शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

गावे वगळण्यासाठी पुन्हा संघर्ष

By admin | Updated: December 21, 2015 23:38 IST

वसई-विरार महापालिकेतून गावे वगळण्यासाठी ग्रामस्थांनी २००९ प्रमाणे पुन्हा एकत्र यावे, असे आवाहन जन आंदोलन समितीने निर्मळ येथील चौक सभेत केले.

वसई : वसई-विरार महापालिकेतून गावे वगळण्यासाठी ग्रामस्थांनी २००९ प्रमाणे पुन्हा एकत्र यावे, असे आवाहन जन आंदोलन समितीने निर्मळ येथील चौक सभेत केले.महापालिकेतून २९ गावे वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, त्यानंतर या निर्णयात बहुजन विकास आघाडीने खो घालून गावे महापालिकेतच राहू दिली. आता तर उर्वरीत २१ गावेही महापालिकेत समाविष्ट करावीत अशी मागणी आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर आणि विलास तरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे गावांचे अस्तित्व नष्ट होवून घर बांधण्यासाठीही ग्रामस्थांना महापालिकेकडे याचना करावी लागणार आहे. त्यामुळे २००९ सारखे सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन निर्मळ येथील एका चौक सभेत करण्यात आले.जन आंदोलनाचे कार्याध्यक्ष मिलींद खानोलकर, शिवा किणी, टोनी डाबरे, सुनील डिसील्वा, समीर वर्तक, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजय पाटील, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते विनायक निकम, संजय कोळी, उदय चेंदवणकर, डॉमनिका डाबरे, विन्सेंट परेरा, टेंभी-कोल्हापुरच्या सरपंचा पूजा घोडविंदे आदि पदाधिकारी या सभेला उपस्थित होते.