शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

३६९३ इमारतीतील रहिवासी बेघर होण्याची भीती

By admin | Updated: May 23, 2017 01:43 IST

ठाण्यासह नव्या शासन निर्णयानुसार अनधिकृत आणि धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना पर्यायी जागा देण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यासह नव्या शासन निर्णयानुसार अनधिकृत आणि धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना पर्यायी जागा देण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार आता याच निर्णयाचा आधार घेऊन पावसाळ्यापूर्वी अशा प्रकारे इमारती खाली करुन त्या पाडण्याची कारवाई ठाणे महापालिका सुरु करणार आहे. त्यानुसार पालिकेने शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा सर्व्हे पूर्ण केला आहे. यामध्ये ३६९३ या इमारती धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सी -१ अर्थात अतिधोकादायक इमारतींची संख्या ही ६९ एवढी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या २० ने कमी झाली आहे. त्यानुसार आता या इमारती रिकाम्या करुन त्या तत्काळ तोडण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.गेल्या वर्षी पालिकेने शासनाच्या नव्या धोरणानुसार सर्व्हे केला असता, शहरात ३ हजार ६११ धोकादायक आणि ८९ अतिधोकादायक इमारती ठरल्या होत्या. ठामपाच्या सर्व्हेत शहरात ३ हजार ६९३ धोकादायक आणि ६९ अतिधोकादायक इमारती आहेत. नव्या धोरणानुसार अतिधोकादायक, राहण्या अयोग्य व तत्काळ निष्कासित करणे अशा सी - १ प्रकारामध्ये शहरातील एकूण ६९ इमारतींचा समावेश असून यामध्ये सर्वाधिक म्हणजे ३२ इमारती या नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत असल्याची माहितीही या सर्व्हेतून समोर आली आहे. त्याखाली मुंब्रा प्रभाग समितीमध्ये १०, उथळसर आणि कोपरी प्रत्येकी ०७, वर्तकनगर, माजिवडा- मानपाडा प्रत्येकी ०४, कळवा ०२ अशी संख्या असतांना वागळे आणि लोकमान्यनगर सारख्या गजबजलेल्या भागात एकही इमारत अतिधोकादायक नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर सी २ ए प्रकारात (इमारती रिकाम्या करुन संरचनात्मक दुरुस्ती करणे) ९१.सी २ बी प्रकारात (इमारती रिकाम्या न करता रचनात्मक दुरुस्ती) १६६४.सी ३ प्रकारात (इमारतींची किरकोळ दुरुस्ती) १८६९ एवढी संख्या आहे.