शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

४५० एमएलडी पाणी बेपत्ता

By admin | Updated: May 15, 2016 03:53 IST

जीवघेण्या पाणीटंचाईच्या काळात आठवड्यातून केवळ पाच दिवस पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणांकडूनच मनमानीपणे ४५६ दशलक्ष लीटर पाण्याचा अपव्यय केला जात

सुरेश लोखंडे , ठाणेजीवघेण्या पाणीटंचाईच्या काळात आठवड्यातून केवळ पाच दिवस पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणांकडूनच मनमानीपणे ४५६ दशलक्ष लीटर पाण्याचा अपव्यय केला जात असल्याचे सहा दिवसांच्या पाणीपुरवठा अहवालाद्वारे उघड झाले आहे. हे नेमके गेले कुठे, याचा हिशेबच मिळत नाही.‘जल निर्जल तैसे... वापरावे अमृत जैसे!’ या संत महात्म्यांच्या तत्कालीन वाक्याची तंतोतंत अनुभूती येत आहे. पाण्याचा वापर करताना सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. एक दिवसाआड येणाऱ्या पाण्याची ‘चातका’प्रमाणे गृहिणी वाट पाहत असतात. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी त्यांनी आता विविध उपाय हाती घेतले. मात्र पुरवठा करणाऱ्या यंत्रणांकडून पाण्याच्या बचतीसह चोरी, गळती थांबवण्यासाठी प्रयत्न केले जात नसल्याचे आढळले. ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांना बारवी धरणासह आंध्रा धरणातील पाणी उल्हास नदीद्वारे पुरवले जात आहे. ६ ते ११ मे या सहा दिवसांच्या कालावधीत बारवी धरणातून दोन हजार ९५० दशलक्ष लीटर व तीन हजार २५९ दशलक्ष लीटर पाणी आंध्रातून उचलण्यात आले आहे. या सहा हजार २०९ दशलक्ष लीटर पाण्याचा वापर एमआयडीसी, स्टेम, केडीएमसी आणि एमजेपी या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणांनी केला आहे. जिल्ह्यातील या चार यंत्रणांनी सात दिवसांत पाच हजार ७५३.२५० दशलक्ष लीटर पाण्याचे वितरण केले आहे. परंतु, धरणातून उचललेल्या आणि या यंत्रणांनी वितरीत केलेल्या पाण्याच्या हिशेबामध्ये मोठी तफावत आढळून आल्यामुळे नक्कीच पाण्याची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.