शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
4
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
5
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
6
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
7
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
8
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
9
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
10
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
11
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
12
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
13
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
14
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
15
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
16
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
17
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
18
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
19
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
20
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली

वसईतून ६ विद्यार्थी बेपत्ता

By admin | Updated: September 14, 2016 04:16 IST

वसई विरार परिसरातून दोन दिवसात तब्बल सहा अल्पवयीन शाळकरी मुले बेपत्ता झाली आहेत. यात तीन मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे.

विरार : वसई विरार परिसरातून दोन दिवसात तब्बल सहा अल्पवयीन शाळकरी मुले बेपत्ता झाली आहेत. यात तीन मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. नालासोपारा पश्चिमेकडून अब्दुल समीद बिलाल शेख(१३) हा आपल्या राहत्या घराजवळून रविवारी दुपारी दोनच्या सुमारास गायब झाला असल्याची तक्रार त्याची आई बिल्किसबानो शेख हिने केली आहे.वालीव येथे भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महेशकुमार सिंह यांचा मुलगा ऐश्वर्य महेशकुमार सिंह (१२) हा रविवारी दुपारी एकच्या सुमारास नायगाव येथे आपल्या मित्राच्या घरी गेला होता. मात्र, तो घरी परतला नसल्याने वालीव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. रविवारी वसई पूर्व येथून प्रमिला अनंतकुमार पाठक(१५) ही शेजारीच राहणाऱ्या साकीर अन्सारी(११) हिच्या सोबत नाक्यावरून गणपतींसाठी फुलांचा हार आणण्यासाठी सायंकाळी साडेपाच वाजता गेली होती. त्या दोघी पुन्हा परतल्याच नाहीत. म्हणून प्रमिलाची आई गीता अनंतकुमार पाठक हिने वालीव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.नालासोपारा पूर्वेकडे राहणारी रविना सॅलियन (१४) ही सोमवारी रात्री घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार तिची आई ममता हिने तुळींज पोलीस ठाण्यात दिली आहे. तर दुसऱ्या एका घटनेत अर्नाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आगाशी नाका येथील प्रकाश शंकरलाल तेली (१६) हा बेपत्ता झाल्याची तक्रार शंकरलाल तेली यांनी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. विशेष सर्व बेपत्ता मुले शाळेत शिकणारी आहेत. (वार्ताहर)