शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

‘त्या’ रुग्णवाहिकांना अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 00:55 IST

तज्ज्ञ डॉक्टर, तंत्रज्ञ यांच्याअभावी केडीएमसीच्या रुग्णालयातील कामकाजाचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यातच दुसरीकडे चालक नसल्याने बहुतांश रुग्णवाहिका या जागेवरच उभ्या आहेत.

कल्याण : तज्ज्ञ डॉक्टर, तंत्रज्ञ यांच्याअभावी केडीएमसीच्या रुग्णालयातील कामकाजाचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यातच दुसरीकडे चालक नसल्याने बहुतांश रुग्णवाहिका या जागेवरच उभ्या आहेत. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाºयांनी मंगळवारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता रोडे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्या वेळी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे त्यांनी सांगितले.केडीएमसीकडे चार जुन्या रुग्णवाहिका, दोन फिरते दवाखाने आणि दोन शववाहिन्या आहेत. चार रुग्णवाहिकांपैकी प्रत्येकी दोन वाहने कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालय आणि डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयाला दिली आहेत. यातील प्रत्येकी एक रुग्णवाहिका सध्या बंद आहे. तर या रुग्णालयांना प्रत्येकी एक फिरता दवाखाना आणि शववाहिनी दिली गेली आहे. या व्यतिरिक्त आमदार गणपत गायकवाड आणि नरेंद्र पवार यांच्या आमदार निधीतून दोन कार्डियक रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत. पण त्या वापराअभावी जागेवर उभ्या आहेत. रुग्णालयाच्या आवारात चालक आणि डॉक्टर, नर्सेसविना खितपत पडलेल्या या रुग्णवाहिकांची पाहणी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, कल्याण शहरअध्यक्ष कौस्तुभ देसाई, शहरसचिव महेश मोरे, सागर जेधे, संजय राठोड आदींनी केली.एकीकडे साथीच्या आजारांनी नागरिक बेजार झाले असताना दुसरीकडे रुग्णालयाच्या आवारात धूळखात पडलेल्या रुग्णवाहिकांबाबत त्यांनी डॉ. रोडे यांची भेट घेत त्यांना विचारणा केली. यावर त्यांनी रुग्णवाहिका चालवण्यासाठी चालक नसल्याकडे लक्ष वेधले. कार्डियक रुग्णवाहिकेसाठी डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचाºयांचीही आवश्यकता आहे, परंतू त्यांचीही कमतरता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर रुग्णवाहिका असूनही गरजू रुग्णांना त्या उपलब्ध करू शकत नाही, याबाबतची खंत पदाधिकाºयांनी या वेळी व्यक्त केली.केवळ ‘शो’बाजी कशाला करता?आमदार निधीतून कार्डियक रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या, परंतु केवळ ‘शो’बाजीनंतर त्यांची काय अवस्था आहे, याची जाणीव आमदारांना नाही. त्यातच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे स्वत: डॉक्टर आहेत. तर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे वैद्यकीय विभागाशी निगडीत असलेले खाते आहे. असे असतानाही रुग्णालयांना भेडसावणारे अपुरे मनुष्यबळ ही एकप्रकारे सत्ताधाºयांसाठी नामुष्की आहे, अशी प्रतिक्रिया मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी ‘लोकमत’ला दिली.