शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
11
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
12
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
13
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
14
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
15
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
16
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
17
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
18
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
19
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
20
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला

शेळ्या, अवजारे वाटप भ्रष्टाचारप्रकरणी दहा दिवसात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे / मुरबाड : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून शेळ्यांच्या वाटपासह कृषी विभागाच्या शेती अवजारे बँक साहित्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे / मुरबाड : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून शेळ्यांच्या वाटपासह कृषी विभागाच्या शेती अवजारे बँक साहित्य वाटपात मुरबाड तालुक्यात भ्रष्टाचार झाला आहे. या योजनांच्या लाभार्थी आदिवासी महिला बचत गटाऐवजी अन्य बचत गटास लाभ देऊन साडेसात लाखांचा भ्रष्टाचार झाला आहे. त्याविरोधात दहा दिवसांत कारवाई करण्याचे लेखी आश्वासन ठाणे जिल्हा परिषदेने सोमवारी दिले. दोषींवर कारवाई न केल्यास ॲट्राॅसिटीखाली गुन्हा दाखल करण्याचा इशारा वंचित महिला बचत गटाने आता दिला आहे.

‘निवड एका बचत गटाची; तर लाभ भलत्यालाच’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने १५ मार्चला वृत्त प्रसिद्ध करून हा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला. त्याची दखल घेऊन श्रमिक मुक्ती संघटनेच्या नेतृत्त्वाखाली आदिवासी महिलांनी एकत्र येऊन मुरबाड पंचायत समिती कार्यालयास घेराव घालून सोमवारी आंदोलन केले. जिल्हा परिषदेच्या लेखी आश्वासनाशिवाय त्यांनी आंदोलन मागे घेतले नाही. अखेर दहा दिवसांत कारवाईचे आश्वासन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते यांनी दिले. त्यानंतरही या अन्यायग्रस्त बचत गटाच्या महिलांनी २५ मार्चनंतर दोषींवर ॲट्रॉसिटीखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनेच्या ॲड. इंदवी तुळपुळे यांनी केली आहे.

मुरबाड तालुक्यातील मौजे शेलगाव येथील आदिवासी कातकरी महिला बचत गटाची निवड होऊनही त्यातील महिलांना दोन लाख ५० हजार रुपये किमतीच्या शेळ्यांचा गट व कृषी कामासाठी लागणाऱ्या पाच लाख रुपये किमतीचे शेती अवजारांचा लाभ आदिवासी महिलांना दिला नाही. या रकमांचा लाभ अन्य बिगर आदिवासी शेतकरी महिला बचत गटाला देऊन भ्रष्टाचार केला आहे. हे साहित्य व शेळ्यांचे वाटप केल्याचे प्रशासनाकडून भासवले जात आहे. मात्र, असे काहीही झाले नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

---------------------------------------

जिल्हा परिषदेच्या कारवाईकडे लक्ष

जिल्हा परिषद सेस फंडातील या योजनांच्या रकमा अन्य बचत गटातील महिलांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय त्या रकमा वसूलही केल्याचे प्रशासनाकडून ऐकवण्यात आले. मात्र, या रकमाही वसूल झालेल्या नसल्याची चर्चा असून, आदिवासी महिलांच्या नावाखाली जिल्हा परिषदेच्या या योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे बोलले जात आहे. यावर आता जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद संबंधितांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.