शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

शैक्षणिक भूखंडांसाठी सर्वपक्षीयांची अभद्र युती

By admin | Updated: June 21, 2017 04:46 IST

अल्प दरात शैक्षणिक भुखंडाचे श्रीखंड खाऊ पाहणाऱ्यांना चाप लावण्याच्या आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या प्रयत्नांना ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी सुरुंग लावून

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : अल्प दरात शैक्षणिक भुखंडाचे श्रीखंड खाऊ पाहणाऱ्यांना चाप लावण्याच्या आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या प्रयत्नांना ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी सुरुंग लावून शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली आपल्याशी संलग्न संस्थांनी अल्पदरात भूखंड पदरात पाडून घेण्याचेच धोरण मंजूर करून घेतले. आता ठाण्यातील सुजाण नागरिक या धरणावर काय भूमिका घेतात, त्याकडे लक्ष लागले आहे.या भूखंडांचे दर वाढवण्यासाठी आयुक्तांनी महासभेत मंजुरीसाठी सुधारित प्रस्ताव ठेवला होता. परंतु, सर्वपक्षीय राजकीय मंडळींनी त्याला केराची टोपली दाखवत जुन्या ठरावानुसारच ते देण्याचा ठराव केला. ठाणे पालिकेने यापूर्वी शैक्षणिक भूखंड हे रेडीरेकनर दर डावलून काही राजकीय मंडळींशी संलग्न असलेल्या शैक्षणिक संस्थांना दिले होते. ही चुक पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या लक्षात आली. त्यांनी याला चाप लावण्याचा निर्णय घेतला. पालिकेने २४ एप्रिल १४ ला शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली. त्यानुसार, शहरातील सात भूखंड स्थानिक तर नऊ भूखंड शहराबाहेरील शैक्षणिक संस्थांना देण्यात आले होते. हे करार करताना भाडेपट्टा अधिमूल्याची रक्कम (बेस प्रिमियम) २०१४ रोजीच्या रेडी रेकनरच्या दरानुसार स्थानिक संस्थांसाठी २० ते २५ टक्के आणि शहराबाहेरील संस्थांकडून ५० टक्के याप्रमाणे घेतली. तसेच, भूखंड वितरित करताना स्थानिक संस्थांना सहा ते ५५ टक्के, तर बाहेरील संस्थांना ३६ ते ५० टक्के सवलतीच्या दरात देण्यात आले आहेत. मात्र, असे भूखंड महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ च्या कलम ७९ अन्वये बाजारभावानुसार वितरित करण्याची तरतूद आहे. भूखंड सवलतीच्या दरात द्यायचे असतील, तर त्याला राज्य सरकारची मंजुरी क्र मप्राप्त आहे. मात्र, अद्याप सरकारने पालिकेच्या ठरावाला मंजुरी दिलेली नाही. २०१४ मध्ये मंजूर झालेले हे धोरण तयार करताना कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट करून प्रशासनाने सुधारित धोरण तयार केले. त्यानुसार बाजारभावानेच पुढील भाडेपट्टा निश्चित करण्याचा पालिका प्रशासनाचा मानस होता. त्यातून पालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली असती आणि भूखंड मिळविणाऱ्या संस्थांना मात्र भूर्दंड सोसावा लागणार होता. त्यामुळे या संस्थांच्या पाठिशी उभे असलेल्या राजकीय नेत्यांचे हितसंबंध बिघडणार होते. डिसेंबर, २०१६ मध्ये प्रशासनाने हा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडला होता. तो मंगळवारी फेटाळण्यात आला.