शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

अंबरनाथचे जीआयपी धरण बनले मद्यपींचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:29 IST

धरणाची सुरक्षा रामभरोसे लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथमधील रेल्वेचे जीआयपी धरण सध्या मद्यपींचा अड्डा बनले असून, या ...

धरणाची सुरक्षा रामभरोसे

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : अंबरनाथमधील रेल्वेचे जीआयपी धरण सध्या मद्यपींचा अड्डा बनले असून, या धरणाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे पाहायला मिळत आहे. या धरणाशेजारीच मोठ्या प्रमाणात मद्यपींचा वावर असून, मद्याच्या रिकाम्या बाटल्या, कचरा यांचा खच पडलेला आहे.

अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसी भागातील काकोळे गावाशेजारी रेल्वेने २०० वर्षांपूर्वी धरण बांधले होते. त्या वेळच्या ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेच्या नावाने म्हणजेच जीआयपी या नावाने हे धरण ओळखले जाऊ लागले. याच धरणातून कोळशाच्या इंजिनांना लागणारे पाणी वाहून नेले जात होते. मात्र, कोळशाचे इंजिन बंद झाल्यानंतर अनेक वर्षे हे धरण दुर्लक्षित होते. लालूप्रसाद यादव हे रेल्वेमंत्री झाल्यानंतर त्यांनी या धरणाशेजारी रेल नीरचा कारखाना उभारला आणि हे धरण पुन्हा उपयोगात आले. मात्र, हे धरण शहरापासून जवळ असल्यामुळे या धरणावर दररोज अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या भागांतून नागरिक मोठ्या संख्येने येत असतात, तर मद्यपींचाही मुक्तसंचार धरणाच्या परिसरात असल्याचे उघड झाले आहे. अनेक जण धरणात आंघोळ करण्यासाठी तसेच गाड्या धुण्यासाठीही येतात. या धरणाच्या आजूबाजूला मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडलेला पाहायला मिळतो, तर निर्माल्य आणि अन्य कचराही मोठ्या प्रमाणात धरणाच्या आजूबाजूला पडलेला असतो.

पावसाळ्यात हा सगळा कचरा धरणात वाहून येतो आणि अखेर हेच पाणी रेल्वेच्या प्रकल्पातून प्रवाशांपर्यंत पोहोचवले जाते. त्यामुळे या धरणाची सुरक्षा अतिशय महत्त्वाची आहे. मात्र, असे असतानाही धरणावर रेल्वेकडून एकही सुरक्षारक्षक नेमण्यात आलेला नाही. मद्यपी बिनधास्त धरणाच्या परिसरात उच्छाद घालत असतात. धरणाच्या आजूबाजूला तर अक्षरश: एखाद्या दारूच्या अड्ड्यासारखी परिस्थिती असते. त्यामुळे रेल्वेने वेळीच याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत काकोळे गावचे उपसरपंच नरेश गायकर यांनीही रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, तरीही रेल्वेकडून या धरणाच्या सुरक्षेबाबत गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची त्यांची तक्रार आहे. त्यामुळे एखादी अनुचित घटना घडल्यानंतरच रेल्वेला जाग येणार का, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे.