शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

वीजपुरवठ्यासाठी २०२ कोटींची सुविधा!

By admin | Updated: September 9, 2016 02:52 IST

जिल्ह्यातील महापालिकांचा शहरी भाग व आदिवासी दुर्गम क्षेत्रातील विद्युत वितरण प्रणालीचे विस्तारीकरण व बळकटीकरण लवकरच करण्यात येणार आहे.

सुरेश लोखंडे, ठाणेजिल्ह्यातील महापालिकांचा शहरी भाग व आदिवासी दुर्गम क्षेत्रातील विद्युत वितरण प्रणालीचे विस्तारीकरण व बळकटीकरण लवकरच करण्यात येणार आहे. या कामांसाठी केंद्र शासन पुरस्कृत योजनेद्वारे २०२ कोटीरुपयांचा निधी प्रस्तावित केल्याचे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत उघड झाले.जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या महापालिकांसह अंबरनाथ आणि बदलापूर या नगरपालिका क्षेत्रासाठी एकात्मिक ऊर्जा विकास योजना (आयपीडीएस) लागू केलेली आहे. या योजनेद्वारे शहरांमधील वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी विविध स्वरूपाची कामे हाती घेतली आहेत. यामध्ये ठिकठिकाणी नवीन स्विचिंग स्टेशन उभारणे, नवीन उच्चदाब व लघुदाब वाहिनी सुरू करणे, आधीच्या वाहिनीची क्षमता विस्तारीकरण, नवीन रोहित्र, जुन्या रोहित्राची क्षमता वाढ, पोलवरून जाणाऱ्या वाहिनीचे भूमिगत वाहिनीत रूपांतर करणे आदी कामे हाती घेण्याचे निश्चित केलेले आहे. या कामांसाठी संबंधित महापालिका व नगरपालिकांसाठी १६२.५४ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केल्याचे खासदार व जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत महावितरणच्या कल्याण विभागाचे अधीक्षक अभियंता संजय राठोड यांनी सांगितले. याप्रमाणेच ग्रामीण, आदिवासी भागासाठी लागू केलेल्या दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी तालुक्यांच्या लागू आहे. या तालुक्यांमधील गावांमधील पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता ही योजना लागू आहे. याद्वारे शहापूर तालुक्यात नवीन उच्चदाब वाहिनी १६ किमी, नवीन वितरण रोहित्रे १२ आणि १०७ किमीची लघुदाब वाहिनी टाकली जाणार आहे. त्यासाठी सात कोटी ९० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. याप्रमाणेच मुरबाड तालुक्यात २२/२२ केव्हीच्या स्विचिंग स्टेशनच्या कामांप्रमाणेच अन्यही कामांसाठी १२ कोटी ६८ लाखांचा निधी, तर कल्याणसाठी १६ कोटी २० लाख, भिवंडीसाठी दोन कोटी ४९ लाखांचा निधी विविध कामांसाठी निश्चित करण्यात आला आहे.