शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या फीमध्ये ५० टक्के कपात हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : खासगी शाळांमधील फीमध्ये १५ टक्के कपात करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावर काही पालकांनी नाराजी व्यक्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : खासगी शाळांमधील फीमध्ये १५ टक्के कपात करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावर काही पालकांनी नाराजी व्यक्त केली. १५ टक्के फी कपातीने दिलासा लाभणार नाही. ५० टक्के शुल्क कपात करायला हवी, अशी पालकांची मागणी आहे. अनेक शाळांनी यापूर्वीच विद्यार्थ्यांकडून फी वसूल केली असल्याने आता या शाळा फीची रक्कम परत करणार की पुढील टर्ममध्ये कमी फी घेणार हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, शासनाच्या निर्णयावर शाळांचे चालक नाराज आहेत. आमच्या शाळांनी आधीच कपात केली असल्याचे काही शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना हप्त्याहप्त्याने फी भरण्याची मुभा दिली आहे. कोरोनामुळे जसे पालक अडचणीत आले आहेत, तसेच शाळेतील शिक्षक व कर्मचारी अडचणीत आले आहेत. फीची पूर्ण रक्कम मिळाली नाही तर संस्था चालवायची कशी, असा सवाल काही संस्थाचालकांनी केला. काही शाळांनी शासनाचा याबाबतचा आदेश अद्याप प्राप्त झाला नसल्याचे सांगितले.

----------------------------

आमच्या शाळेकडे अद्याप जीआर आलेला नाही. जर शासनाने १५ टक्के शुल्क कपात करण्याचा निर्णय घेतला असेल, तर तो अनुदानित शाळांना देखील लागू व्हावा. आम्ही गेल्याच वर्षी १५ टक्के शुल्क कपात केली होती. त्यामुळे आता करणे शक्य नाही. विद्यार्थ्यांच्या फीवर शिक्षकांचे पगार अवलंबून आहेत.

प्रमोद सावंत, सचिव, श्रीरंग एज्युकेशन सोसायटी

-----------------------------

आमच्या शाळेने गेल्यावर्षी शालेय शुल्कात ५० टक्के कपात केली. पालकांचे खर्च वाढले आहेत, त्यामुळे हा निर्णय आम्ही आधीच घेतला होता. आमच्या शाळेचे अनुकरण इतर शाळा करतील अशी आशा आहे. शुल्क कपात केली असली तरी शिक्षकांच्या पगारात आम्ही कपात केलेली नाही.

- संजय दबडघाव, विश्वस्त, एसइएस हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पाचपाखाडी

--------------------------

राज्य सरकारने १५ टक्के शुल्क कपातीचा घेतलेला निर्णय योग्य आहे. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या निर्णयाने पालक, विद्यार्थी यांना पूर्ण दिलासा लाभला नसला तरी काही अंशी दिलासा नक्की मिळाला आहे.

- क्रांती सावंत, पालक

--------------------------

खासगी शाळांत १४ महिन्यांची फी घेतली जाते. सरकारचा निर्णय योग्य असला तरी ५० टक्के शुल्क कपातीचा निर्णय घ्यायला हवा होता. पालकांचा लॅपटॉप, वायफायचा खर्च वाढला आहे. हा निर्णय गेल्या वर्षी भरलेल्या शालेय फीला लागू होणार का, याबाबत शासनाने स्पष्टीकरण द्यायला हवे.

- विलास पाटील, पालक

--------------------------

राज्य सरकारचा निर्णय योग्य नाही. १५ टक्के नव्हे, तर ५० टक्के शालेय शुल्क कपात केली पाहिजे. कारण कोरोनामुळे लोकांना रोजगार नाही. निम्मी फी भरणेदेखील कठीण झाले आहे.

- दीपेश दळवी, पालक

.............