शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
5
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
6
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
7
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
8
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
9
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
10
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
11
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
12
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
13
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
14
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
15
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
16
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
17
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
18
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
19
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
20
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...

शहापुरातील ४० वर्षांची पाणीयोजना निघणार निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:36 IST

भातसानगर : शहापूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून या लोकसंख्येचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना लवकरच ...

भातसानगर : शहापूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून या लोकसंख्येचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होण्याचे संकेत मिळत आहेत. यासाठी अहवाल तयार करण्याचे आदेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिले आहेत. त्यामुळे ४० वर्षांपूर्वीची जुनी झालेली पाणीपुरवठा योजना लवकरच निकाली निघणार असून नव्या योजनेसाठी हालचालींना वेग आला आहे.

याआधी या शहराला २०११ च्या जनगणनेनुसार पाणीपुरवठा करण्यासाठी १६ कोटींच्या योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र आज याचा शहराचा पसारा दिवसेंदिवस वाढत असून मुंबई- नाशिक महामार्ग, मुंबई- कसारा- घोटी रेल्वेमार्ग,समृध्दी महामार्ग, वाडा- शहापूर महामार्ग, शहापूर- मुरबाड महामार्ग व आटगाव, पूनाधे, आसनगाव येथे असलेल्या कंपन्यामुळे शहापुरची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी समस्या हा गहण विषय बनल्याने काही दिवसापूर्वी प्राधिकरणाचे सदस्य सचिव निंबाळकर यांनी शहराची पाहणी केली व तातडीने पावले उचलण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार सध्या पाणी योजनेचा आराखडा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत तयार करण्यात येत असून या शहराला भविष्यकालीन पाणी योजना तयार करण्यासाठी किमान ३५ ते ४० कोटी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भातसा नदीतून दोन किलोमीटरच्या अंतरावरून हे पाणी आणावे लागणार आहे . सध्याच्या स्थितीत याच नदीवरून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र ही योजना ४० वर्षांपूर्वीची जुनी असल्याने ती मोडकळीस आली आहे. शिवाय या योजनेवर शुद्धीकरण केंद्र नसल्याने मोठी अडचण येत आहे.

नवीन योजनेत शहरात पाण्याचे तीन ते चार जलकुंभ, पॉवर हाऊस, पाणी शुद्धीकरण केंद्र, जलवाहिन्या यांचा समावेश केला आहे.

शहरातील पाणीप्रश्न सुटण्यास होणार मदत

आज शहापुरला एका बाजूने वळसा घालून भातसा नदी वाहते. मात्र येथील नागरिकांना तिचे पाणी पुरेशा प्रमाणात मिळू नये ही शोकांतिका असून आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या माध्यमातून नवी योजना लवकरच पूर्णत्वास येणार असल्याने शहापुरकरांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. याआधी अहवाल तयार करण्यात आला होता. मात्र भविष्याचा विचार केल्यास ती पाणी योजना तांत्रिक बाबी विचारात घेता मंजूर झाली नाही. आता मात्र सुसज्ज अशा योजनेचा अहवाल तयार करण्यात येत असल्याचे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी सांगितले.