शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

जलयुक्त शिवारच्या १३०१ कामांसाठी २२ कोटी

By admin | Updated: September 13, 2016 02:19 IST

जलयुक्त शिवारसाठी यंदा १८ गावांची निवड करण्यात आली असून या गावांमध्ये या आर्थिक वर्षात विविध स्वरूपाची एक हजार ३०१ कामे हाती घेतली आहेत

ठाणे : जलयुक्त शिवारसाठी यंदा १८ गावांची निवड करण्यात आली असून या गावांमध्ये या आर्थिक वर्षात विविध स्वरूपाची एक हजार ३०१ कामे हाती घेतली आहेत. त्यासाठी सुमारे २२ कोटी १५ लाख खर्च होणार आहेत. जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेत शहापूर तालुक्यातील बाभरे, सावरोली, कराळे, बांधिवली, शिरोळ, वेहळोली, अजनूप या सात गावांचा समावेश आहे. मुरबाडच्या खुटल, बारागाव, मेंदी, केदुर्ली, डोंगरन्हावे, तुळई गावांत योजना राबवली जाणार आहे. याशिवाय, घोटगावर ता. भिवंडी, मामनोली ता. कल्याण आणि अंबरनाथमधील कुशिवली गावांचा समावेश आहे. गावांतील जलस्रोतांचे बळकटीकरण करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. कृषी विभागाद्वारे २३ कामे, जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाची आठ कामे होणार आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ८७ लाख मिळणार असून सीएसआरपोटी १९ लाख १२ हजार प्राप्त होणार आहेत. यंदा भातपिकाचे उत्पादन प्रतिहेक्टरी २५.५० किलो काढण्यात येणार आहे. त्यासाठी काही स्थानिक वाणांची लागवड करण्यात येणार आहे. यासोबतच कडधान्य व भाजीपाला घेण्यावरही भर असेल. सेंद्रिय शेती वाढवण्यासाठी ५० शेतकऱ्यांचा गट तयार केला जाईल. मोहापासून तेल तसेच मोगरा शेतीसाठी लागवड अशी काही उद्दिष्टे आम्ही निश्चित केली आहेत. यासाठी पाण्याच्या बाबतीत आम्हाला स्वयंपूर्ण होण्याची गरज आहे. त्यामुळेच यंदा जलयुक्त शिवाराची कामे अधिक नियोजनबद्धरीतीने पूर्ण करणार असल्याचा विश्वास कृषी अधीक्षक महावीर जंगटे यांनी व्यक्त केला.