शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

१३ कोटींच्या मजुरीसाठी मंगळवारी हाय वे रोखणार

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

रोजगार हमी योजनेतंर्गत काम करूनही गेल्या तीन महिन्यांपासून मजूर पगारापासून वंचित आहेत. येत्या दोन दिवसात पगार दिला

विरार :रोजगार हमी योजनेतंर्गत काम करूनही गेल्या तीन महिन्यांपासून मजूर पगारापासून वंचित आहेत. येत्या दोन दिवसात पगार दिला नाही तर ५ एप्रिलला श्रमजीवी संघटना मुंबईकडे जाणारे सर्व महामार्ग रोखून धरणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी दिली. १ जानेवारी २०१६ ते ३० मार्च २०१६ दरम्यान पालघर जिल्ह्यात रोजगार हमी अंतर्गत सर्व तालुक्यातील ग्रामपंचायत व यंत्रणामार्फत ९ हजार २४ कामे करण्यात आली. या कामासाठी तब्बल ७ लाख ९४ हजार ३४८ दिवस काम झाले. मजुरांची १३ कोटी ४८ लाख २८ हजार इतकी मजूरी मिळणे आवश्यक होते. मजूरांनी अनेकवेळा शासकीय कार्यालयात हेलपाटे घालूनही त्यांना मजूरी मिळाली नाही. किमान आर्थिक वर्ष संपत असताना मजूरांच्या खात्यामध्ये मजुरी येणे अपेक्षित होते. परंतू मजूरांच्या पदरी निराशाच पडली, असे पंडित यांनी सांगितले.जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यांची मजुरी रोजगार हमी कायद्यानुसार ०.५टक्के व्याजासहित पुढील दोन दिवसात मजुरांच्या खात्यात जमा न झाल्यास ५ एप्रिल २०१६ रोजी श्रमजीवी संंघटना मुंबईकडे जाणारे सर्व महामार्ग रोखेल असा इशारा पंडित यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)आम्ही जगायचे कसे?१) जव्हार, मोखाडा, विक्रमगड आदि अतिदुर्गम भागात आॅक्टोबर २०१५ ते डिसेंबर २०१५ या कालावधीत पाड्यापाड्यात रोजगार हमी अंतर्गत कामाची मागणी करणारे अर्ज भरुन घेण्याचे अभियान राबवले. या अभियानानंतर कामाच्या मागणीत मागील वर्षीपेक्षा या वर्षी १० ते १५ पट जास्त वाढ झाली.२) जव्हार तालुक्यात मागील वर्षी आॅक्टोबर ते डिसेंबर २०१४ साली कामाची मागणी १३ हजार ६६२ दिवस होती. श्रमजीवी संघटनेच्या अभियानानंतर आॅक्टोबर ते डिसेंबर २०१५ साली कामाची मागणी २ लाख २२ हजार ८६४ मनुष्य दिवस म्हणजेच मागणी २० पटीने वाढली. ३) मोखाडा तालुक्यात आॅक्टोबर ते डिसेंबर २०१४ साली कामाची मागणी २१हजार ५७१ मनुष्य दिवस व श्रमजीवीच्या अभियानानंतर कामाची मागणी ९१हजार ९८६ मनुष्य दिवस म्हणजेच कामाची मागणी ४ पटीने वाढली. ४) जिल्हा प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. परंतु आता वेतन द्यायला पैसे नाहीत. मजुरांना काम मिळाले. पण उपासमार तशीच राहिली. आधीच दारिद्र्य, कुपोषणाने ग्रासलेल्या व काम करुनही मजुरी मिळत नसल्यामुळे आदिवासी समाज जगायच कसे असा प्रश्न पंडित यांनी उपस्थित केला आहे.