शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

उपविभागीय अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड; मयत शेतकऱ्यांच्या नावाने २९ लाख लाटण्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 18:03 IST

उल्हासनगर उपविभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कुशिवली गावात कुशिवली लघुपाटबंधारे प्रकल्प सुरू करण्यासाठी भूसंपादन करण्यात आल्या. भूसंपादन केलेल्या जमिनीच्या बदल्यात शासनाकडून भरपाई देण्यात येत आहे.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : कुशिवली लघुपाटबंधारे प्रकल्पासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीच्या बदल्यात मयत शेतकऱ्याचे २९ लाख बनावट कागदपत्राद्वारे नुकसानभरपाईची रक्कम लाटण्याचा प्रकार उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांच्या सतर्कतेमुळे उघड झाला. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

उल्हासनगर उपविभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कुशिवली गावात कुशिवली लघुपाटबंधारे प्रकल्प सुरू करण्यासाठी भूसंपादन करण्यात आल्या. भूसंपादन केलेल्या जमिनीच्या बदल्यात शासनाकडून भरपाई देण्यात येत आहे. गावाच्या सर्वे नं-३० चे शेतकरी जगत दत्तू म्हात्रे यांच्या नावाने २९ लाख नुकसानभरपाई देण्यासाठी जुलै महिन्यात उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज आला. अर्जाच्या छाननी वेळी अर्जावरील फोटो, सह्या, प्रतिज्ञापत्र, कुटुंबाच्या इतर व्यक्तीच्या साह्य आदी बाबत उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांना संशय आल्यावर, त्यांनी हाजीमलंगवाडी तलाठी यांना सर्वे नं-३० च्या शेतकरी व खातेदाराबाबत सविस्तर माहिती काढा. असे सांगण्यात आले. यावेळी सर्वे नं-३० चे शेतकरी जगत दत्तू म्हात्रे हे मयत असून अर्जातील फोटो, साह्य व प्रतिज्ञापत्र बनावट असल्याचे उघड झाले. 

कुशिवली गाव सर्वे नं-३० चे मयत शेतकरी जगत दत्तू म्हात्रे यांच्या नावाने बोगस व बनावट कागदपत्र सादर करून नुकसानभरपाईचे २९ लाख रुपये लाटण्याचा प्रयत्न करणारा कोण? यामागे मोठे रॅकेट आहे का? मयत जगत म्हात्रे यांच्या जागी नुकसानभरपाई प्रक्रियावेळी प्रत्यक्ष उभा राहणारा कोण? असे अनेक प्रश्न उभे ठाकले. उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांच्या सतर्कमुळे सदर प्रकार उघड झाला असून त्यांच्या आदेशाने गुरवारी ७ ऑक्टोबर रोजी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलीस करीत असून यामागे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

प्रांत अधिकारी कारभारी यांच्या कामाचे कौतुक 

शहरातील सनद प्रकरणी उपविभागीय कार्यालय नेहमी वादात राहिले असून खुल्या जागा, विविध शासकीय जागा, पोलीस वसाहत आदी ठिकाणी सनद यापूर्वी दिल्या आहेत. तत्कालीन उपविभागीय अधिकारी जगजितसिंग गिरासे यांच्या कालावधीत देण्यात आलेल्या एकून २५४ सनदची चौकशी शासनस्तरावर सुरू असून त्यापैकी ७९ सनद रद्द केल्याची माहिती उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांनी दिली. त्यांच्या या कामाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर