शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

कल्याण पूर्वेतील १६७ कुटुंबीय हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:46 IST

कल्याण : पूर्वेतील आरक्षित भूखंडावरील १६७ कुटुंबीयांना घरे रिकामी करण्याची नोटीस केडीएमसीने बजावली आहे. तसेच मनपाने कॅव्हेट दाखल केल्याने ...

कल्याण : पूर्वेतील आरक्षित भूखंडावरील १६७ कुटुंबीयांना घरे रिकामी करण्याची नोटीस केडीएमसीने बजावली आहे. तसेच मनपाने कॅव्हेट दाखल केल्याने नागरिकांना न्यायालयात दादही मागता येणार नाही, अशी स्थिती आहे. याप्रकरणी शिवसेनेने आधी या नागरिकांचे पुनर्वसन करा, मगच कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, घरे तुटण्याच्या भीतीने नागरिक हवालदिल झाले आहेत.

केडीएमसीच्या हद्दीत विकास आराखड्यानुसार १,२०० पेक्षा जास्त आरक्षित भूखंड आहेत. या आरक्षित भूखंडांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे हे भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गेल्या महिन्यापासून सुरू केली. हे भूखंड ताब्यात घेऊन त्यावर असलेली आरक्षणे विकसित करण्यात येतील. त्या भूखंडांच्या भोवती वृक्षारोपण करून हे भूखंड सामाजिक संस्थांना वापरासाठी दिले जातील, असे आयुक्तांनी म्हटले होते.

त्यानुसार आरक्षित भूखंड ताब्यात घेण्यासाठी अतिक्रमण केलेल्यांना मनपाने नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. पूर्वेतील मयूर सोसायटी, सप्तशृंगी चाळ, पावशे चाळ, निरंकारी चाळ येथील १६७ कुटुंबीयांना मनपाने नोटिसा बजावून त्यांची घरे मनपाच्या आरक्षित भूखंडावर असून, ती हटवली जातील, असे सांगितले आहे. तसेच नोटिसीत घरे अधिकृत असल्याचा पुरावा सादर करावा, असे म्हटले आहे. रहिवासी मनपाविरोधात न्यायालयात जाऊ नयेत, यासाठी कॅव्हेट दाखल केले आहे.

१९९१ पासून ही घरे येथे आहेत. चाळीतील रहिवासी मालमत्ता कर व पाणीपट्टी मनपास भरतात. ३० वर्षांनी मनपाला आता जाग आली आहे. कोरोनाकाळात आमची घरे हटविल्यास आम्ही जायचे कुठे, असा संतप्त सवाल बाधित रहिवासी रवींद्र पराडकर यांनी केला आहे. या रहिवाशांचे पुनर्वसन करावे, अशी भूमिका माजी महापौर रमेश जाधव, माजी शिवसेना नगरसेवक नीलेश शिंदे, स्थानिक माजी नगरसेविका सारिका जाधव यांनी घेतली आहे. यासंदर्भात आयुक्तांची भेट घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

‘पुनर्वसनाचा निर्णय हा धोरणात्मक’

रहिवाशांना पुरावे सादर करण्याची नोटीस बजावली आहे. त्यानुसार संबंधित रहिवाशांची आज सुनावणी घेण्यात येत आहे. पुनर्वसनाचा निर्णय हा धोरणात्मक आहे. पुनर्वसनास पात्र असलेल्या रहिवाशांचे पुनर्वसन केले जाईल, अशी माहिती प्रभाग अधिकारी सुधीर मोकल यांनी दिली आहे.

-------------------------