शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

२५०० पोलीस तैनात

By admin | Updated: February 20, 2017 06:00 IST

वेगवेगळ्या पक्षांतील आयारामांमुळे असलेली अस्वस्थता, अंतर्गत संघर्ष आणि गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींचा राजरोस वावर

उल्हासनगर : वेगवेगळ्या पक्षांतील आयारामांमुळे असलेली अस्वस्थता, अंतर्गत संघर्ष आणि गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींचा राजरोस वावर, यामुळे उल्हासनगरच्या मतदानावेळी तणाव निर्माण होऊ नये, यासाठी तब्बल २५०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांसह अन्य प्रभागांत गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे वॉच ठेवला जाणार आहे. ४१ फ्लॅश पॉइंट पोलिसांनी स्थापन केले आहेत. शहरात ३० मतदान केंदे्र संवेदनशील असून त्या ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुनील भारद्वाज यांनी दिली.उल्हासनगरमधील ५४३ पैकी ३० मतदान केंदे्र संवेदनशील आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी साडेतीन हजार कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. शहरात निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तीन पोलीस उपायुक्त, सहा सहायक पोलीस आयुक्त, ४८ पोलीस निरीक्षक, १५०० पोलीस कर्मचारी, ४०० होमगार्ड, एसआरपीच्या दोन तुकड्या (एका तुकडीत १०० सुरक्षा सैनिक), १०० सुरक्षारक्षकांचे अत्यावश्यक पथक आदींसह २५०० पेक्षा जास्त पोलीस तैनात ठेवले आहेत. याशिवाय, प्रत्येक प्रभागासाठी एक पोलीस पथक आरक्षित ठेवून त्यात एका पोलीस निरीक्षकासह ७ पोलीस कर्मचारी असतील. ७२ बिटमार्शलसाठी ३६ मोटारसायकली तैनात असतील. त्यांना विशेष मार्ग देण्यात आला आहे.  संवेदनशील प्रभाग, चौक,  जुने राजकीय वैर असलेल्या  ४१ ठिकाणी फ्लॅश पॉइंट स्थापन केले असून तक्रार मिळताच तीन मिनिटांत पोलीस पथक पोहोचण्याची व्यवस्था केल्याची माहिती त्यांनी दिली.  संवेदनशील मतदान केंद्रांसह प्रभागात ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे वॉच ठेवण्यात येणार आहे. विविध ठिकाणी नाकेबंदी सुरू केली असून प्रत्येक पोलीस स्टेशनला विशेष गाडीसह पोलीस पथक देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)पोलिसांची नाकाबंदी सुरू च्निवडणूक प्रचारासाठी शहराच्या बाहेरून आलेल्या विविध पक्ष कार्यकर्त्यांसह नेत्यांना प्रचाराच्या समाप्तीनंतर शहर सोडण्यास सांगितले आहे. त्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे. शहरातील हॉटेल, लॉज, पक्ष कार्यालय आदींची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे. च्कार्यकर्त्यांसह बाहेरच्या नेत्यांनी शहराबाहेर जावे, असे त्यांना सुचवण्यात आले आहे. मात्र, गुन्हे दाखल करून काहींना तुरुंगात टाकत ‘कल्याण पॅटर्न’ राबवला जाईल, अशी भीती शिवसेनेच्या नेत्यांसह साई, रिपाइं, मनसेसह लहान पक्षांनी व्यक्त केली आहे. भाजपाविरोधात त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. ओमी टीम सदस्यांसह इतरांकडून प्राणघातक हल्ला होईल, खोटे गुन्हे दाखल होतील, अशी भीती व्यक्त केली आहे.