शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

शाळांना दर दोन वर्षांनी फी वाढवण्याची मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : शाळा दर दोन वर्षांनी शालेय शुल्क १५ टक्क्यांनी वाढवू शकतात, असा कायदा अगोदरच अस्तित्वात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : शाळा दर दोन वर्षांनी शालेय शुल्क १५ टक्क्यांनी वाढवू शकतात, असा कायदा अगोदरच अस्तित्वात आहे. त्या नियमानुसार २०२१-२२ ची फी २०१९-२० पेक्षा १५ टक्क्यांनी फी जास्त असायला हवी होती. शासनाने २०२०-२१ ची फी वाढवू नये, असे आदेश जारी केले होते. म्हणजे, गेल्या वर्षी ७.५ टक्के एवढी फी कपात झाली होती. २०२१-२२ साठी ७.५० टक्के फी वाढ प्रलंबित होती, तीही केली गेलेली नाही. म्हणजे, २०२१-२२ साठी मुळातच १५ टक्के फी कपात केली गेली आहेच. सध्या, खासगी शाळा म्हणजे, नागरिकांसाठी ढोलके झाले आहे. त्यामुळे कोणीही येऊन मागण्या करून जाते, अशी गंभीर अवस्था आहे, असे परखड मत विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित यांनी व्यक्त केले.

सेक्शन ५, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था फी नियंत्रण कायदा हा सरकारला फक्त शासकीय आणि अनुदानित शाळांची फी नियंत्रित करायचे अधिकार देतो. याच कायद्याच्या सेक्शन ६ नुसार, खासगी विनाअनुदानित संस्था, आपापली फी ठरवण्यासाठी सक्षम आहेत. वा एपिडेमिक डिसिज ॲक्ट, एपिडेमिक डिसीज ऑर्डिनन्स सरकारला अशा पद्धतीने कोणतेही परिपत्रक काढण्याचा अधिकार देत नाही, असा दावा पंडित यांनी केला. त्या कायद्यानुसार, दर दोन वर्षांनी शाळा १५ टक्के एवढी फी वाढ करू शकतात. २०१९-२०२० च्या फीमध्ये, २०२१-२०२२ मध्ये १५ टक्के फी वाढ करणे कायदेशीर तरतूद असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शासनाने ८ मे २०२० रोजी, २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात फी वाढ करू नये, असे परिपत्रक काढले, जे २६ जून २०२० ला मुंबई हायकोर्टाचे न्या. उज्ज्वल भुयान, न्या. चगला यांनी अवैध ठरवले होते.

ज्या शाळांनी २०२०-२०२१ आणि २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात कोणतीही फी वाढ केलेली नाही, त्या शाळांनी स्वयं-स्फूर्तीनेच, स्वत:हूनच शाळेची फी १५ टक्के कमी (कपात) ठेवलेली आहे, असा दावा त्यांनी केला. ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती सध्याच्या परिस्थितीमुळे खरोखरच वाईट असेल, तर त्यांनी स्वत:हून शाळेला, फी सवलतीसाठीची विनंती करावी, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने या पूर्वीच दिला आहे, असे ते म्हणाले.

वीज बिल, मालमत्ताकर, इंधनाच्या दरात कपात का नाही?

शाळांकडे फी कपातीची मागणी करणारे पालक खासगी क्लास चालकांकडे फीसंदर्भात हरकत घेत नाहीत. कपात ही वीज बिल, मालमत्ताकर, पाणी बिल, हॉस्पिटलची फी, इंधन अशा अनेक बाबतींत का नाही? फक्त शाळांना का बडवले जाते? कारण ते सोपे असून, झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी राजकारणाला सोयीस्कर असल्याची टीका पंडित यांनी केली.

------------