शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
7
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
8
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
9
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
10
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
11
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
12
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
13
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
14
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
15
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
16
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
17
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
18
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
19
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
20
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ५१२ रुग्ण सापडले, ३४ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:30 IST

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे सोमवारी ५१२ रुग्ण आढळले असून, ३४ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात पाच लाख १६ हजार ...

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे सोमवारी ५१२ रुग्ण आढळले असून, ३४ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात पाच लाख १६ हजार ३६४ बाधितांची नोंद झाली असून, मृतांची संख्या नऊ हजार २४८ झाली आहे.

ठाणे शहरात ११२ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता एक लाख २८ हजार ९८० झाली. शहरात चार मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ९०१ नोंदण्यात आली. कल्याण-डोंबिवलीत १२७ रुग्णांची वाढ झाली असून, १८ मृत्यू झाले आहेत. आता एक लाख ३३ हजार ४५ रुग्ण बाधित असून, दोन हजार पाच मृत्यूची नोंंद झाली आहे.

उल्हासनगरला १७ रुग्ण सापडले असून, एकही मृत्यू नाही . येथील बाधितांची संख्या २० हजार ४१५ झाली तर, ४७३ मृतांची नोंद कायम आहे. भिवंडीला तीन बाधित असून एकही मृत्यू नाही. आता बाधित १० हजार ४५८ असून मृताची संख्या ४३९ कायम आहे. मीरा-भाईंदरमध्ये ७१ रुग्ण आढळले असून, तीन मृत्यू झाले आहेत. या शहरात बाधितांची संख्या ४८ हजार ९८१ असून, मृतांची संख्या एक हजार २७५ झाली.

अंबरनाथमध्ये १४ रुग्ण आढळल्याने आता बाधित १८ हजार २९६ झाले असून, एकही मृत्यू नाही. येथील मृत्यूची संख्या ४०७ कायम आहे. बदलापूरमध्ये २६ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधित २० हजार ५८४ झाले आहेत. येथेही एकही मृत्यू झालेला नसल्याने मृत्यूची संख्या २५४ कायम आहे. ग्रामीणमध्ये ८५ रुग्णांची वाढ झाली असून, पाच मृत्यू झाले. आता बाधित ३६ हजार ५४८ तर आतापर्यंत ८८८ मृत्यू झाले आहेत.