शहरं
Join us  
Trending Stories
1
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
2
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
3
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
4
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
5
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
6
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
7
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
8
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
9
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
10
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
11
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
12
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
13
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
14
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
15
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
16
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
17
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
18
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
19
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
20
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण पूर्वेतील १६७ कुटुंबीय हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:46 IST

कल्याण : पूर्वेतील आरक्षित भूखंडावरील १६७ कुटुंबीयांना घरे रिकामी करण्याची नोटीस केडीएमसीने बजावली आहे. तसेच मनपाने कॅव्हेट दाखल केल्याने ...

कल्याण : पूर्वेतील आरक्षित भूखंडावरील १६७ कुटुंबीयांना घरे रिकामी करण्याची नोटीस केडीएमसीने बजावली आहे. तसेच मनपाने कॅव्हेट दाखल केल्याने नागरिकांना न्यायालयात दादही मागता येणार नाही, अशी स्थिती आहे. याप्रकरणी शिवसेनेने आधी या नागरिकांचे पुनर्वसन करा, मगच कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, घरे तुटण्याच्या भीतीने नागरिक हवालदिल झाले आहेत.

केडीएमसीच्या हद्दीत विकास आराखड्यानुसार १,२०० पेक्षा जास्त आरक्षित भूखंड आहेत. या आरक्षित भूखंडांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे हे भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गेल्या महिन्यापासून सुरू केली. हे भूखंड ताब्यात घेऊन त्यावर असलेली आरक्षणे विकसित करण्यात येतील. त्या भूखंडांच्या भोवती वृक्षारोपण करून हे भूखंड सामाजिक संस्थांना वापरासाठी दिले जातील, असे आयुक्तांनी म्हटले होते.

त्यानुसार आरक्षित भूखंड ताब्यात घेण्यासाठी अतिक्रमण केलेल्यांना मनपाने नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. पूर्वेतील मयूर सोसायटी, सप्तशृंगी चाळ, पावशे चाळ, निरंकारी चाळ येथील १६७ कुटुंबीयांना मनपाने नोटिसा बजावून त्यांची घरे मनपाच्या आरक्षित भूखंडावर असून, ती हटवली जातील, असे सांगितले आहे. तसेच नोटिसीत घरे अधिकृत असल्याचा पुरावा सादर करावा, असे म्हटले आहे. रहिवासी मनपाविरोधात न्यायालयात जाऊ नयेत, यासाठी कॅव्हेट दाखल केले आहे.

१९९१ पासून ही घरे येथे आहेत. चाळीतील रहिवासी मालमत्ता कर व पाणीपट्टी मनपास भरतात. ३० वर्षांनी मनपाला आता जाग आली आहे. कोरोनाकाळात आमची घरे हटविल्यास आम्ही जायचे कुठे, असा संतप्त सवाल बाधित रहिवासी रवींद्र पराडकर यांनी केला आहे. या रहिवाशांचे पुनर्वसन करावे, अशी भूमिका माजी महापौर रमेश जाधव, माजी शिवसेना नगरसेवक नीलेश शिंदे, स्थानिक माजी नगरसेविका सारिका जाधव यांनी घेतली आहे. यासंदर्भात आयुक्तांची भेट घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

‘पुनर्वसनाचा निर्णय हा धोरणात्मक’

रहिवाशांना पुरावे सादर करण्याची नोटीस बजावली आहे. त्यानुसार संबंधित रहिवाशांची आज सुनावणी घेण्यात येत आहे. पुनर्वसनाचा निर्णय हा धोरणात्मक आहे. पुनर्वसनास पात्र असलेल्या रहिवाशांचे पुनर्वसन केले जाईल, अशी माहिती प्रभाग अधिकारी सुधीर मोकल यांनी दिली आहे.

-------------------------