शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

ठाण्यात कोरोना नियमांची ऐसी की तैसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध कडक केले आहेत. सायंकाळी चारनंतर अत्यावश्यक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध कडक केले आहेत. सायंकाळी चारनंतर अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर दुकाने बंद करावीत, असेही स्पष्ट केले आहे. परंतु, ठाण्यात या नियमांची ऐसी की तैसी झाली असून, महापालिका आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने आणि हॉटेलदेखील चार नंतर बिनधास्त सुरू आहेत. काही ठिकाणी अर्धवट शटर सुरू ठेवून ठाणे महापालिकेच्या नाकावर टिच्चून व्यवहार सुरू असून, शनिवार-रविवारी पूर्णपणे लॉकडाऊन सांगितले जात असेल तरी येऊरला मात्र या दोन्ही दिवशी पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहत आहे. त्याकडेही पालिका आणि अन्य कोणाकडूनही कारवाई होताना दिसत नाही.

ठाण्यात आतापर्यंत एक लाख ३३ हजार १६४ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, यातील एक लाख ३० हजार १३० जण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७२ एवढे आहे. २०३७ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. ठाण्याचा मृत्युदर हा १.५३ टक्के एवढा आहे. परंतु, येत्या काही महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याने ठाणे शहर दुसऱ्या स्तरात असतानाही राज्य शासनाच्या निर्बंधांना तिसऱ्या स्तरात गेले आहे. त्यानुसार कोरोना नियम अतिशय कठोर केले आहेत. परंतु, त्यांना धाब्यावर बसवून ठाणेकरांनी सर्व व्यवहार जोमात सुरूच ठेवले आहेत.

चारनंतरही शहराच्या मध्यवर्ती भागासह घोडबंदर, कळवा, मुंब्रा, वागळे आदींसह महापालिका मुख्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरातही दुकाने सुरू दिसत आहेत. चारनंतर हॉटेलदेखील अनेक भागांत सुरू असल्याचे वास्तव आहे. पार्सलची सुविधा असतानाही चार नंतरही हॉटेलमध्ये नागरिकांचा वावर वाढत आहे. काही ठिकाणी दुकानेच किंवा हॉटेलचे शटर अर्धवट ठेवून व्यवहार सुरू ठेवण्यात येत आहेत. बाजारपेठेतही गर्दी वाढताना दिसत आहे. कुठेही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. जांभळीच्या मार्केटमध्येही गर्दीच गर्दी होत आहे. तिकडे येऊरला तर महापालिका आणि पोलिसांकडून झालेल्या ढिलाईमुळे ठाणेकरांकडून नियमावलीस पायदळी तुडविले जात आहे.

........

या संदर्भात महापालिका आयुक्त आणि पोलीस प्रशासनाबरोबर चर्चा करून राज्य शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत. त्यांचे पालन झाले पाहिजे त्या अनुषंगाने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. नियमांची कडक अंमलबजावणीसाठी कारवाई करा, असेही सांगणार आहे.

नरेश म्हस्के, महापौर, ठामपा