शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

तौक्ते चक्रीवादळाची सर्वाधिक अडीच कोटींची मदत अंबरनाथ तालुक्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : निसर्ग चक्रीवादळापाठोपाठ तौक्ते चक्रीवादळाने १७ मे रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना फटका बसला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : निसर्ग चक्रीवादळापाठोपाठ तौक्ते चक्रीवादळाने १७ मे रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना फटका बसला आहे. या दरम्यान झालेल्या मनुष्यहानीसह शेती, फळबागा, जनावरे, घरांचे आणि मच्छिमार बांधवांच्या बोटींचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीच्या भरपाईपोटी ठाणे जिल्ह्याला या आधी १२ लाखांची व आता काही दिवसांपूर्वी वाढीव दराने राज्य शासनाने तब्बल सहा कोटी ६८ लाख ४८ हजार अशी सहा कोटी ८० लाख ४८ हजार रुपयांची भरपाई दिली. यात सर्वाधिक अंबरनाथ तालुक्याला दोन कोटी ५० लाख ६१ लाख रुपयांची भरपाई मिळाली आहे

तौक्ते चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या व्यक्तींच्या विविध स्वरूपाच्या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधून केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार नुकसानग्रस्तांना वाढीव दराने भरपाई लागू केली आहे. ‘निसर्ग’ चक्रीवादळामध्ये दिलेल्या दरानुसार ‘तौक्ते’ चक्रीवादळातील बाधित व्यक्तींना मदत देण्याचा निर्णय घेऊन ३ जून रोजी जारी निर्णयानुसार जिल्ह्यातील या नुकसानग्रस्तांना राज्य शासनाने भरपाई दिली आहे. यास अनुसरून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, यांनी जिल्ह्यातील प्रांत व तहसीलदारांना आदेश जारी करून या प्राप्त निधीचे वाटप करण्याचे आदेश जारी केले आहेत.

जिल्ह्यातील ठाणेसह मीरा-भाईंदर, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड, शहापूर, भिवंडी या सर्व तालुक्यांना या तौक्ते चक्रीवादळाचा आर्थिक फटका बसला आहे. यामध्ये मृत व्यक्ती, पिकांचे नुकसान, जनावरांचा मृत्यू, घरांचे पूर्ण व अंशतः झालेले नुकसान मच्छिमारांची जाळी, बोटी, मत्स्य बीज, दुकानदार टपरीधारक, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे जिल्हा ‌प्रशासनाने पंचनामे करून त्यास अनुसरून नुकसानग्रस्तांना, शेतकऱ्यांना, मृतांच्या वारसांना नुकसान भरपाईची रक्कम जिल्ह्यातील तहसीलदारांकडून वाटप करण्यात येत आहे.

------