शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धान्य महोत्सवात २५ टन धान्यविक्री

By admin | Updated: May 6, 2017 05:54 IST

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने गावदेवी मैदानात आयोजिलेल्या

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने गावदेवी मैदानात आयोजिलेल्या धान्य महोत्सवाला ठाणेकर नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून ४ दिवसांत सुमारे २५ टन धान्याची विक्री झाली असून त्यातून जवळपास १० ते १२ लाखांची उलाढाल झाली आहे.नाम फाउंडेशन व संस्कार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा धान्य महोत्सव १ ते ४ मे दरम्यान आयोजिला होता. गुरुवारी या धान्य महोत्सवाचा समारोप झाला. हिंगोली, बीड जिल्ह्यांतील जवळपास १०० शेतकऱ्यांनी येथे धान्य विक्रीसाठी आणले होते. गहू, तांदूळ, तूरडाळ, मूगडाळ, ज्वारी, चवळी, सेंद्रिय हळद, मसाले आदी विविध धान्य, कडधान्य विक्र ीसाठी ठेवले होते. यात गव्हाची सुमारे ७ ते ८ टन, तूरडाळ ५ ते ६ टन, ज्वारी ६ ते ७ टन, मूगडाळीची २ ते ३ टन इतकी विक्र ी झाल्याचे नामच्या मकरंद अनासपुरे यांनी सांगितले. नाम आणि संस्कार यांच्या सहकार्यामुळे आम्ही कोणत्याही दलालाच्या मध्यस्थीशिवाय आमचा माल विकू शकलो. यापुढेही पुन्हा असा महोत्सव आयोजित केल्यास आम्ही तेथेही आमचे धान्य विक्रीसाठी आणू, अशा शब्दांत सहभागी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. महोत्सवात सहभागी झालेला आणि वयाच्या पंचविसाव्या वर्षी कृषी महाराष्ट्रभूषण हा राज्य सरकारचा पुरस्कार मिळालेल्या शिवराम बोडके या तरुण शेतकऱ्याने सर्वांच्या वतीने नाम आणि संस्कार संस्थेचे आभार मानले. या वेळी संस्कार संस्थेचे अध्यक्ष आ. संजय केळकर, अमोल गोऱ्हे उपस्थित होते.शनिवार ६ ते १० मे पर्यंत धान्य महोत्सव माझी आई शाळा, ऋ तू पार्कजवळ, पातलीपाडा, ठाणे (प.) येथे सकाळी १० ते रात्री १० या वेळेत होणार आहे. त्यालाही ठाणेकरांनी चांगला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन नाम आणि संस्कारच्या वतीने करण्यात आले आहे.महोत्सवाला उत्तम प्रतिसादनाम आणि संस्कार यांच्या सहकार्यामुळे आम्ही आमचा माल कोणत्याही दलालाच्या मध्यस्थीशिवाय विकू शकलो. यापुढेही पुन्हा असा महोत्सव आयोजित केल्यास आम्ही त्यातही आमचे धान्य विक्रीसाठी आणू, अशा शब्दांत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.