शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यासह मुंबईकरांसाठी ५५७ ट्रक भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:16 IST

आवक पुरेशी : पावसाच्या नावाखाली ग्राहकांची लूट

सुरेश लोखंडेठाणे : कृषी उत्पन्न बाजार समित्यांसह अन्यही ठिकाणी भाजीपाला, कांदे, बटाटे, फळे आणि अन्नधान्य आदींचा ५५७ ट्रक माल आजही आलेला आहे. ठाणेकरांसह मुंबईतील ग्राहकांना हा भाजीपाला पूरक आहे. पण, पावसाचे निमित्त करून भाजी मंडईत व बाजारात ग्राहकांना चढ्या भावात भाजीपाल्याची विक्री करत दुकानदार नाहक लूट करीत असल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.

बुधवारी आणि गुरुवारी मुंबई, ठाण्यात धोधो पाऊस पडला. तरीदेखील गुरुवारी सकाळी नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह कल्याणच्या बाजार समितीत ५५७ ट्रक पालेभाज्यांसह कांदा, बटाटा, अन्नधान्य, फळे, फुले आणि टोमॅटोंचा पुरवठा झाला आहे. अन्य काही दिवसांच्या तुलनेत काही अंशी जास्तच भाजीपाला या बाजार समित्यांमध्ये येत आहे. परंतु ठाणे, मुंबईतील पावसाचे कारण पुढे करून ग्राहकांची मनमानी लूट करीत चढ्या दराने भाजीपाला विकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

ठाणे, मुंबई, पालघर हे कोकणचे जिल्हे वगळता राज्यातील अन्य जिल्ह्यांत पाऊस नाही. शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शेतातून निघत असलेल्या भाजीपाल्याच्या उत्पन्नावर शेतकरी कसेबसे तग धरून आहेत. यामुळे ठाणे, मुंबईच्या बाजार समित्यांमध्ये भाजीपाला, अन्नधान्यही मोठ्या प्रमाणात येत आहे. पाऊस नसल्यामुळे शेतकरी भाजीपाला काढून बाजारात आणत आहेत. शेतात चिखल नसल्यामुळे वाहनेही जात आहेत. पण, ग्राहकांची दिशाभूल करून त्यांना चढ्या दराने भाजीपाला विकला जात आहे. पाऊस पडत असल्यामुळे शेतात वाहन जात नाही. मोठ्या कष्टाने काही ट्रक बाजारात आणले जात आहेत. यामुळे ट्रकचालक पेट्रोल, डिझेलचे वाढते दर पाहता, त्यानुसार माल उतरवत असल्यामुळे भाजीपाला महागल्याचे दुकानदार सांगत आहेत. व्यापारी आणि दुकानदारांकडून लूट होत असल्यामुळे ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

नवी मुंबई बाजार समितीमध्ये ४८२ ट्रक अन्नधान्य, भाजीपालासर्वाधिक मोठ्या नवी मुंबई बाजारपेठेत ८९ ट्रक व ५०२ टेम्पो भाजीपाला गुरुवारी सकाळी आला. त्याचप्रमाणे अन्नधान्यासह कडधान्याचे १६८ ट्रक, ८० टेम्पोची आवक झालेली आहे. याशिवाय, ५६ ट्रक व २१८ ट्रेम्पोद्वारे फळे, तर ९५ ट्रक व ३६ टेम्पोद्वारे कांदा -बटाटा आणण्यात आलेला आहे. मसाल्याची वाहतूक ७४ ट्रक व १२९ टेम्पोद्वारे झालेली आहे. कल्याण बाजार समितीमध्येदेखील २३ ट्रक व ६८ टेम्पो भाजीपाला, तीन ट्रक फळे, १३ ट्रक आणि तीन टेम्पो कांदे-बटाटे, तर २६ टेम्पोने फुले आणण्यात आलेली आहेत. टोमॅटो पाच ट्रक आणि १२ टेम्पोतून आणण्यात आले आहेत.