शहरं
Join us  
Trending Stories
1
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
2
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
3
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
4
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
5
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
6
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
7
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
8
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
9
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
10
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
11
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
12
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
13
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
14
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
15
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
16
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
17
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
18
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
19
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
20
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का

२५०० पोलीस तैनात

By admin | Updated: February 20, 2017 06:00 IST

वेगवेगळ्या पक्षांतील आयारामांमुळे असलेली अस्वस्थता, अंतर्गत संघर्ष आणि गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींचा राजरोस वावर

उल्हासनगर : वेगवेगळ्या पक्षांतील आयारामांमुळे असलेली अस्वस्थता, अंतर्गत संघर्ष आणि गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींचा राजरोस वावर, यामुळे उल्हासनगरच्या मतदानावेळी तणाव निर्माण होऊ नये, यासाठी तब्बल २५०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांसह अन्य प्रभागांत गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे वॉच ठेवला जाणार आहे. ४१ फ्लॅश पॉइंट पोलिसांनी स्थापन केले आहेत. शहरात ३० मतदान केंदे्र संवेदनशील असून त्या ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुनील भारद्वाज यांनी दिली.उल्हासनगरमधील ५४३ पैकी ३० मतदान केंदे्र संवेदनशील आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी साडेतीन हजार कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. शहरात निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तीन पोलीस उपायुक्त, सहा सहायक पोलीस आयुक्त, ४८ पोलीस निरीक्षक, १५०० पोलीस कर्मचारी, ४०० होमगार्ड, एसआरपीच्या दोन तुकड्या (एका तुकडीत १०० सुरक्षा सैनिक), १०० सुरक्षारक्षकांचे अत्यावश्यक पथक आदींसह २५०० पेक्षा जास्त पोलीस तैनात ठेवले आहेत. याशिवाय, प्रत्येक प्रभागासाठी एक पोलीस पथक आरक्षित ठेवून त्यात एका पोलीस निरीक्षकासह ७ पोलीस कर्मचारी असतील. ७२ बिटमार्शलसाठी ३६ मोटारसायकली तैनात असतील. त्यांना विशेष मार्ग देण्यात आला आहे.  संवेदनशील प्रभाग, चौक,  जुने राजकीय वैर असलेल्या  ४१ ठिकाणी फ्लॅश पॉइंट स्थापन केले असून तक्रार मिळताच तीन मिनिटांत पोलीस पथक पोहोचण्याची व्यवस्था केल्याची माहिती त्यांनी दिली.  संवेदनशील मतदान केंद्रांसह प्रभागात ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे वॉच ठेवण्यात येणार आहे. विविध ठिकाणी नाकेबंदी सुरू केली असून प्रत्येक पोलीस स्टेशनला विशेष गाडीसह पोलीस पथक देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)पोलिसांची नाकाबंदी सुरू च्निवडणूक प्रचारासाठी शहराच्या बाहेरून आलेल्या विविध पक्ष कार्यकर्त्यांसह नेत्यांना प्रचाराच्या समाप्तीनंतर शहर सोडण्यास सांगितले आहे. त्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे. शहरातील हॉटेल, लॉज, पक्ष कार्यालय आदींची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे. च्कार्यकर्त्यांसह बाहेरच्या नेत्यांनी शहराबाहेर जावे, असे त्यांना सुचवण्यात आले आहे. मात्र, गुन्हे दाखल करून काहींना तुरुंगात टाकत ‘कल्याण पॅटर्न’ राबवला जाईल, अशी भीती शिवसेनेच्या नेत्यांसह साई, रिपाइं, मनसेसह लहान पक्षांनी व्यक्त केली आहे. भाजपाविरोधात त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. ओमी टीम सदस्यांसह इतरांकडून प्राणघातक हल्ला होईल, खोटे गुन्हे दाखल होतील, अशी भीती व्यक्त केली आहे.