शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

जिल्ह्यातील ८८० विधवा संजय गांधी योजनेच्या लाभापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:45 IST

ठाणे : कोरोनामुळे जिल्ह्यातील ९४५ महिलांचे पती दगावल्याची माहिती संकलित केली आहे. यापैकी ६६ महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा ...

ठाणे : कोरोनामुळे जिल्ह्यातील ९४५ महिलांचे पती दगावल्याची माहिती संकलित केली आहे. यापैकी ६६ महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित ८८० महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी तातडीने पूर्तता करावी, असे निर्देश उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे गुरुवारी संबंधित प्रशासनाला दिले.

कोरोनामुळे एकल, विधवा झालेल्या महिलांचे योग्य पुनर्वसन करण्यासाठी स्थापन झालेल्या जिल्हास्तरीय कृती समितीची चौथी बैठक गुरुवारी पार पडली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले.

ठिकठिकाणच्या प्रशासनाकडून या महिलांची माहिती जिल्हा प्रशासन संकरित करीत आहे. त्यांच्या उदनिर्वाहाच्या दृष्टीने त्यांना प्रशिक्षण देऊन एमआयडीसीमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. त्यासाठी त्यांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या महिलांना स्वयंपूर्ण, सक्षम करण्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. याद्वारे या महिला स्वतः काम करून घर चालवू शकतील. तसेच त्यांना रोजगार मिळावा, यासाठी एमआयडीसीमधील विविध कंपन्यांशी संपर्क साधून योजना तयार करावी, असेही ठोंबरे म्हणाले.

यावेळी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी महेंद्र गायकवाड, उल्हानगर महानगरपालिकेच्या उपायुक्त प्रियंका राजपूत, उपशिक्षणाधिकारी ललिता कवडे, सहायक पोलीस आयुक्त जगदीश सातव, आदींसह तहसीलदार सुरेंद्र ठाकूर, महिला व बालकल्याण अधिकारी संजय खंडागळे, बालविकास प्रकल्प अधिकारी अशोक बागुल यांच्यासह महानगरपालिका, पोलीस, जिल्हा परिषद, आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

------------