शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

पाणीपुरवठ्यासाठी ५२ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:43 IST

ठाणे : राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था बळकट व्हाव्यात यासाठी केंद्र सरकार आयोगाच्या मार्फत दरवर्षी कोट्यवधींचे अनुदान देते. यानुसार ...

ठाणे : राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था बळकट व्हाव्यात यासाठी केंद्र सरकार आयोगाच्या मार्फत दरवर्षी कोट्यवधींचे अनुदान देते. यानुसार १५ वित्त आयोगांतर्गत ठाणे आणि पालघर जिल्ह्याला २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता बंधीत अनुदानाचा ५१ कोटी ८४ लाख ५३ हजार रुपयांचा पहिला हप्ता बुधवारी राज्याच्या ग्राम विकास विभागाने वितरित केला आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना हे अनुदान वाटून मिळणार असून यात जि.प. व पंचायत समित्यांचा हिस्सा प्रत्येकी १० टक्के, तर ग्रामपंचायतींचा वाटा ८० टक्के असल्याने दोन्ही जिल्ह्यातील ग्रामपंचायती मालामाल होणार आहेत.

यात ठाणे जिल्ह्याला १९ कोटी ७१ लाख ६२ हजार रुपये मिळणार असून त्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा वाटा प्रत्येकी एक कोटी ९७ लाख १६ हजार, तर ग्रामपंचायतींचा वाटा १५ कोटी ७७ लाख ३० रुपये असणार आहे. अशाच प्रकारे पालघर जिल्ह्याला ३२ कोटी १२ लाख ९१ हजार रुपये वितरित केले असून यात पालघर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांचा वाटा प्रत्येकी तीन कोटी २१ लाख २९ हजार, तर ग्रामपंचायतींचा वाटा २५ कोटी ७० लाख ३३ हजार रुपये असणार आहे.

१५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार हे अनुदान थेट ग्रामपंचायतींच्या खात्यात जमा होणार असल्याने त्यांना आता पंचायत समित्या जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजविण्याची गरज नाही. आयोगाच्या शिफारशीनुसार या अनुदानातून ग्रामपंचातींनी स्वच्छता आणि हगणदारीमुक्त स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थिती कायम ठेवणे, देखभाल दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. याशिवाय पेयजल पुरवठा, जलपुनर्भरण, पावसाचे पाणी साठवणे, त्यावर पुनप्रक्रिया करणे अशी कामे करण्याची बंधने घातली आहेत. शिवाय यासंबंधित जिल्हा परिषद, पंचायत समित्या वा ग्रामपंचायतींना प्राप्त निधीपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यास मनाई केली आहे.

आगामी पाच वर्षे मिळणार अनुदान

ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था बळकट व्हाव्यात यासाठी केंद्र सरकार १५ वित्त आयोगामार्फत दरवर्षी हे कोट्यवधींचे अनुदान देणार आहे. यावर्षीचा पहिला हप्ता आता वितरित केला असून ते अनुदान आगामी पाच वर्षांपर्यंत देण्यात येणार आहे.

-------------------