शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

५०० कोटी रुपयांचा घोटाळा

By admin | Updated: January 14, 2017 06:16 IST

मीरा रोड आणि काशिमीरा येथील कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपींवर आरोप निश्चितीसाठी

ठाणे : मीरा रोड आणि काशिमीरा येथील कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपींवर आरोप निश्चितीसाठी तसेच यातील गुन्हा शाबितीसाठी भक्कम पुरावे गोळा करण्यासाठी ठाणे पोलिसांनी अमेरिकन न्यायालयामार्फत संबंधित पीडितांचे जबाब मिळवून देण्याची मागणी एका पत्राद्वारे केली आहे. ठाणे न्यायालयाने हे पत्र आता अमेरिकन न्यायालयाला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली.व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (व्हीओआयपी) या सेवेद्वारे अमेरिकन नागरिकांना गंडा घालून त्यांच्याकडून पाच कोटी ९१ लाख ५० हजार ७०४ इतकी रक्कम उकळल्याचे ७४ पैकी सात जणांच्या चौकशीत उघड झाले आहे. त्यांनी बनवलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या सखोल पडताळणीमध्ये ही माहिती उघड झाल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाने ठाणे न्यायालयात सांगितले.संपूर्ण देशातच नव्हे तर अमेरिकेतही खळबळ उडवून देणाऱ्या या फसवणुकीच्या तपासातील एकेक धागा उलगडण्यासाठी पोलिसांना आता यातील अमेरिकेतील पीडितांचाही शोध घ्यावा लागत आहे. त्यासाठी काशिमीरा आणि मीरा रोड येथील कॉल सेंटरमध्ये मिळालेल्या संगणक तसेच हार्ड डिस्कमधील डेटाद्वारे फसवणूक झालेल्यांचे जबाब नोंदवणे, त्यांच्याकडून माहिती घेणे, हे तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे हार्ड डिस्कमधील संबंधित अमेरिकन नागरिकांचा आवाज आणि ठिकाणाचा शोध घेऊन त्याचा जबाब नोंदवण्यासाठी अमेरिकन पोलिसांची मदत मोलाची ठरणार आहे. अमेरिकन न्यायालयाने तसे आदेश तेथील पोलिसांना दिले आहेत. पीडितांचे जबाब नोंदवून घेण्याची विनंती ठाणे न्यायालयामार्फत अमेरिकन न्यायालयाला ठाणे पोलिसांनी केल्याचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी सांगितले. या प्रक्रियेसाठी ठाणे न्यायालयाने अमेरिकन न्यायालयाला एलआर अर्थात लेटर रोगेटरी पाठवले आहे. त्याद्वारे या कोट्यवधी डॉलर घोटाळ्यातील पीडितांचे आवाज आणि जबाब नोंदवणे सुलभ होणार असल्याचेही मणेरे यांनी सांगितले. आतापर्यंत सुमारे ५० पीडितांची फसवणूक झाल्याचे हार्ड डिस्कद्वारे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)