शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

ठाणे जिल्ह्यात दहा दिवसांत ३७९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यासोबत मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यासोबत मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या १० दिवसांत ४५ हजार २५३ रुग्णांसह मृतांची संख्या ३७९ ने वाढली आहे. रुग्णसंख्या वाढत असतानाच त्यात मृतांची भर पडत असल्याने जिल्हा प्रशासनासह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून बुधवारी रात्रीपासून कडक संचारबंदी सुरू झाली. त्यामुळे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली या मोठ्या शहरांसह उल्हासनगर, भिवंडी, मीरा- भाईंदर, बदलापूर, अंबरनाथ परिसरात सध्या स्मशानशांतता गुरुवारपासून सुरू झाली. जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा आलेख गेल्या १५ दिवसांपासून हजार ते पंधराशेने कमी झाला आहे. यावर समाधान मानले जात असतानाच मृतांचा आकडा मात्र झपाट्याने वाढला आहे. गेल्या १० दिवसांत ३७९ मृताची भर पडल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना मृतांची संख्या आता ७ हजार ३१ झाली आहे. जिल्ह्यातील या १० शहरात दिवसाकाठी मृतांची संख्या कमीत कमी ३० मृतांच्या सरासरीने वाढत आहे. त्यामुळे चिंतेत भर पडून गुण्यागोविंदाने नांदणा-या या शहरांमध्ये आपापसातील चिडचिडेपणा वाढला आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्के आहे. आतापर्यंतच्या ४ लाख २५ हजार ९८७ रुग्ण संख्येपैकी जिल्ह्यात ३ लाख २२ हजार ३७८ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ७ हजार ३१ या मृतांमध्ये गेल्या १० दिवसांत ३७९ मृतांची भर पडून मृत्यूंची संख्या झपाट्याने वाढली. या मृतांमध्ये मीरा -भाईंदर महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक गेल्या १० दिवसांत ८६ मृतांचा आलेख चढता राहिलेला आहे. या खालोखाल ठाणे शहर परिसरात ७२ मृत्यू आणि नवी मुंबईत ७१ मृत्यू अवघ्या १० दिवसात झाले आहे. याशिवाय कल्याण-डोंबिवली परिसरातही ५० मृत्यू झाले आहेत. उल्हासनगर, अंबरनाथला प्रत्येकी २५ मृत्यू झाले. कुळगाव-बदलापूर १९ आणि जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये २३ मृतांची नोंद अवघ्या १० दिवसांत झाली आहे.

-------