितले. मात्र, त्यांनी योग्य चौकशी न करता चौधरी यांना पाठीशी घातल्याचा आरोप तक्रारदार व्यापारी आणि संघटनेने केला. चौधरी यांच्याविरोधात अनेक अर्ज संचालकांकडे आहेत. जिल्हा उपनिबंधकांनी तयार केलेल्या चौकशी अहवालाविरोधात तक्रारदार अपिलात गेले. त्यामुळे हा चौकशी अहवाल रद्द करण्यात आला. गाळे रद्द करण्याच्या प्रक्रियेत सचिवांकडून झालेल्या भ्रष्टाचाराविषयी तक्रारदारांनी प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे. उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी जिल्हा उपनिबंधकांकडे न देता इतर अधिकाऱ्यांमार्फत करण्याचे आदेश पणन संचालकांनी विभागीय सहनिबंधकांना दिले आहेत. पण, या आदेशाची अद्याप अंमलबजावणीच केली जात नसल्याचे तक्रारदार यादव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)