शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

६७ हजार ८५५ जणांना मोतीबिंदू

By admin | Updated: June 22, 2017 00:00 IST

ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात २०१६-१७ या वर्षभरात एकूण ६७ हजार ८५५ जणांवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे

पंकज रोडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात २०१६-१७ या वर्षभरात एकूण ६७ हजार ८५५ जणांवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यामध्ये दिलेल्या उद्दीष्टापैकी ठाणे जिल्ह्याने ८८ टक्के तर पालघर जिल्ह्याने ७७ टक्के उद्दीष्ट पूर्ण केल्याची माहिती ठाणे जिल्हा नेत्र विभागाने दिली आहे. वाढत्या वयोमानानुसार, प्रत्येक माणसामध्ये मोतीबिंदू यासारख्या आजाराची लक्षणे दिसू लागतात. त्यातच, शासनाने मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी प्रत्येक जिल्ह्याला ठराविक उद्दीष्ट निश्चित करून दिले जाते. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यासाठी २०१६-१७ यावर्षासाठी ५८ हजार ०५३ तर पालघर जिल्ह्यासाठी २१ हजार ५२६ मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट दिले होते. ते पूर्ण करण्यासाठी ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी.केम्पीपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील ठाणे सिव्हील रुग्णालयात महिन्यातून आठ दिवस तर उल्हासनगरमध्ये चार दिवस आणि शहापूरात दोन दिवस तसेच पालघर जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून जव्हार येथे महिन्यातून दोन दिवस याबाबत शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यातील ५१ हजार २८४ तर पालघर जिल्ह्यातील १६ हजार ५७१ जणांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ती केल्यानंतर लेन्स लावण्यात येते.