शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येसंदर्भात दररोज ८ कॉल्स

By admin | Updated: September 15, 2016 02:16 IST

निराशेच्या गर्तेत सापडल्याने आत्महत्येचे विचार मनात घोळत असलेल्यांना त्यापासूून परावृत्त करण्याकरिता सुरू केलेल्या हेल्पलाइनला चार वर्षांपूर्वी दिवसाकाठी जेमतेम दोनजणांचे

जान्हवी मोर्ये , डोंबिवलीनिराशेच्या गर्तेत सापडल्याने आत्महत्येचे विचार मनात घोळत असलेल्यांना त्यापासूून परावृत्त करण्याकरिता सुरू केलेल्या हेल्पलाइनला चार वर्षांपूर्वी दिवसाकाठी जेमतेम दोनजणांचे फोन येत होते. आता आत्महत्येचा विचार करणारे ८ जण दररोज फोन करतात. समाजातील भीषण नैराश्याचे हे वास्तव आहे. गणेशोत्सवाच्या काळात आलेल्या १० सप्टेंबर रोजीच्या ‘जागतिक आत्महत्याविरोधी दिना’चे औचित्य साधून मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी कल्याण, डोंबिवली, कळवा, ठाणे परिसरांतील गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन आत्महत्या रोखण्याबाबत जनजागृती केली. ३० गणेशोत्सव मंडळांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. त्यांनी दिलेल्या हेल्पलाइनला दूरध्वनी केले जात आहेत.डॉ. सारा दस्तुर यांनी १ मे १९९३ ला नैराश्यग्रस्तांना भावनिक आधार देता यावा, म्हणून या हेल्पलाइनची स्थापना केली. गेल्या २३ वर्षांपासून ही हेल्पलाइन सुरू आहे. तिचे आॅफिस दादरला आहे. ३ ते ९ या वेळेत ही हेल्पलाइन सुरू असते. २८ स्वयंसेवक सर्व काम पाहतात. चार वर्षांपूर्वी महिन्याला कॉल्सचे प्रमाण ७० इतके होते. आजमितीस २५० पेक्षा जास्त कॉल्स येतात. कॉल्स केलेल्यांचे समुपदेशन केले जाते. स्वयंसेवक त्याची माहिती गुप्त ठेवतात. कुठेही ओळख उघड केली जात नाही. स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जाते. वाढलेल्या कॉल्समुळे समाजाचे स्वास्थ्य बिघडत असून आत्महत्येचा विचार वाढतो आहे, असे हेल्पलाइनवरील समुपदेशक मृणालिनी ओक यांनी सांगितले. मानसशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या व या उपक्रमात सक्रिय सहभाग असलेल्या नमिता सारंग यांनी सांगितले की, गणेशोत्सवात पथनाट्ये, बॅनर्स आणि हेल्पलाइन याद्वारे जनजागृती करण्यात आली. समाजाची जीवनशैली बदलत असल्याने काही लोकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे. रोजच्या जीवनातील ताणतणाव वाढले आहे. परिणामी, अनेकांच्या मनात आत्महत्येचे विचार येतात. समाजाचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी ही मोहीम राबवली गेली. तिला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘तो’ आत्महत्येपासून परावृत्त झाला...दादर येथील ‘समरटन्स मुंबई’ या हेल्पलाइनवर एका तरुणाचा कॉल आला. त्याचे एका अल्पवयीन मुलीवर प्रेम जडले होते. त्याचे शिक्षण नुकतेच संपले होते. त्याला नोकरी लागली होती. मात्र, ती सुमार दर्जाची असल्याचे मुलीच्या घरच्या मंडळींचे मत होेते. मुलगा मुलीचा सांभाळ नीट करणार नाही, असे मुलीच्या पालकांचे मत होते. मुलगी सुंदर होती. मुलीच्या घरच्या मंडळींनी त्यांच्या प्रेमविवाहाला कडाडून विरोध केला. मुलीचे लग्न दिल्लीस्थित एका मुलासोबत लावून दिले. परिणामी, वैफल्यग्रस्त झालेल्या त्या तरुणाच्या मनात दिल्लीला जाऊन राडा करण्याचा विचार येत होता. तसेच तिच्याशिवाय जीवन कसे जगणार, या विचाराने तो कासावीस झाला होता. अशा भावनिक कल्लोळामुळे त्याच्या मनात आत्महत्येचा विचार येत होता. मात्र, त्याने हेल्पलाइनला फोन केला आणि समुपदेशानंतर आत्महत्येचा विचार सोडला. हे एक प्रातिनिधिक उदाहरण असून अनेकांना या उपक्रमाचा लाभ झाला आहे.