शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

‘बारवी’त ५० टक्केच पाणीसाठा

By admin | Updated: August 6, 2015 02:56 IST

अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्यांच्या मध्यावर असलेल्या बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील सर्व उद्योगांसह महापालिकांना पाणीपुरवठा केला जातो

बदलापूर : अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्यांच्या मध्यावर असलेल्या बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील सर्व उद्योगांसह महापालिकांना पाणीपुरवठा केला जातो. यंदा पाऊस अपेक्षेपेक्षा कमी पडल्याने या धरणात अवघा ५० टक्केच पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी हे धरण ४ आॅगस्टला भरले होते. मात्र, यंदा पाण्याची पातळी ही निम्मीच राहिली आहे. महिनाभरात समाधानकारक पाऊस न झाल्यास बारवी धरणावर अवलंबून असलेल्या उद्योगांना आणि महापालिकांना पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) राज्यातील पहिले धरण म्हणजे अंबरनाथचे बारवी धरण. औद्योगिक क्षेत्रांना पाणीपुरवठा करण्यासाठी ते उभारण्यात आले. मात्र, औद्योगिक शहरांची पाण्याची तहान भागविण्यासोबत या धरणातील पाणी जिल्ह्यातील नगरपरिषद आणि महापालिकांनाही पुरविण्यात येत आहे.बारवी धरणाच्या पाण्याची क्षमता ही १७२ दशलक्ष घनमीटर आहे. धरणाची उंची ही ६५.१५ मीटर आहे. या धरणाची उंची वाढविण्यात आलेली असली तरी अजून या धरणावर स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे धरण भरल्यावर पाणी वाहून जाण्यासाठी नैसर्गिक मार्ग तयार केला आहे. मात्र, बारवी धरण क्षेत्रात अपेक्षित पाऊस झालेला नाही.जुलैच्या शेवटी किंवा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात हे धरण भरणे अपेक्षित आहे. २०१३ मध्ये २० जुलै रोजी धरण भरले होते. गेल्या वर्षी हे धरण ४ आॅगस्टला भरले होते. यंदा मात्र त्यात अवघा ५० टक्के पाणीसाठा असल्याने या ठिकाणी असलेला वीजनिर्मिती प्रकल्पही बंद ठेवला आहे. या धरणातील ८० टक्के पाणी नागरिकांसाठी तर उर्वरित पाणी औद्योगिक क्षेत्र आणि शेतीसाठी पुरविण्यात येते.