शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
5
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
6
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
7
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
8
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
9
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
10
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
11
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
12
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
13
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
14
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
15
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
16
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
17
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
18
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
19
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
20
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण

४५० एमएलडी पाणी बेपत्ता

By admin | Updated: May 15, 2016 03:53 IST

जीवघेण्या पाणीटंचाईच्या काळात आठवड्यातून केवळ पाच दिवस पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणांकडूनच मनमानीपणे ४५६ दशलक्ष लीटर पाण्याचा अपव्यय केला जात

सुरेश लोखंडे , ठाणेजीवघेण्या पाणीटंचाईच्या काळात आठवड्यातून केवळ पाच दिवस पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणांकडूनच मनमानीपणे ४५६ दशलक्ष लीटर पाण्याचा अपव्यय केला जात असल्याचे सहा दिवसांच्या पाणीपुरवठा अहवालाद्वारे उघड झाले आहे. हे नेमके गेले कुठे, याचा हिशेबच मिळत नाही.‘जल निर्जल तैसे... वापरावे अमृत जैसे!’ या संत महात्म्यांच्या तत्कालीन वाक्याची तंतोतंत अनुभूती येत आहे. पाण्याचा वापर करताना सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. एक दिवसाआड येणाऱ्या पाण्याची ‘चातका’प्रमाणे गृहिणी वाट पाहत असतात. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी त्यांनी आता विविध उपाय हाती घेतले. मात्र पुरवठा करणाऱ्या यंत्रणांकडून पाण्याच्या बचतीसह चोरी, गळती थांबवण्यासाठी प्रयत्न केले जात नसल्याचे आढळले. ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांना बारवी धरणासह आंध्रा धरणातील पाणी उल्हास नदीद्वारे पुरवले जात आहे. ६ ते ११ मे या सहा दिवसांच्या कालावधीत बारवी धरणातून दोन हजार ९५० दशलक्ष लीटर व तीन हजार २५९ दशलक्ष लीटर पाणी आंध्रातून उचलण्यात आले आहे. या सहा हजार २०९ दशलक्ष लीटर पाण्याचा वापर एमआयडीसी, स्टेम, केडीएमसी आणि एमजेपी या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणांनी केला आहे. जिल्ह्यातील या चार यंत्रणांनी सात दिवसांत पाच हजार ७५३.२५० दशलक्ष लीटर पाण्याचे वितरण केले आहे. परंतु, धरणातून उचललेल्या आणि या यंत्रणांनी वितरीत केलेल्या पाण्याच्या हिशेबामध्ये मोठी तफावत आढळून आल्यामुळे नक्कीच पाण्याची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.