शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्यासाठी ५२ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:43 IST

ठाणे : राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था बळकट व्हाव्यात यासाठी केंद्र सरकार आयोगाच्या मार्फत दरवर्षी कोट्यवधींचे अनुदान देते. यानुसार ...

ठाणे : राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था बळकट व्हाव्यात यासाठी केंद्र सरकार आयोगाच्या मार्फत दरवर्षी कोट्यवधींचे अनुदान देते. यानुसार १५ वित्त आयोगांतर्गत ठाणे आणि पालघर जिल्ह्याला २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता बंधीत अनुदानाचा ५१ कोटी ८४ लाख ५३ हजार रुपयांचा पहिला हप्ता बुधवारी राज्याच्या ग्राम विकास विभागाने वितरित केला आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना हे अनुदान वाटून मिळणार असून यात जि.प. व पंचायत समित्यांचा हिस्सा प्रत्येकी १० टक्के, तर ग्रामपंचायतींचा वाटा ८० टक्के असल्याने दोन्ही जिल्ह्यातील ग्रामपंचायती मालामाल होणार आहेत.

यात ठाणे जिल्ह्याला १९ कोटी ७१ लाख ६२ हजार रुपये मिळणार असून त्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा वाटा प्रत्येकी एक कोटी ९७ लाख १६ हजार, तर ग्रामपंचायतींचा वाटा १५ कोटी ७७ लाख ३० रुपये असणार आहे. अशाच प्रकारे पालघर जिल्ह्याला ३२ कोटी १२ लाख ९१ हजार रुपये वितरित केले असून यात पालघर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांचा वाटा प्रत्येकी तीन कोटी २१ लाख २९ हजार, तर ग्रामपंचायतींचा वाटा २५ कोटी ७० लाख ३३ हजार रुपये असणार आहे.

१५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार हे अनुदान थेट ग्रामपंचायतींच्या खात्यात जमा होणार असल्याने त्यांना आता पंचायत समित्या जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजविण्याची गरज नाही. आयोगाच्या शिफारशीनुसार या अनुदानातून ग्रामपंचातींनी स्वच्छता आणि हगणदारीमुक्त स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थिती कायम ठेवणे, देखभाल दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. याशिवाय पेयजल पुरवठा, जलपुनर्भरण, पावसाचे पाणी साठवणे, त्यावर पुनप्रक्रिया करणे अशी कामे करण्याची बंधने घातली आहेत. शिवाय यासंबंधित जिल्हा परिषद, पंचायत समित्या वा ग्रामपंचायतींना प्राप्त निधीपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यास मनाई केली आहे.

आगामी पाच वर्षे मिळणार अनुदान

ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था बळकट व्हाव्यात यासाठी केंद्र सरकार १५ वित्त आयोगामार्फत दरवर्षी हे कोट्यवधींचे अनुदान देणार आहे. यावर्षीचा पहिला हप्ता आता वितरित केला असून ते अनुदान आगामी पाच वर्षांपर्यंत देण्यात येणार आहे.

-------------------