शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

करंजा बंदराचा १८ वर्षांचा वनवास संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 05:17 IST

सुमारे १८ वर्षांपासून रखडतरखडत चाललेल्या करंजा या मच्छीमार बंदराच्या विकासाच्या मार्गातील निधीच्या कमतरतेचा मुख्य अडसर आता दूर झाला आहे. राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाने यासाठी आवश्यक असलेल्या १४९ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीस ६ आॅगस्ट २०१८ रोजी मान्यता दिली आहे.

- नारायण जाधवठाणे - सुमारे १८ वर्षांपासून रखडतरखडत चाललेल्या करंजा या मच्छीमार बंदराच्या विकासाच्या मार्गातील निधीच्या कमतरतेचा मुख्य अडसर आता दूर झाला आहे. राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाने यासाठी आवश्यक असलेल्या १४९ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीस ६ आॅगस्ट २०१८ रोजी मान्यता दिली आहे. यामुळे या मच्छीमार बंदराचा वनवास आता संपणार असून येत्या दोनतीन महिन्यांत या बंदरावर नव्या जेट्टीसह इतर कामे सुरू होतील. यात केंद्र आणि राज्य शासनाचा हिस्सा निम्मा राहणार आहे.मुंबईत ससून डॉक व भाऊचा धक्का येथील कसारा ही बंदरे आहेत. यात कसाराबंदर आधीच गुजराती मच्छीमारांना सरकारने आंदण दिले आहे. यामुळे रायगड, ठाणे, नवी मुंबई, मुंबईतील मच्छीमारांसाठी ससून डॉक हे एकमेव बंदर आहे. त्या ठिकाणच्या हजारो बोटी ससून डॉक येथे इंधन भरण्यासह बर्फ घेण्यास येतात. त्यासाठी करंजाबंदर विकसित होणे गरजेचे होते. करंजा रायगड जिल्ह्यातील मुंबई आणि नवी मुंबईला जवळ असणारे एक प्रमुख बंदर म्हणून ओळखले जात असून येथील मच्छीमारांकडून मोठ्या प्रमाणात मासळी या निधीतूनजेट्टी, लिलावगृह, शेड, मासळी सुकवणे, वर्गीकरण करणे यासाठी फलाटांचे बांधकाम करण्यात येणार आहे. इंधन भरण्याची सोय, बर्फ साठवणगृह आदी येथे बांधण्यात येणार आहे. मात्र, यासाठी विविध खात्यांची मान्यता, निधीची कमतरता, बांधकाम सुरू असताना खडक लागणे, डिझाइनमधील बदल यामुळे करंजाबंदराचे काम रखडले होते.हजारो मच्छीमारांना होणार फायदाकरंजा हे प्रमुख बंदर असून याठिकाणी आमच्या संस्थेच्या सव्वाचारशे सभासदांसह तालुक्यात ८०० च्या वर मच्छीमार बांधवांना नव्या जेट्टीचा फायदा होणार आहे.शिवाय मुंबई, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील अनेक बोटी येथे इंधन भरणे, बर्फ घेण्यास येणार आहेत. आता निधी मिळाल्याने मच्छीमारांची मोठी अडचण दूर होणार आहे.साधारणत: पावसाळा संपल्यावर आॅक्टोबरमध्ये नव्या जेट्टीच्या बांधकामास सुरुवात होऊ शकते, अशी माहिती करंजा मच्छीमार सेवा संस्थेचे अध्यक्ष शिवदास नाखवा यांनी ‘लोकमत’ला दिली.१५० कोटींच्या निधीस मिळाली मान्यता : आॅक्टोबरमध्ये काम सुरू करण्याचा संकल्पअसा आहे बंदर विकासाच्या निधीमान्यतेचा प्रवास२००० साली कोकण विकास कार्यक्रमांतर्गत करंजाबंदराच्या बांधकामास मान्यता, तर २००४ साली निधीस प्रशासकीय मान्यता२००५ साली केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील हे काम केंद्र पुरस्कृत निधीतून करण्याचे ठरले२०११ साली ७७ कोटी ७३ लाख ४७ हजारांच्या निधीस प्रशासकीय मान्यताबंदराचे काम करताना खडक लागल्याने आणि जेट्टीच्या डिझाइनमध्ये बदल झाल्याने खर्च वाढला. यामुळे २०१६ साली २५३ कोटी ९६ लाखांचा सुधारित प्रकल्प आराखडा मंजुरीसाठी पाठवला.सुधारित आराखड्यास केंद्राने राज्य आणि केंद्र मिळून फिप्टीफिप्टी हिस्सा राहील, या तत्त्वावर मार्च २०१८ मध्ये १४९ कोटी ८० लाखांच्या आराखड्यास मंजुरी दिली. ती देताना पूर्वी झालेला नऊ कोटी ३३ लाखांचा खर्च वगळला.

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या