शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

भाजी मंडईतील १५ टक्के गाळे शेतक-यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 05:41 IST

राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांच्या क्षेत्रांतील भाजी मंडईतील १५ टक्के गाळे खास शेतक-यांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

नारायण जाधव ।ठाणे : कर्जमाफी, हमीभाव आदी मागण्यांकरिता शेतकरी संघटनांकडून करण्यात येणा-या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी राज्य शासनाने राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांच्या क्षेत्रांतील भाजी मंडईतील १५ टक्के गाळे खास शेतक-यांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.‘संतशिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडाबाजार अभियानां’तर्गत नगरविकास विभागाने याबाबतचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले असून राज्य कृषी पणन मंडळाच्या शिफारशीवरून हे गाळे शेतकरी उत्पादित गट किंवा कंपनीस द्यावयाचे आहेत.यामुळे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर, वसई-विरार आणि पनवेल या नऊ महापालिकांसह अंबरनाथ, बदलापुरातील रहिवाशांना आता शेतकºयांनी पिकवलेला ताजा शेतमाल, वाजवी किमतीत मिळेल. शिवाय, त्या त्या क्षेत्रातील महापालिका अधिकाºयांसह फेरीवाला संघटनांच्या दादागिरीपासूनही शेतकºयांची सुटका होणार आहे. याशिवाय, शेतकºयांनी उत्पादित केलेला शेतमाल शहरात विकता यावा, याकरिता नगरपालिका क्षेत्रात आठवड्यातून एक मैदान आणि महापालिका क्षेत्रात किमान तीन मैदाने दरशनिवारी किंवा रविवारी उपलब्ध करून द्यावीत. तसेच या शेतकरी बाजाराकरिता शेड्स उभाराव्यात, असे आदेश यापूर्वीच दिले आहेत. आठवडाबाजाराची संकल्पना महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या मार्गदर्शनानुसार राबवावी, यासाठी निवडलेली जागा योग्य आहे किंवा नाही, याबाबत पणन मंडळाचा अभिप्राय घ्यावा, असेही बजावण्यात आले आहे. शेतकरी आठवडाबाजाराच्या जागेसाठी आवश्यकता असेल, तेथे आरक्षणाची तरतूद करावी, असे नगरविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना पाठवलेल्या आदेशात म्हटले आहे.>महापालिकांच्या मालकीच्या भाजी मंडयांमध्ये १५ गाळे आरक्षित ठेवण्याच्या शासन निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र, त्यात खºया शेतकºयांना प्राधान्य मिळायलाच हवे. बोगस शेतकरी त्यात घुसता कामा नये. तसेच शेतकºयांना हमीभाव, कर्जमाफी मिळायलाच हवी. त्यासाठीचे आमचे आंदोलन सुरूच राहील. शेतकºयांच्या आंदोलनाची धार अशा निर्णयांमुळे कमी होणार नाही. त्यासाठी राज्य शासनाकडून व्यापक प्रयत्न व्हायला हवेत. अशा तुटपुंजा प्रयत्नांतून काहीही साध्य होणार नाही.- डॉ. अजित नवले, नेते, शेतकरी किसान सभा