शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

पाणीटंचाईवर २६० बोअरवेलची मात्रा

By admin | Updated: March 30, 2016 01:46 IST

जिल्ह्यातील ५१९ गावपाड्यांना दरवर्षाप्रमाणे या वर्षीही तीव्र पाणीटंचाई आहे. पण जवळपासच्या विहिरी, डोह आदींच्या पाण्यावर तहान भागवणाऱ्या तेथील ग्रामस्थांसाठी आता बोअरवेलव्दारे

ठाणे: जिल्ह्यातील ५१९ गावपाड्यांना दरवर्षाप्रमाणे या वर्षीही तीव्र पाणीटंचाई आहे. पण जवळपासच्या विहिरी, डोह आदींच्या पाण्यावर तहान भागवणाऱ्या तेथील ग्रामस्थांसाठी आता बोअरवेलव्दारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केले आहे. त्यासाठी २६० बोअरवेल प्रस्तावित केल्या आहेत. त्यापैकी सर्वेक्षणांती १०३ बोअरवेल पात्र ठरल्या आहेत. त्यांचे काम लवकरच सुरू होणार आहे.या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने एक कोटी ५६ लाख रूपये खर्च जि. प. अपेक्षित धरला आहे. मात्र १०३ ग्रामपंचायतींमध्येच बोअरवेलचेच काम हाती घेण्यात आले. शहरांमध्ये कडकडीत पाणीटंचाई सुरू आहे. मात्र ग्रामीण भागातही अधिपासून सुरू असलेल्या टंचाईवर मात करण्यासाठी तज्ज्ञांनी बोअरवेलचे काम हाती घेतले आहे. यासाठी ठिकठिकाणच्या २६० बोअरवेल पैकी गावखेड्यांमध्ये जाऊन २३६ ठिकाणचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. उर्वरित २४ बोअरवेलचे सर्वेक्षण अंबरनाथ तालुक्यात बाकी आहे. सर्वेक्षण झालेल्यापैकी १०३ ठिकाणे बोअरवेलसाठी पात्र ठरले आहेत. त्यांचे काम एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठाचे प्रभारी कार्यकारी अभियंता आर. डी. धांदवड यांनी लोकमतला सांगितले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ४३० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात ८०९ गावपाडे आहेत. यातील १३२ गावे व ३८७ पाडे आदी ५१९ गावपाडे तीव्र पाणीटंचाईच्या चक्र व्युहात आहेत. यावर मात करण्यासाठी दोन कोटी ६४ लाख रूपये खर्चाची तरतूद जिल्हा प्रशासनाने केली आहे. पण आजपर्यंतही जिल्ह्यातील कोणत्याही गाव पाड्यातून टँकरची मागणी आलेली नसल्याचा दावा धांदवड यांनी केला आहे.