शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

जिल्ह्यात सर्व शिवभोजन केंद्रांवर दररोज १५ जणांच्या नशिबी थाळी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटपासून मजूर, गोरगरीब यासारख्या गरजूंना राज्य शासनाने ''शिवभोजन'' ही जेवणाची थाळी मोफत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटपासून मजूर, गोरगरीब यासारख्या गरजूंना राज्य शासनाने ''शिवभोजन'' ही जेवणाची थाळी मोफत उपलब्ध करून दिली आहे. या भोजनावर दिवसाला जिल्ह्यातील हजारो लोकांचा उदरनिर्वाह सध्या सुरू आहे. या केंद्रावर निश्चित वेळेवर लाभार्थ्यांची गर्दी पाहण्यालायक असते. मात्र, गर्दीमुळेच जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या केंद्रांवरील जेवण संपल्यामुळे प्रत्येक केंद्रांवरून दररोज १५ ते २० जणांना, तर काही वेळेस ५० जणांना जेवण मिळत नाही. ते उशिरा येत असल्याने त्यांना नाइलाजास्तव रिकाम्या हाती परत जावे लागत असल्याचे वास्तव उघकीस आले आहे.

जिल्ह्यातील शहरी भागात ३७ शिवभोजन केंद्र सुरू आहेत. कोरोना प्रतिबंधात्मकच्या तिसऱ्या स्तरात जिल्ह्यातील जनजीवन वावरत आहे. गरजू, गोरगरीब लक्षात घेऊन या केंद्रांना जिल्ह्यात दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. या केंद्रांना दुसऱ्या लाटेच्या प्रारंभापासून दीडपट थाळी वाटपाची मान्यता मिळालेली आहे. या मोफत थाळ्यांचा लाभ गरजूंना होत आहे. या मोफत थाळीवाटपाची मुदतही गेल्या काही दिवसांपासून संपलेली आहे. पण पुढील आदेश येईपर्यंत ही भोजन थाळी केंद्रचालक मोफत वाटप करीत असल्याचे वास्तव निदर्शनात आले आहे. परंतु, लाभार्थींची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे २०० ते ३०० थाळ्या चुटकी सरशी संपत आहेत. काही लाभार्थी वेळेवर येत नाही. उशिरा आलेल्यांना मात्र या थाळीचा लाभ मिळत नाही.

गरजूंना हक्काची जेवणाची थाळी

या शिवभोजन केंद्रांवर या संचार बंदीच्या कालावधीतही गरजूंना मोफत थाळी मिळत आहे. आता थाळींची संख्याही बहुतांशी ठिकाणी ५० ते १०० ने वाढवली आहे. काही ठिकाणी २०० ते ३०० थाळ्या मोफत वाटप होत आहे. या आधी गरजूंना केवळ पाच रुपयांमध्ये शिवभोजन दिले जात असे. पण आता पैसे घेतले जात नाहीत. जेवण तयार होण्याआधीच गरजूंच्या केंद्रांवर फेऱ्या सुरू होतात. पण आता त्यांना पार्सल द्यावी लागत असल्यामुळे त्यांना केद्रांवर गर्दी करू दिली जात नाही. या पार्सलसाठी लागणाऱ्या पॅकिंगचे डबेदेखील केंद्रांवर दिले जात आहे. केंद्रांवर लाभार्थी संख्या वाढल्याने जेवण लवकर संपत आहे.

---------