शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

जिल्ह्यातील ८८० विधवा संजय गांधी योजनेच्या लाभापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:39 IST

ठाणे : कोरोनामुळे जिल्ह्यातील ९४५ महिलांचे पती दगावल्याची माहिती संकलित केली आहे. यापैकी ६६ महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा ...

ठाणे : कोरोनामुळे जिल्ह्यातील ९४५ महिलांचे पती दगावल्याची माहिती संकलित केली आहे. यापैकी ६६ महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित ८८० महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी तातडीने पूर्तता करावी, असे निर्देश उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे गुरुवारी संबंधित प्रशासनाला दिले.

कोरोनामुळे एकल, विधवा झालेल्या महिलांचे योग्य पुनर्वसन करण्यासाठी स्थापन झालेल्या जिल्हास्तरीय कृती समितीची चौथी बैठक गुरुवारी पार पडली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले.

ठिकठिकाणच्या प्रशासनाकडून या महिलांची माहिती जिल्हा प्रशासन संकरित करीत आहे. त्यांच्या उदनिर्वाहाच्या दृष्टीने त्यांना प्रशिक्षण देऊन एमआयडीसीमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. त्यासाठी त्यांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या महिलांना स्वयंपूर्ण, सक्षम करण्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. याद्वारे या महिला स्वतः काम करून घर चालवू शकतील. तसेच त्यांना रोजगार मिळावा, यासाठी एमआयडीसीमधील विविध कंपन्यांशी संपर्क साधून योजना तयार करावी, असेही ठोंबरे म्हणाले.

यावेळी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी महेंद्र गायकवाड, उल्हानगर महानगरपालिकेच्या उपायुक्त प्रियंका राजपूत, उपशिक्षणाधिकारी ललिता कवडे, सहायक पोलीस आयुक्त जगदीश सातव, आदींसह तहसीलदार सुरेंद्र ठाकूर, महिला व बालकल्याण अधिकारी संजय खंडागळे, बालविकास प्रकल्प अधिकारी अशोक बागुल यांच्यासह महानगरपालिका, पोलीस, जिल्हा परिषद, आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

------------