शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

१३ कोटींच्या मजुरीसाठी मंगळवारी हाय वे रोखणार

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

रोजगार हमी योजनेतंर्गत काम करूनही गेल्या तीन महिन्यांपासून मजूर पगारापासून वंचित आहेत. येत्या दोन दिवसात पगार दिला

विरार :रोजगार हमी योजनेतंर्गत काम करूनही गेल्या तीन महिन्यांपासून मजूर पगारापासून वंचित आहेत. येत्या दोन दिवसात पगार दिला नाही तर ५ एप्रिलला श्रमजीवी संघटना मुंबईकडे जाणारे सर्व महामार्ग रोखून धरणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी दिली. १ जानेवारी २०१६ ते ३० मार्च २०१६ दरम्यान पालघर जिल्ह्यात रोजगार हमी अंतर्गत सर्व तालुक्यातील ग्रामपंचायत व यंत्रणामार्फत ९ हजार २४ कामे करण्यात आली. या कामासाठी तब्बल ७ लाख ९४ हजार ३४८ दिवस काम झाले. मजुरांची १३ कोटी ४८ लाख २८ हजार इतकी मजूरी मिळणे आवश्यक होते. मजूरांनी अनेकवेळा शासकीय कार्यालयात हेलपाटे घालूनही त्यांना मजूरी मिळाली नाही. किमान आर्थिक वर्ष संपत असताना मजूरांच्या खात्यामध्ये मजुरी येणे अपेक्षित होते. परंतू मजूरांच्या पदरी निराशाच पडली, असे पंडित यांनी सांगितले.जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यांची मजुरी रोजगार हमी कायद्यानुसार ०.५टक्के व्याजासहित पुढील दोन दिवसात मजुरांच्या खात्यात जमा न झाल्यास ५ एप्रिल २०१६ रोजी श्रमजीवी संंघटना मुंबईकडे जाणारे सर्व महामार्ग रोखेल असा इशारा पंडित यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)आम्ही जगायचे कसे?१) जव्हार, मोखाडा, विक्रमगड आदि अतिदुर्गम भागात आॅक्टोबर २०१५ ते डिसेंबर २०१५ या कालावधीत पाड्यापाड्यात रोजगार हमी अंतर्गत कामाची मागणी करणारे अर्ज भरुन घेण्याचे अभियान राबवले. या अभियानानंतर कामाच्या मागणीत मागील वर्षीपेक्षा या वर्षी १० ते १५ पट जास्त वाढ झाली.२) जव्हार तालुक्यात मागील वर्षी आॅक्टोबर ते डिसेंबर २०१४ साली कामाची मागणी १३ हजार ६६२ दिवस होती. श्रमजीवी संघटनेच्या अभियानानंतर आॅक्टोबर ते डिसेंबर २०१५ साली कामाची मागणी २ लाख २२ हजार ८६४ मनुष्य दिवस म्हणजेच मागणी २० पटीने वाढली. ३) मोखाडा तालुक्यात आॅक्टोबर ते डिसेंबर २०१४ साली कामाची मागणी २१हजार ५७१ मनुष्य दिवस व श्रमजीवीच्या अभियानानंतर कामाची मागणी ९१हजार ९८६ मनुष्य दिवस म्हणजेच कामाची मागणी ४ पटीने वाढली. ४) जिल्हा प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. परंतु आता वेतन द्यायला पैसे नाहीत. मजुरांना काम मिळाले. पण उपासमार तशीच राहिली. आधीच दारिद्र्य, कुपोषणाने ग्रासलेल्या व काम करुनही मजुरी मिळत नसल्यामुळे आदिवासी समाज जगायच कसे असा प्रश्न पंडित यांनी उपस्थित केला आहे.