शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ५१२ रुग्ण सापडले, ३४ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:30 IST

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे सोमवारी ५१२ रुग्ण आढळले असून, ३४ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात पाच लाख १६ हजार ...

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे सोमवारी ५१२ रुग्ण आढळले असून, ३४ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात पाच लाख १६ हजार ३६४ बाधितांची नोंद झाली असून, मृतांची संख्या नऊ हजार २४८ झाली आहे.

ठाणे शहरात ११२ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता एक लाख २८ हजार ९८० झाली. शहरात चार मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ९०१ नोंदण्यात आली. कल्याण-डोंबिवलीत १२७ रुग्णांची वाढ झाली असून, १८ मृत्यू झाले आहेत. आता एक लाख ३३ हजार ४५ रुग्ण बाधित असून, दोन हजार पाच मृत्यूची नोंंद झाली आहे.

उल्हासनगरला १७ रुग्ण सापडले असून, एकही मृत्यू नाही . येथील बाधितांची संख्या २० हजार ४१५ झाली तर, ४७३ मृतांची नोंद कायम आहे. भिवंडीला तीन बाधित असून एकही मृत्यू नाही. आता बाधित १० हजार ४५८ असून मृताची संख्या ४३९ कायम आहे. मीरा-भाईंदरमध्ये ७१ रुग्ण आढळले असून, तीन मृत्यू झाले आहेत. या शहरात बाधितांची संख्या ४८ हजार ९८१ असून, मृतांची संख्या एक हजार २७५ झाली.

अंबरनाथमध्ये १४ रुग्ण आढळल्याने आता बाधित १८ हजार २९६ झाले असून, एकही मृत्यू नाही. येथील मृत्यूची संख्या ४०७ कायम आहे. बदलापूरमध्ये २६ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधित २० हजार ५८४ झाले आहेत. येथेही एकही मृत्यू झालेला नसल्याने मृत्यूची संख्या २५४ कायम आहे. ग्रामीणमध्ये ८५ रुग्णांची वाढ झाली असून, पाच मृत्यू झाले. आता बाधित ३६ हजार ५४८ तर आतापर्यंत ८८८ मृत्यू झाले आहेत.