शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

शहापुरातील ४० वर्षांची पाणीयोजना निघणार निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:36 IST

भातसानगर : शहापूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून या लोकसंख्येचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना लवकरच ...

भातसानगर : शहापूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून या लोकसंख्येचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होण्याचे संकेत मिळत आहेत. यासाठी अहवाल तयार करण्याचे आदेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिले आहेत. त्यामुळे ४० वर्षांपूर्वीची जुनी झालेली पाणीपुरवठा योजना लवकरच निकाली निघणार असून नव्या योजनेसाठी हालचालींना वेग आला आहे.

याआधी या शहराला २०११ च्या जनगणनेनुसार पाणीपुरवठा करण्यासाठी १६ कोटींच्या योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र आज याचा शहराचा पसारा दिवसेंदिवस वाढत असून मुंबई- नाशिक महामार्ग, मुंबई- कसारा- घोटी रेल्वेमार्ग,समृध्दी महामार्ग, वाडा- शहापूर महामार्ग, शहापूर- मुरबाड महामार्ग व आटगाव, पूनाधे, आसनगाव येथे असलेल्या कंपन्यामुळे शहापुरची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी समस्या हा गहण विषय बनल्याने काही दिवसापूर्वी प्राधिकरणाचे सदस्य सचिव निंबाळकर यांनी शहराची पाहणी केली व तातडीने पावले उचलण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार सध्या पाणी योजनेचा आराखडा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत तयार करण्यात येत असून या शहराला भविष्यकालीन पाणी योजना तयार करण्यासाठी किमान ३५ ते ४० कोटी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भातसा नदीतून दोन किलोमीटरच्या अंतरावरून हे पाणी आणावे लागणार आहे . सध्याच्या स्थितीत याच नदीवरून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र ही योजना ४० वर्षांपूर्वीची जुनी असल्याने ती मोडकळीस आली आहे. शिवाय या योजनेवर शुद्धीकरण केंद्र नसल्याने मोठी अडचण येत आहे.

नवीन योजनेत शहरात पाण्याचे तीन ते चार जलकुंभ, पॉवर हाऊस, पाणी शुद्धीकरण केंद्र, जलवाहिन्या यांचा समावेश केला आहे.

शहरातील पाणीप्रश्न सुटण्यास होणार मदत

आज शहापुरला एका बाजूने वळसा घालून भातसा नदी वाहते. मात्र येथील नागरिकांना तिचे पाणी पुरेशा प्रमाणात मिळू नये ही शोकांतिका असून आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या माध्यमातून नवी योजना लवकरच पूर्णत्वास येणार असल्याने शहापुरकरांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. याआधी अहवाल तयार करण्यात आला होता. मात्र भविष्याचा विचार केल्यास ती पाणी योजना तांत्रिक बाबी विचारात घेता मंजूर झाली नाही. आता मात्र सुसज्ज अशा योजनेचा अहवाल तयार करण्यात येत असल्याचे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी सांगितले.