शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण पूर्वेतील १६७ कुटुंबीय हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:46 IST

कल्याण : पूर्वेतील आरक्षित भूखंडावरील १६७ कुटुंबीयांना घरे रिकामी करण्याची नोटीस केडीएमसीने बजावली आहे. तसेच मनपाने कॅव्हेट दाखल केल्याने ...

कल्याण : पूर्वेतील आरक्षित भूखंडावरील १६७ कुटुंबीयांना घरे रिकामी करण्याची नोटीस केडीएमसीने बजावली आहे. तसेच मनपाने कॅव्हेट दाखल केल्याने नागरिकांना न्यायालयात दादही मागता येणार नाही, अशी स्थिती आहे. याप्रकरणी शिवसेनेने आधी या नागरिकांचे पुनर्वसन करा, मगच कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, घरे तुटण्याच्या भीतीने नागरिक हवालदिल झाले आहेत.

केडीएमसीच्या हद्दीत विकास आराखड्यानुसार १,२०० पेक्षा जास्त आरक्षित भूखंड आहेत. या आरक्षित भूखंडांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे हे भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गेल्या महिन्यापासून सुरू केली. हे भूखंड ताब्यात घेऊन त्यावर असलेली आरक्षणे विकसित करण्यात येतील. त्या भूखंडांच्या भोवती वृक्षारोपण करून हे भूखंड सामाजिक संस्थांना वापरासाठी दिले जातील, असे आयुक्तांनी म्हटले होते.

त्यानुसार आरक्षित भूखंड ताब्यात घेण्यासाठी अतिक्रमण केलेल्यांना मनपाने नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. पूर्वेतील मयूर सोसायटी, सप्तशृंगी चाळ, पावशे चाळ, निरंकारी चाळ येथील १६७ कुटुंबीयांना मनपाने नोटिसा बजावून त्यांची घरे मनपाच्या आरक्षित भूखंडावर असून, ती हटवली जातील, असे सांगितले आहे. तसेच नोटिसीत घरे अधिकृत असल्याचा पुरावा सादर करावा, असे म्हटले आहे. रहिवासी मनपाविरोधात न्यायालयात जाऊ नयेत, यासाठी कॅव्हेट दाखल केले आहे.

१९९१ पासून ही घरे येथे आहेत. चाळीतील रहिवासी मालमत्ता कर व पाणीपट्टी मनपास भरतात. ३० वर्षांनी मनपाला आता जाग आली आहे. कोरोनाकाळात आमची घरे हटविल्यास आम्ही जायचे कुठे, असा संतप्त सवाल बाधित रहिवासी रवींद्र पराडकर यांनी केला आहे. या रहिवाशांचे पुनर्वसन करावे, अशी भूमिका माजी महापौर रमेश जाधव, माजी शिवसेना नगरसेवक नीलेश शिंदे, स्थानिक माजी नगरसेविका सारिका जाधव यांनी घेतली आहे. यासंदर्भात आयुक्तांची भेट घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

‘पुनर्वसनाचा निर्णय हा धोरणात्मक’

रहिवाशांना पुरावे सादर करण्याची नोटीस बजावली आहे. त्यानुसार संबंधित रहिवाशांची आज सुनावणी घेण्यात येत आहे. पुनर्वसनाचा निर्णय हा धोरणात्मक आहे. पुनर्वसनास पात्र असलेल्या रहिवाशांचे पुनर्वसन केले जाईल, अशी माहिती प्रभाग अधिकारी सुधीर मोकल यांनी दिली आहे.

-------------------------