शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथचे जीआयपी धरण बनले मद्यपींचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:29 IST

धरणाची सुरक्षा रामभरोसे लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथमधील रेल्वेचे जीआयपी धरण सध्या मद्यपींचा अड्डा बनले असून, या ...

धरणाची सुरक्षा रामभरोसे

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : अंबरनाथमधील रेल्वेचे जीआयपी धरण सध्या मद्यपींचा अड्डा बनले असून, या धरणाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे पाहायला मिळत आहे. या धरणाशेजारीच मोठ्या प्रमाणात मद्यपींचा वावर असून, मद्याच्या रिकाम्या बाटल्या, कचरा यांचा खच पडलेला आहे.

अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसी भागातील काकोळे गावाशेजारी रेल्वेने २०० वर्षांपूर्वी धरण बांधले होते. त्या वेळच्या ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेच्या नावाने म्हणजेच जीआयपी या नावाने हे धरण ओळखले जाऊ लागले. याच धरणातून कोळशाच्या इंजिनांना लागणारे पाणी वाहून नेले जात होते. मात्र, कोळशाचे इंजिन बंद झाल्यानंतर अनेक वर्षे हे धरण दुर्लक्षित होते. लालूप्रसाद यादव हे रेल्वेमंत्री झाल्यानंतर त्यांनी या धरणाशेजारी रेल नीरचा कारखाना उभारला आणि हे धरण पुन्हा उपयोगात आले. मात्र, हे धरण शहरापासून जवळ असल्यामुळे या धरणावर दररोज अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या भागांतून नागरिक मोठ्या संख्येने येत असतात, तर मद्यपींचाही मुक्तसंचार धरणाच्या परिसरात असल्याचे उघड झाले आहे. अनेक जण धरणात आंघोळ करण्यासाठी तसेच गाड्या धुण्यासाठीही येतात. या धरणाच्या आजूबाजूला मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडलेला पाहायला मिळतो, तर निर्माल्य आणि अन्य कचराही मोठ्या प्रमाणात धरणाच्या आजूबाजूला पडलेला असतो.

पावसाळ्यात हा सगळा कचरा धरणात वाहून येतो आणि अखेर हेच पाणी रेल्वेच्या प्रकल्पातून प्रवाशांपर्यंत पोहोचवले जाते. त्यामुळे या धरणाची सुरक्षा अतिशय महत्त्वाची आहे. मात्र, असे असतानाही धरणावर रेल्वेकडून एकही सुरक्षारक्षक नेमण्यात आलेला नाही. मद्यपी बिनधास्त धरणाच्या परिसरात उच्छाद घालत असतात. धरणाच्या आजूबाजूला तर अक्षरश: एखाद्या दारूच्या अड्ड्यासारखी परिस्थिती असते. त्यामुळे रेल्वेने वेळीच याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत काकोळे गावचे उपसरपंच नरेश गायकर यांनीही रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, तरीही रेल्वेकडून या धरणाच्या सुरक्षेबाबत गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची त्यांची तक्रार आहे. त्यामुळे एखादी अनुचित घटना घडल्यानंतरच रेल्वेला जाग येणार का, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे.