शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या फीमध्ये ५० टक्के कपात हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : खासगी शाळांमधील फीमध्ये १५ टक्के कपात करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावर काही पालकांनी नाराजी व्यक्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : खासगी शाळांमधील फीमध्ये १५ टक्के कपात करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावर काही पालकांनी नाराजी व्यक्त केली. १५ टक्के फी कपातीने दिलासा लाभणार नाही. ५० टक्के शुल्क कपात करायला हवी, अशी पालकांची मागणी आहे. अनेक शाळांनी यापूर्वीच विद्यार्थ्यांकडून फी वसूल केली असल्याने आता या शाळा फीची रक्कम परत करणार की पुढील टर्ममध्ये कमी फी घेणार हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, शासनाच्या निर्णयावर शाळांचे चालक नाराज आहेत. आमच्या शाळांनी आधीच कपात केली असल्याचे काही शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना हप्त्याहप्त्याने फी भरण्याची मुभा दिली आहे. कोरोनामुळे जसे पालक अडचणीत आले आहेत, तसेच शाळेतील शिक्षक व कर्मचारी अडचणीत आले आहेत. फीची पूर्ण रक्कम मिळाली नाही तर संस्था चालवायची कशी, असा सवाल काही संस्थाचालकांनी केला. काही शाळांनी शासनाचा याबाबतचा आदेश अद्याप प्राप्त झाला नसल्याचे सांगितले.

----------------------------

आमच्या शाळेकडे अद्याप जीआर आलेला नाही. जर शासनाने १५ टक्के शुल्क कपात करण्याचा निर्णय घेतला असेल, तर तो अनुदानित शाळांना देखील लागू व्हावा. आम्ही गेल्याच वर्षी १५ टक्के शुल्क कपात केली होती. त्यामुळे आता करणे शक्य नाही. विद्यार्थ्यांच्या फीवर शिक्षकांचे पगार अवलंबून आहेत.

प्रमोद सावंत, सचिव, श्रीरंग एज्युकेशन सोसायटी

-----------------------------

आमच्या शाळेने गेल्यावर्षी शालेय शुल्कात ५० टक्के कपात केली. पालकांचे खर्च वाढले आहेत, त्यामुळे हा निर्णय आम्ही आधीच घेतला होता. आमच्या शाळेचे अनुकरण इतर शाळा करतील अशी आशा आहे. शुल्क कपात केली असली तरी शिक्षकांच्या पगारात आम्ही कपात केलेली नाही.

- संजय दबडघाव, विश्वस्त, एसइएस हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पाचपाखाडी

--------------------------

राज्य सरकारने १५ टक्के शुल्क कपातीचा घेतलेला निर्णय योग्य आहे. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या निर्णयाने पालक, विद्यार्थी यांना पूर्ण दिलासा लाभला नसला तरी काही अंशी दिलासा नक्की मिळाला आहे.

- क्रांती सावंत, पालक

--------------------------

खासगी शाळांत १४ महिन्यांची फी घेतली जाते. सरकारचा निर्णय योग्य असला तरी ५० टक्के शुल्क कपातीचा निर्णय घ्यायला हवा होता. पालकांचा लॅपटॉप, वायफायचा खर्च वाढला आहे. हा निर्णय गेल्या वर्षी भरलेल्या शालेय फीला लागू होणार का, याबाबत शासनाने स्पष्टीकरण द्यायला हवे.

- विलास पाटील, पालक

--------------------------

राज्य सरकारचा निर्णय योग्य नाही. १५ टक्के नव्हे, तर ५० टक्के शालेय शुल्क कपात केली पाहिजे. कारण कोरोनामुळे लोकांना रोजगार नाही. निम्मी फी भरणेदेखील कठीण झाले आहे.

- दीपेश दळवी, पालक

.............