शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

२२९ पात्र कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित

By admin | Updated: March 21, 2016 01:21 IST

अनेक महिन्यांपासून २२९ लाभार्थी कर्मचाऱ्यांना कालबाह्य पदोन्नतीपासून प्रशासनाने सक्षम अर्हतेच्या कारणामुळे वंचित ठेवले आहे.

भार्इंदर : अनेक महिन्यांपासून २२९ लाभार्थी कर्मचाऱ्यांना कालबाह्य पदोन्नतीपासून प्रशासनाने सक्षम अर्हतेच्या कारणामुळे वंचित ठेवले आहे. या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया २८ मार्चपर्यंत सुरू न केल्यास २९ मार्चला लेखणीबंदचा इशारा रयत राज्य कर्मचारी संघटनेने दिला आहे.राज्य सरकारच्या धोरणानुसार १२ वर्षे सेवा झालेले कर्मचारी कालबाह्य पदोन्नतीसाठी पात्र ठरवले आहेत. त्यानुसार, पालिकेतील ४४१ कर्मचारी पात्र ठरले असून त्यातील केवळ २१२ कर्मचाऱ्यांना प्रशासनाने अद्याप पदोन्नती दिली आहे. उर्वरित २२९ कर्मचाऱ्यांना सक्षम अर्हतेच्या कारणास्तव पदोन्नतीपासून वंचित ठेवले आहे. त्यात सफाई कामगारांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. काही कर्मचाऱ्यांची सेवा २४ वर्षे झाली असतानाही त्यांनाही पदोन्नतीपासून वंचित ठेवले आहे. पालिकेतील पदोन्नती श्रेणीतील कर्मचाऱ्यांखेरीज राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या प्रभाग अधिकाऱ्यांना वर्ग-२ चे पद दिले आहे. सरकारच्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना दिलेली सुधारित वेतनश्रेणीसुद्धा बंद केली आहे. तत्कालीन महासभेने सुधारित वेतनश्रेणीला मान्यता दिल्यानंतरही लाभार्थी कर्मचाऱ्यांना वंचित ठेवले आहे. वंचित ठेवलेल्या लाभार्थी कर्मचाऱ्यांना कालबाह्य पदोन्नतीसह सुधारित वेतनश्रेणी देण्याची प्रक्रिया २८ मार्चपर्यंत सुरू करण्याची मुदत संघटनेने प्रशासनाला दिली आहे. (प्रतिनिधी)