शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
2
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
3
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
4
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
5
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
6
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
7
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
8
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
9
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
10
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
11
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
12
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
13
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
14
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
15
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
16
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
17
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
18
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
19
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
20
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
Daily Top 2Weekly Top 5

शहापुरातील ४० वर्षांची पाणीयोजना निघणार निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:36 IST

भातसानगर : शहापूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून या लोकसंख्येचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना लवकरच ...

भातसानगर : शहापूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून या लोकसंख्येचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होण्याचे संकेत मिळत आहेत. यासाठी अहवाल तयार करण्याचे आदेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिले आहेत. त्यामुळे ४० वर्षांपूर्वीची जुनी झालेली पाणीपुरवठा योजना लवकरच निकाली निघणार असून नव्या योजनेसाठी हालचालींना वेग आला आहे.

याआधी या शहराला २०११ च्या जनगणनेनुसार पाणीपुरवठा करण्यासाठी १६ कोटींच्या योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र आज याचा शहराचा पसारा दिवसेंदिवस वाढत असून मुंबई- नाशिक महामार्ग, मुंबई- कसारा- घोटी रेल्वेमार्ग,समृध्दी महामार्ग, वाडा- शहापूर महामार्ग, शहापूर- मुरबाड महामार्ग व आटगाव, पूनाधे, आसनगाव येथे असलेल्या कंपन्यामुळे शहापुरची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी समस्या हा गहण विषय बनल्याने काही दिवसापूर्वी प्राधिकरणाचे सदस्य सचिव निंबाळकर यांनी शहराची पाहणी केली व तातडीने पावले उचलण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार सध्या पाणी योजनेचा आराखडा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत तयार करण्यात येत असून या शहराला भविष्यकालीन पाणी योजना तयार करण्यासाठी किमान ३५ ते ४० कोटी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भातसा नदीतून दोन किलोमीटरच्या अंतरावरून हे पाणी आणावे लागणार आहे . सध्याच्या स्थितीत याच नदीवरून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र ही योजना ४० वर्षांपूर्वीची जुनी असल्याने ती मोडकळीस आली आहे. शिवाय या योजनेवर शुद्धीकरण केंद्र नसल्याने मोठी अडचण येत आहे.

नवीन योजनेत शहरात पाण्याचे तीन ते चार जलकुंभ, पॉवर हाऊस, पाणी शुद्धीकरण केंद्र, जलवाहिन्या यांचा समावेश केला आहे.

शहरातील पाणीप्रश्न सुटण्यास होणार मदत

आज शहापुरला एका बाजूने वळसा घालून भातसा नदी वाहते. मात्र येथील नागरिकांना तिचे पाणी पुरेशा प्रमाणात मिळू नये ही शोकांतिका असून आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या माध्यमातून नवी योजना लवकरच पूर्णत्वास येणार असल्याने शहापुरकरांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. याआधी अहवाल तयार करण्यात आला होता. मात्र भविष्याचा विचार केल्यास ती पाणी योजना तांत्रिक बाबी विचारात घेता मंजूर झाली नाही. आता मात्र सुसज्ज अशा योजनेचा अहवाल तयार करण्यात येत असल्याचे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी सांगितले.