शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ५१२ रुग्ण सापडले, ३४ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:30 IST

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे सोमवारी ५१२ रुग्ण आढळले असून, ३४ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात पाच लाख १६ हजार ...

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे सोमवारी ५१२ रुग्ण आढळले असून, ३४ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात पाच लाख १६ हजार ३६४ बाधितांची नोंद झाली असून, मृतांची संख्या नऊ हजार २४८ झाली आहे.

ठाणे शहरात ११२ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता एक लाख २८ हजार ९८० झाली. शहरात चार मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ९०१ नोंदण्यात आली. कल्याण-डोंबिवलीत १२७ रुग्णांची वाढ झाली असून, १८ मृत्यू झाले आहेत. आता एक लाख ३३ हजार ४५ रुग्ण बाधित असून, दोन हजार पाच मृत्यूची नोंंद झाली आहे.

उल्हासनगरला १७ रुग्ण सापडले असून, एकही मृत्यू नाही . येथील बाधितांची संख्या २० हजार ४१५ झाली तर, ४७३ मृतांची नोंद कायम आहे. भिवंडीला तीन बाधित असून एकही मृत्यू नाही. आता बाधित १० हजार ४५८ असून मृताची संख्या ४३९ कायम आहे. मीरा-भाईंदरमध्ये ७१ रुग्ण आढळले असून, तीन मृत्यू झाले आहेत. या शहरात बाधितांची संख्या ४८ हजार ९८१ असून, मृतांची संख्या एक हजार २७५ झाली.

अंबरनाथमध्ये १४ रुग्ण आढळल्याने आता बाधित १८ हजार २९६ झाले असून, एकही मृत्यू नाही. येथील मृत्यूची संख्या ४०७ कायम आहे. बदलापूरमध्ये २६ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधित २० हजार ५८४ झाले आहेत. येथेही एकही मृत्यू झालेला नसल्याने मृत्यूची संख्या २५४ कायम आहे. ग्रामीणमध्ये ८५ रुग्णांची वाढ झाली असून, पाच मृत्यू झाले. आता बाधित ३६ हजार ५४८ तर आतापर्यंत ८८८ मृत्यू झाले आहेत.