शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

उपविभागीय अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड; मयत शेतकऱ्यांच्या नावाने २९ लाख लाटण्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 18:03 IST

उल्हासनगर उपविभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कुशिवली गावात कुशिवली लघुपाटबंधारे प्रकल्प सुरू करण्यासाठी भूसंपादन करण्यात आल्या. भूसंपादन केलेल्या जमिनीच्या बदल्यात शासनाकडून भरपाई देण्यात येत आहे.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : कुशिवली लघुपाटबंधारे प्रकल्पासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीच्या बदल्यात मयत शेतकऱ्याचे २९ लाख बनावट कागदपत्राद्वारे नुकसानभरपाईची रक्कम लाटण्याचा प्रकार उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांच्या सतर्कतेमुळे उघड झाला. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

उल्हासनगर उपविभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कुशिवली गावात कुशिवली लघुपाटबंधारे प्रकल्प सुरू करण्यासाठी भूसंपादन करण्यात आल्या. भूसंपादन केलेल्या जमिनीच्या बदल्यात शासनाकडून भरपाई देण्यात येत आहे. गावाच्या सर्वे नं-३० चे शेतकरी जगत दत्तू म्हात्रे यांच्या नावाने २९ लाख नुकसानभरपाई देण्यासाठी जुलै महिन्यात उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज आला. अर्जाच्या छाननी वेळी अर्जावरील फोटो, सह्या, प्रतिज्ञापत्र, कुटुंबाच्या इतर व्यक्तीच्या साह्य आदी बाबत उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांना संशय आल्यावर, त्यांनी हाजीमलंगवाडी तलाठी यांना सर्वे नं-३० च्या शेतकरी व खातेदाराबाबत सविस्तर माहिती काढा. असे सांगण्यात आले. यावेळी सर्वे नं-३० चे शेतकरी जगत दत्तू म्हात्रे हे मयत असून अर्जातील फोटो, साह्य व प्रतिज्ञापत्र बनावट असल्याचे उघड झाले. 

कुशिवली गाव सर्वे नं-३० चे मयत शेतकरी जगत दत्तू म्हात्रे यांच्या नावाने बोगस व बनावट कागदपत्र सादर करून नुकसानभरपाईचे २९ लाख रुपये लाटण्याचा प्रयत्न करणारा कोण? यामागे मोठे रॅकेट आहे का? मयत जगत म्हात्रे यांच्या जागी नुकसानभरपाई प्रक्रियावेळी प्रत्यक्ष उभा राहणारा कोण? असे अनेक प्रश्न उभे ठाकले. उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांच्या सतर्कमुळे सदर प्रकार उघड झाला असून त्यांच्या आदेशाने गुरवारी ७ ऑक्टोबर रोजी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलीस करीत असून यामागे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

प्रांत अधिकारी कारभारी यांच्या कामाचे कौतुक 

शहरातील सनद प्रकरणी उपविभागीय कार्यालय नेहमी वादात राहिले असून खुल्या जागा, विविध शासकीय जागा, पोलीस वसाहत आदी ठिकाणी सनद यापूर्वी दिल्या आहेत. तत्कालीन उपविभागीय अधिकारी जगजितसिंग गिरासे यांच्या कालावधीत देण्यात आलेल्या एकून २५४ सनदची चौकशी शासनस्तरावर सुरू असून त्यापैकी ७९ सनद रद्द केल्याची माहिती उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांनी दिली. त्यांच्या या कामाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर