शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
3
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
4
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
5
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
6
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
7
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
8
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
9
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
10
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
11
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
12
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
13
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
14
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
15
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
16
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
17
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
18
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
19
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
20
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

पाणीटंचाईवर २६० बोअरवेलची मात्रा

By admin | Updated: March 30, 2016 01:46 IST

जिल्ह्यातील ५१९ गावपाड्यांना दरवर्षाप्रमाणे या वर्षीही तीव्र पाणीटंचाई आहे. पण जवळपासच्या विहिरी, डोह आदींच्या पाण्यावर तहान भागवणाऱ्या तेथील ग्रामस्थांसाठी आता बोअरवेलव्दारे

ठाणे: जिल्ह्यातील ५१९ गावपाड्यांना दरवर्षाप्रमाणे या वर्षीही तीव्र पाणीटंचाई आहे. पण जवळपासच्या विहिरी, डोह आदींच्या पाण्यावर तहान भागवणाऱ्या तेथील ग्रामस्थांसाठी आता बोअरवेलव्दारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केले आहे. त्यासाठी २६० बोअरवेल प्रस्तावित केल्या आहेत. त्यापैकी सर्वेक्षणांती १०३ बोअरवेल पात्र ठरल्या आहेत. त्यांचे काम लवकरच सुरू होणार आहे.या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने एक कोटी ५६ लाख रूपये खर्च जि. प. अपेक्षित धरला आहे. मात्र १०३ ग्रामपंचायतींमध्येच बोअरवेलचेच काम हाती घेण्यात आले. शहरांमध्ये कडकडीत पाणीटंचाई सुरू आहे. मात्र ग्रामीण भागातही अधिपासून सुरू असलेल्या टंचाईवर मात करण्यासाठी तज्ज्ञांनी बोअरवेलचे काम हाती घेतले आहे. यासाठी ठिकठिकाणच्या २६० बोअरवेल पैकी गावखेड्यांमध्ये जाऊन २३६ ठिकाणचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. उर्वरित २४ बोअरवेलचे सर्वेक्षण अंबरनाथ तालुक्यात बाकी आहे. सर्वेक्षण झालेल्यापैकी १०३ ठिकाणे बोअरवेलसाठी पात्र ठरले आहेत. त्यांचे काम एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठाचे प्रभारी कार्यकारी अभियंता आर. डी. धांदवड यांनी लोकमतला सांगितले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ४३० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात ८०९ गावपाडे आहेत. यातील १३२ गावे व ३८७ पाडे आदी ५१९ गावपाडे तीव्र पाणीटंचाईच्या चक्र व्युहात आहेत. यावर मात करण्यासाठी दोन कोटी ६४ लाख रूपये खर्चाची तरतूद जिल्हा प्रशासनाने केली आहे. पण आजपर्यंतही जिल्ह्यातील कोणत्याही गाव पाड्यातून टँकरची मागणी आलेली नसल्याचा दावा धांदवड यांनी केला आहे.