शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ८२२ रुग्ण सापडले; ५२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:29 IST

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे गुरुवारी ८२२ रुग्ण आढळले असून ५२ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात पाच लाख १३ ...

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे गुरुवारी ८२२ रुग्ण आढळले असून ५२ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात पाच लाख १३ हजार ५४८ बाधितांची नोंद झाली असून मृतांची संख्या नऊ हजार ६१ झाली आहे.

ठाणे शहरात १५४ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता एक लाख २८ हजार ४३७ झाली. शहरात सात मृत्यू झाल्यामुळे मृत्यूंची संख्या एक हजार ८७७ नोंदवण्यात आली. कल्याण - डोंबिवलीत १९९ रुग्णांची वाढ झाली असून २३ मृत्यू झाले आहेत. आता एक लाख ३२ हजार ४१९ रुग्ण बाधित असून एक हजार ९२१ मृत्यूंची नोंंद झाली आहे. उल्हासनगरला ५३ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या २० हजार २५६ झाली असून ४६९ मृतांची नोंद आहे. भिवंडीला सात बाधित असून मृत्यू नाही. आता बाधित १० हजार ४२४ असून मृतांची संख्या ४३६ झाली आहे. मीरा-भाईंदरमध्ये १३९ रुग्ण आढळले असून चार मृत्यू आहेत. या शहरात बाधितांची संख्या ४८ हजार ६१३ असून मृतांची संख्या एक हजार २६१ वर गेली आहे.

अंबरनाथमध्ये २० रुग्ण आढळल्याने आता बाधित १९ हजार २०४ असून दोन मृत्यू आहेत. येथील मृत्यूंची संख्या ४०५ झाली आहे. बदलापूरमध्ये ४० रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या २० हजार ४७६ झाली आहे. या शहरात तीन मृत्यू झाल्याने मृत्यूंची संख्या २५३ झाली आहे. ग्रामीणमध्ये ११५ रुग्णांची वाढ झाली असून सात मृत्यू आहेत. आता बाधित ३६ हजार ३३ झाले असून आतापर्यंत ८६० मृत्यू झाले आहेत.