शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पंचम कलानींकडे २३ कोटी ७५ लाख

By admin | Updated: February 17, 2017 01:57 IST

महापालिका निवडणूक रिंगणात उतरलेल्या बहुतांश उमेदवारांचे शिक्षण बेताचे किंवा ‘अशिक्षित’ या श्रेणीचे आहे. मात्र, त्यांच्याकडील

उल्हासनगर : महापालिका निवडणूक रिंगणात उतरलेल्या बहुतांश उमेदवारांचे शिक्षण बेताचे किंवा ‘अशिक्षित’ या श्रेणीचे आहे. मात्र, त्यांच्याकडील संपत्तीचे आकडे वाचले, तर डोळे पांढरे होतील. ओमी कलानी यांची पत्नी पंचम या सर्वात धनाढ्य उमेदवार असून त्यांच्याकडे २३ कोटी ७५ लाख रुपयांची माया आहे. मात्र, भाजपाच्या उमेदवार सिमरन वानखेडे यांनी आपल्याकडे शून्य संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्रावर जाहीर केले. पंचम यांच्यापाठोपाठ भाजपाचे विजय पाटील यांच्याकडे १८ कोटींची संपत्ती आहे. विद्यमान ४ नगरसेवकांसह १३ उमेदवारांनी आपण अशिक्षित असल्याचे जाहीर केले आहे.उल्हासनगर महापालिकेच्या ७८ जागांसाठी ४७९ उमेदवार रिंगणात आहेत. पाच वर्षांपूर्वी ज्यांची संपत्ती लाखांत होती, त्यांची संपत्ती या वेळी कोट्यवधी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. ४७९ उमेदवारांपैकी ८० टक्के उमेदवार इयत्ता दहावीपेक्षा कमी शिकलेले आहेत. ज्या १३ उमेदवारांनी आपण अशिक्षित असल्याचे कबूल केले आहे, त्यामध्ये विद्यमान नगरसेवक विजय पाटील, जयश्री पाटील, ज्योती गायकवाड, लीला आशान यांचा समावेश आहे. प्रभाग क्र.-१५ व १९ मध्ये कोट्यधीश उमेदवार आमनसामने आहेत. प्रभाग क्र.-१५ मधील शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक वसुधा बोडारे, धनंजय बोडारे यांच्यासह शीतल बोडारे, भाजपाचे नरेंद्र राजानी, तर प्रभाग क्र.-१९ चे भाजपाचे उमेदवार व नगरसेवक विजय पाटील, मीनाक्षी पाटील, विघमान नगरसेविका मीना सोंडे व शिवसेनेचे विनोद ठाकूर कोट्यधीश आहेत. यांच्यातील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.महापालिकेतील विद्यमान नगरसेवकांपैकी टोनी सिरवाणी, वंदना भदाणे, राजेंदसिंग भुल्लर, मीना कौर भुल्लर, धनंजय बोडारे, वसुधा बोडारे, राजश्री चौधरी, जया साधवानी, मोहन साधवानी, मीना आयलानी, डॉ. प्रकाश नाथानी, प्रदीप रामचंदानी, जीवन इदनानी, आशा इदनानी, राजकुमार जग्यासी, विनोद ठाकूर, विजय पाटील, मीना सोंडे, रमेश चव्हाण, भरत गंगोत्री, अंजली साळवे, राजेश वानखडे हे उमेदवार कोट्यधीश आहेत. भाजपाचे नगरसेवक राजेश वानखडे यांची मुलगी सिमरन प्रभाग क्र.-१७ मधून भाजपाच्या तिकिटावर रिंगणात उतरली असून तिने आपल्याकडे संपत्तीच नसल्याचे जाहीर केले आहे. प्रचार रॅली, इतर दररोजचा खर्च त्या कसा दाखवणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसह निवडणूक अधिकाऱ्यांना पडला आहे. (प्रतिनिधी)