शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

जिल्ह्यात आरटीईच्या १२ हजार जागा अद्यापही रिक्त

By admin | Updated: June 21, 2017 04:34 IST

सीबीएसई, एसएससी, आयसीएसई आणि आयबी आदी बोर्डांच्या जिल्ह्यात ८११ शाळा कार्यरत आहेत. यामधील केजी, ज्यू. केजी

सुरेश लोखंडे । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सीबीएसई, एसएससी, आयसीएसई आणि आयबी आदी बोर्डांच्या जिल्ह्यात ८११ शाळा कार्यरत आहेत. यामधील केजी, ज्यू. केजी आणि पहिलीच्या वर्गात गरीब मुलांना प्रवेश देण्यासाठी १६ हजार ४५५ जागा आरक्षित ठेवल्या होत्या. परंतु, पालकांनी केवळ नामांकीत शाळांची निवड करून त्यात चार हजार ४०१ प्रवेश घेतले. उर्वरित शाळा नापसंत केल्यामुळे त्यात अद्यापही १२ हजार ५४ जागा प्रवेशाअभावी रिक्त आहेत. जिल्ह्यातील दुर्बल व वंचित घटकांच्या कुटुंबातील बालकांनादेखील इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण घेता यावे, यासाठी आरटीई अर्थात ‘शिक्षणाचा हक्क ’ या कायद्याअंतर्गत खाजगी शाळेत २५ टक्के जागा आरक्षित ठेवल्या होत्या. यानुसार ५९१ खाजगी शाळांमध्ये १२ हजार ६०५ विद्यार्थ्यांना पहिलीच्या वर्गात, तर ८९ शाळांच्या एक हजार ७९७ जागांवर ज्युनिअर केजी आणि नर्सरीकरीता १२८ शाळांमध्ये दोन हजार ५३ प्रवेश आरक्षित ठेवले होते. परंतु, पालकांनी नामांकित शाळांमध्ये सहाव्या फेरी अखेर चार हजार ४०१ विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतले. उर्वरित १२ हजार ५४ जागा यंदाही प्रवेशाअभावी रिक्त राहणार आहेत. पहिलीच्या वर्गासह ज्युनिअर व सिनिअर केजीत प्रवेश घेण्यासाठी आठ हजार ४०९ पालकांनी अर्ज केले होते. परंतु,काही ठराविक शाळांवरच लक्ष केंद्रीत करून अर्ज दाखल केल्याचे निदर्शनात आले. शेवटचा राऊंड केवळ २१ विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला आहे.